शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

हवामान बदलूनही पीक जोमात, बटाट्याला पोषक वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:52 IST

कुरवंडी (ता. आंबेगाव) परिसरात रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेले बटाटा पीक हवामानात होणारे बदल घडवूनसुद्धा योग्य फवारणी केल्यानंतर जोमदार आले आहे. निसर्गाच्या विविध लहरी येऊनसुद्धा शेतकरी आपले पीक टिकावे म्हणून त्यावर औषधाचे प्रयोग करून ते पीक जगवून दाखवतो.

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : कुरवंडी (ता. आंबेगाव) परिसरात रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेले बटाटा पीक हवामानात होणारे बदल घडवूनसुद्धा योग्य फवारणी केल्यानंतर जोमदार आले आहे. निसर्गाच्या विविध लहरी येऊनसुद्धा शेतकरी आपले पीक टिकावे म्हणून त्यावर औषधाचे प्रयोग करून ते पीक जगवून दाखवतो. हे कुरवंडी येथील रमेश दिलीप तोत्रे या शेतक-याने सिद्ध केले.एखादी रोगाची साथ यावी अन् पशुपक्षी पटापट मरावे, अशी अवस्था निसर्र्गाने केलेल्या लहरी हल्ल्याने शेतकºयांची झाली आहे. सध्या थंडी, ऊन, हलका पाऊस अशा बदलत्या वातावरणात जीव मुठीत ठेवून शेतकरी आपल्या पिकाला जपत आहे. कुरवंडी परिसरात रमेश तोत्रे या शेतकºयाने एक महिन्यापूर्वी आपल्या एक एकर शेतात पुखराज जातीचे बटाटा पीक घेतले.प्रतिक्विंटल ६०० रुपये दराने ११ कट्टे बटाटे लागवड केली. एक महिन्याचे पीक झाले असून, चालू हवामानात बटाट्याचा शेंड्याचा पाला कर्जळू लागला होता. त्यामुळे तातडीने औषधांची फवारणी करून युरिया खताचा वापर केला.योग्य पाणी दिले. खुरपणी करून चांगली काळजी घेतली. बारकाईने लक्ष दिले. त्यामुळे बदललेल्या हवामानातसुद्धा बटाटा पिकाने चांगले बाळसे धरले आहे.पीक तरारले. शेतकºयाप्रमाणे इतरांनी हवामानातील बदलांना सामोरे जाऊन पिकांची काळजी घेतली तर निकासानीपेक्षा योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन शेतकरी रमेश तोत्रे यांनी केले.वारंवार होणाºया हवामानातील बदलांवर लक्ष ठेवावे, खते, औषधे, फवारणी, खुरपणी केल्यास पीक चांगले येऊ शकते. असा आशावाद शेतकºयांनी पीक उत्पादन घेताना ठेवला पाहिजे. कुरवंडी परिसरात अनेक शेतकरी कांदा, बटाटा, फरशी, लसूण आदी पिके घेतात; पण बदलत्या वातावरणात पिकेटिकविली पाहिजेत.थंडीचा ज्वारीपिकाला फायदामहुडे : भोर तालुक्यातील पश्चिम भागातील पिसावरे ,महुडे परिसरातील ज्वारी पिकाला अवकाळी पाऊस पडून गेल्याने आता थंडी पडू लागल्याने ज्वारी हे पीक अंत्यत चांगले दिसू लागले आहे.नीरा नदी व छोटे बंधारे यांच्या किनारी ज्वारीचे पीक घेतले आहे. यावर्षी चांगले हवामान व पिकासाठी पाणीसाठा पोषक ठरत आहे. या परिसरात गेल्या वर्षी हे पीक चागल्या प्रकारे होते . यावर्षी ज्वारीचे पीक जास्त आहे. या रब्बी पिकाचा चांगला फायदा शेतकºयास ज्वारी व जनावरांना कडबा मिळतो. कडबा हा जनावरांना फायदेशीर असतो. हवामान चागले नसेल तर तर हे पीक तोट्यात जाण्याची शक्यता असते. अचानक झालेल्या आवकाळीं पावसाने या पिकावरी रोगाचे प्रमाण कमी होऊन पिके जोमात दिसू लागली आहेत.

टॅग्स :newsबातम्याPuneपुणेagricultureशेती