शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

अवसरी खुर्द परिसरात ढगफुटी, ओढ्या-नाल्यांना पूर : रस्ते, पिके पाण्याखाली, पुलांचे भराव खचले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:44 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द येथे शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना रात्री मोठे पूर आले. पाण्याच्या प्रवाहामुळे येथील पुलांचे नुकसान झाले. शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. संपूर्ण पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अवसरी - आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द येथे शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे ओढ्या-नाल्यांना रात्री मोठे पूर आले. पाण्याच्या प्रवाहामुळे येथील पुलांचे नुकसान झाले. शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. संपूर्ण पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील घरांमध्ये जवळपास दीड फुटापर्यंत पाणी साचले.अवसरी खुर्द येथे शनिवारी रात्री ७.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात पावसाने उग्र रूप धारण केले. जवळपास दोन तास ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने सर्वत्रच पाणीच झाले. ओढ्यांना पूर आले. ओढ्याचे पाणी पात्रात बसत नसल्याने रस्त्यावरून, शेतातून पुराचे पाणी वाहत होते. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील माती, खडी वाहून गेली आहे. शेतातील उभी पिके, शेतीचे बांध, तसेच शेतातील माती वाहून गेली आहे. पावसाचा जोर इतका मोठा होता, की अक्षरश: दोन तासांत सर्वच ठिकाणी पाणी साचले होते.तेथील जवळपास असणाºया शेतकºयांची सरपणाची लाकडे, बाभळीची झाडे पुराच्या पाण्याने वाहून जाऊन सिमेंट मोºयांमध्ये अडकल्याने पाणी तुंबून पाण्याचा प्रवाह बदलला. त्यामुळे पुलाचा काही भाग खचला आहे. पूल वाहतुकीयोग्य राहिला नाही. पूल तयार करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलास सिमेंट अस्तरीकरण न केल्याने पुलाला धोका निर्माण झाल्याचा आरोप माजी उपसरपंच दिनेश खेडकर यांनी केला.शेत झाले जलमय : पिके गेली पाण्याखालीभट्टीवस्तीजवळ एक वर्षापूर्वी सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. परंतु पुराचे पाणी एवढे आले, की सिमेंट बंधाºयावरून पाणी न बसल्याने बंधाºयाच्या कडेने शेतातून खोंगळ पडून तेथून पाणी वाहून थेट अनेक शेतकºयांच्या शेतात घुसले. यामुळे शेती बांध, तसेच जमिनीतील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली. आडघरेमळा येथील बंधाऱ्याचे ढापे न काढल्यामुळे बाजीराव कामठे, वसंत शिंदे तसेच इतर शेतकºयांच्या जमिनीतील माती आणि पिके वाहून गेल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. अवसरी खुर्द येथील शेतकºयांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल खात्याने पंचनामे करावेत, अशी मागणी या गावचे रहिवासी आणि मंचर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत अभंग यांनी केले आहे. शेतजमिनीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तसेच सार्वजनिक रस्ते, पूल, सिमेंट बंधारे वाहून गेले आहेत. पावसाचा केंद्रबिंदू अवसरी खुर्द आणि परिसरात होता. त्यामुळे अवघ्या दीड ते दोन तासांत सर्वत्र पाणीच पाणी साचून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.शिंदेमळ्यात घरांत साचले दीड फूट पाणीशिंदेमळ्यातील वस्तीत ओढ्याचे पाणी घुसल्याने काही घरात सुमारे दीड फूट पाणी साचले होते. तसेच रस्ते आणि शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. शिंदेमळा येथे पावसाचा केंद्रबिंदू होता. अचानक आलेल्या पुरामुळे येथील पूल वाहून गेला. यामुळे ओढ्याचे पाणी निखिल शिंदे, तुळशीराम दाते यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या घरात घुसले. त्यामुळे तेथील वस्तीवर घबराट निर्माण झाली होती. घरातील धान्य, खतांच्या गोणींचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बराकीत पाणी घुसल्याने कांदा उत्पादकाचे नुकसान झाले आहे. बाजरी, तरकारी पिके आणि तोंडल्यांच्या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. गावठाण-माळीमळ्यात जाणाऱ्या छोट्या पुलाचे नुकसान झाले आहे. कुंभारवाड्यातील असणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यावरून पुराचे पाणी बसले नसल्याने एका बाजूचा मातीचा भराव वाहून गेला आहे. हिंगेवस्ती, चौरेमळा, शिंदेमळा, खालचा शिवार येथील ओढ्यांच्या शेजारील असणाºया शेतजमिनीचेही नुकसान झाले आहे.

टॅग्स :Waterपाणी