शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

आ. ह. साळुंखेंनी समाजविद्रोह मांडला : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:13 IST

डॉ. आ. ह. साळुंखे यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा ही चिकित्सा, जिज्ञासा आणि ज्ञानलालसेमधून आलेली असून अभ्यासपूर्ण शैलीतून त्यांनी समाजाचा विद्रोह मांडला. त्यांचे ग्रंथ विचार प्रवर्तक आहेत.

पुणे : डॉ. आ. ह. साळुंखे यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा ही चिकित्सा, जिज्ञासा आणि ज्ञानलालसेमधून आलेली असून अभ्यासपूर्ण शैलीतून त्यांनी समाजाचा विद्रोह मांडला. त्यांचे ग्रंथ विचार प्रवर्तक आहेत. जाणकारांनी न्याय न दिलेल्या आणि दुर्लक्षित घटकांबद्दल त्यांनी लिखाण केले. ते खºया अर्थाने धर्मचिकित्सक असल्याचे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.पवार यांच्या हस्ते साळुंखे यांना अमृत महोत्सवानिमित्त तुकाराम पगडी घालून सत्कार करण्यात आला. मानपत्र, शाल देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर, माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यामधून आलेल्या साळुंखे यांची वाटचाल प्रेरणादायी आहे. त्यांना कोणतीही शैक्षणिक अथवा अन्य पार्श्वभूमी नाही. साहित्य संस्कृतीमधील त्यांचे योगदान मात्र मोठे आहे. त्यांच्याबद्दल केवळ अभिमानच नाही तर नतमस्तक व्हावेसे वाटते. वैदिक परंपरेला विरोध दर्शवित बहुजनांची सांस्कृतिक गुलामगिरीमधून मुक्तता करणारे लिखाण त्यांनी केले. ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’ या पुस्तकातील एक उतारा वाचून पवार यांनी भाषणाचा समारोप केला.साळुंखे म्हणाले, वारकरी परंपरेमधून मी आलेलो असून महात्मा बसवेश्वरांचे वचन ‘हा कोणाचा हा कोणाचा असे म्हणण्यापेक्षा हा आमचा हा आमचा असे म्हणावे’ हे कायम प्रेरणा देते. जाणिवपूर्वक संस्कृत शिकलो. चार्वाकामुळे वैचारिक लेखनाकडे वळलो. तरुणांनी लहानपणापासून जिज्ञासा जपली पाहिले. प्रबळ इच्छाशक्ती असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कामामध्ये चिकीत्सक दृष्टीकोन बाळगायला हवा.शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरुन कवी परमानंद यांनी संस्कृतमध्ये ‘शिवभारत’ नावाचे काव्य लिहिले. त्यामध्ये शहाजी राजेंचे मोठेपण आले आहे. मात्र, काही इतिहासकारांनी शहाजी राजांविषयी चुकीचे लिहिले आहे. इतिहासाचे न्याय्य आणि विधायक लिखाण आवश्यक आहे, खोट्याला खोट्याने उत्तर देऊ नका, असेही डॉ. साळुंखे म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार