शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

अवसरी खुर्द परिसरात ढगफुटी, ओढ्या-नाल्यांना पूर : रस्ते, पिके पाण्याखाली, पुलांचे भराव खचले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:44 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द येथे शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना रात्री मोठे पूर आले. पाण्याच्या प्रवाहामुळे येथील पुलांचे नुकसान झाले. शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. संपूर्ण पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अवसरी - आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द येथे शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना रात्री मोठे पूर आले. पाण्याच्या प्रवाहामुळे येथील पुलांचे नुकसान झाले. शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. संपूर्ण पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील घरांमध्ये जवळपास दीड फुटापर्यंत पाणी साचले.अवसरी खुर्द येथे शनिवारी रात्री ७.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात पावसाने उग्र रूप धारण केले. जवळपास दोन तास ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने सर्वत्रच पाणीच झाले. ओढ्यांना पूर आले. ओढ्याचे पाणी पात्रात बसत नसल्याने रस्त्यावरून, शेतातून पुराचे पाणी वाहत होते. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील माती, खडी वाहून गेली आहे. शेतातील उभी पिके, शेतीचे बांध, तसेच शेतातील माती वाहून गेली आहे. पावसाचा जोर इतका मोठा होता, की अक्षरश: दोन तासांत सर्वच ठिकाणी पाणी साचले होते.तेथील जवळपास असणाºया शेतकºयांची सरपणाची लाकडे, बाभळीची झाडे पुराच्या पाण्याने वाहून जाऊन सिमेंट मोºयांमध्ये अडकल्याने पाणी तुंबून पाण्याचा प्रवाह बदलला. त्यामुळे पुलाचा काही भाग खचला आहे. पूल वाहतुकीयोग्य राहिला नाही. पूल तयार करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलास सिमेंट अस्तरीकरण न केल्याने पुलाला धोका निर्माण झाल्याचा आरोप माजी उपसरपंच दिनेश खेडकर यांनी केला.शेत झाले जलमय : पिके गेली पाण्याखालीभट्टीवस्तीजवळ एक वर्षापूर्वी सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. परंतु पुराचे पाणी एवढे आले, की सिमेंट बंधाºयावरून पाणी न बसल्याने बंधाºयाच्या कडेने शेतातून खोंगळ पडून तेथून पाणी वाहून थेट अनेक शेतकºयांच्या शेतात घुसले. यामुळे शेती बांध, तसेच जमिनीतील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली. आडघरेमळा येथील बंधाऱ्याचे ढापे न काढल्यामुळे बाजीराव कामठे, वसंत शिंदे तसेच इतर शेतकºयांच्या जमिनीतील माती आणि पिके वाहून गेल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. अवसरी खुर्द येथील शेतकºयांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल खात्याने पंचनामे करावेत, अशी मागणी या गावचे रहिवासी आणि मंचर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत अभंग यांनी केले आहे. शेतजमिनीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तसेच सार्वजनिक रस्ते, पूल, सिमेंट बंधारे वाहून गेले आहेत. पावसाचा केंद्रबिंदू अवसरी खुर्द आणि परिसरात होता. त्यामुळे अवघ्या दीड ते दोन तासांत सर्वत्र पाणीच पाणी साचून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.शिंदेमळ्यात घरांत साचले दीड फूट पाणीशिंदेमळ्यातील वस्तीत ओढ्याचे पाणी घुसल्याने काही घरात सुमारे दीड फूट पाणी साचले होते. तसेच रस्ते आणि शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. शिंदेमळा येथे पावसाचा केंद्रबिंदू होता. अचानक आलेल्या पुरामुळे येथील पूल वाहून गेला. यामुळे ओढ्याचे पाणी निखिल शिंदे, तुळशीराम दाते यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या घरात घुसले. त्यामुळे तेथील वस्तीवर घबराट निर्माण झाली होती. घरातील धान्य, खतांच्या गोणींचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बराकीत पाणी घुसल्याने कांदा उत्पादकाचे नुकसान झाले आहे. बाजरी, तरकारी पिके आणि तोंडल्यांच्या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. गावठाण-माळीमळ्यात जाणाऱ्या छोट्या पुलाचे नुकसान झाले आहे. कुंभारवाड्यातील असणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यावरून पुराचे पाणी बसले नसल्याने एका बाजूचा मातीचा भराव वाहून गेला आहे. हिंगेवस्ती, चौरेमळा, शिंदेमळा, खालचा शिवार येथील ओढ्यांच्या शेजारील असणाºया शेतजमिनीचेही नुकसान झाले आहे.

टॅग्स :Waterपाणी