शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आ. ह. साळुंखेंनी समाजविद्रोह मांडला : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:13 IST

डॉ. आ. ह. साळुंखे यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा ही चिकित्सा, जिज्ञासा आणि ज्ञानलालसेमधून आलेली असून अभ्यासपूर्ण शैलीतून त्यांनी समाजाचा विद्रोह मांडला. त्यांचे ग्रंथ विचार प्रवर्तक आहेत.

पुणे : डॉ. आ. ह. साळुंखे यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा ही चिकित्सा, जिज्ञासा आणि ज्ञानलालसेमधून आलेली असून अभ्यासपूर्ण शैलीतून त्यांनी समाजाचा विद्रोह मांडला. त्यांचे ग्रंथ विचार प्रवर्तक आहेत. जाणकारांनी न्याय न दिलेल्या आणि दुर्लक्षित घटकांबद्दल त्यांनी लिखाण केले. ते खºया अर्थाने धर्मचिकित्सक असल्याचे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.पवार यांच्या हस्ते साळुंखे यांना अमृत महोत्सवानिमित्त तुकाराम पगडी घालून सत्कार करण्यात आला. मानपत्र, शाल देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर, माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यामधून आलेल्या साळुंखे यांची वाटचाल प्रेरणादायी आहे. त्यांना कोणतीही शैक्षणिक अथवा अन्य पार्श्वभूमी नाही. साहित्य संस्कृतीमधील त्यांचे योगदान मात्र मोठे आहे. त्यांच्याबद्दल केवळ अभिमानच नाही तर नतमस्तक व्हावेसे वाटते. वैदिक परंपरेला विरोध दर्शवित बहुजनांची सांस्कृतिक गुलामगिरीमधून मुक्तता करणारे लिखाण त्यांनी केले. ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’ या पुस्तकातील एक उतारा वाचून पवार यांनी भाषणाचा समारोप केला.साळुंखे म्हणाले, वारकरी परंपरेमधून मी आलेलो असून महात्मा बसवेश्वरांचे वचन ‘हा कोणाचा हा कोणाचा असे म्हणण्यापेक्षा हा आमचा हा आमचा असे म्हणावे’ हे कायम प्रेरणा देते. जाणिवपूर्वक संस्कृत शिकलो. चार्वाकामुळे वैचारिक लेखनाकडे वळलो. तरुणांनी लहानपणापासून जिज्ञासा जपली पाहिले. प्रबळ इच्छाशक्ती असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कामामध्ये चिकीत्सक दृष्टीकोन बाळगायला हवा.शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरुन कवी परमानंद यांनी संस्कृतमध्ये ‘शिवभारत’ नावाचे काव्य लिहिले. त्यामध्ये शहाजी राजेंचे मोठेपण आले आहे. मात्र, काही इतिहासकारांनी शहाजी राजांविषयी चुकीचे लिहिले आहे. इतिहासाचे न्याय्य आणि विधायक लिखाण आवश्यक आहे, खोट्याला खोट्याने उत्तर देऊ नका, असेही डॉ. साळुंखे म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार