शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

स्वच्छता मोहीम जनजागृतीसाठी आळंदीत बोलक्या भिंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 02:00 IST

सन २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी चार हजार गुणांची स्पर्धा झाली. यावर्षी यात १ हजार गुणांची वाढ झाली आहे. यावर्षी ५ हजार गुणांसाठी स्पर्धा होत आहे.

आळंदी : आळंदी शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानास ४ जानेवारीपासून यावर्षी ही स्वच्छ सर्वेक्षण २०१९ उपक्रम राबविला जात आहे. या विशेष स्वच्छता अभियानमध्ये आळंदी नगरपरिषद सहभागी झाली असल्याने यासाठीचे कामकाज नगरपरिषदेने सुरू केले आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारीसमीर भूमकर यांनी दिली. यासाठी आळंदीत विविध भिंतींवर स्वच्छतेचे संदेश दिले जात असून या बोलक्या भिंती सर्वांचे आकर्षण ठरू लागले आहे.

सन २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी चार हजार गुणांची स्पर्धा झाली. यावर्षी यात १ हजार गुणांची वाढ झाली आहे. यावर्षी ५ हजार गुणांसाठी स्पर्धा होत आहे. मागील वर्षीप्रमाणे अधिकचा सहभाग स्थानिक प्रभागातील नगरसेवक तसेच नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा, सामाजिक कार्यकर्ते यांचे योगदान अपेक्षित असल्याचे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले. स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी या तीर्थक्षेत्रासाठी अभियान राबवित गेल्या वर्षीपासून कामकाज सुरू झाले आहे. यावर्षी नगरपरिषदेने अधिक जनजागृती परिणामकारक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्वच्छता अभियानाला अधिक गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ मध्ये पहिल्या १० नगरपरिषदांमध्ये आळंदीचे नाव आणण्यास संकल्प केला असल्याचे नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले. देशातील नागरी भागातील शहरे अधिक सुंदर लक्षवेधी व बोलकी होण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने देखील सार्वजनिक रस्त्यालगतच्या भिंती अधिक बोलक्या करण्याचे काम हाती घेतले आहे. या अंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आळंदी शहरात सद्या कचराकुंडी मुक्त शहर व कचरामुक्त तीर्थक्षेत्र आळंदीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सुरू केले आहे. मागील वर्षापासून आळंदी नगरपरिषद स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेत सहभागी झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षणांत या वर्षी पाच हजार गुणांच्या स्पर्धेत सेवास्तर, कचरा संकलन व वाहतूक, कचरा प्रक्रिया व विल्हेवाट, माहिती शिक्षण तसेच संवाद, हगणदरीमुक्त आळंदी आदींचा समावेश आहे.आळंदी नगरपरिषदेने तारांकित मानांकनासाठीदेखील प्रयत्न सुरु केले आहे. या अंतर्गत गुण मिळणार आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहरात जाहिरात फलक जनजागृतीसाठी काम सुरू करण्यात आले आहे. स्वच्छता अ‍ॅप, व्यापारी वगार्साठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याची मोहीम राबविण्यात आली. नागरिकांना सर्व्हेक्षणाच्या काळात प्रश्न विचारले जाणार आहेत. यासाठी समाज प्रबोधन केले जाणार आहे. युवक, तरुण नागरिकांनी नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्व्हेक्षणात प्रशासनास सहकार्य करून आळंदीच्या नावलौकिकात वाढ करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन स्वच्छतादूतांकडून केलेजात आहे. 

टॅग्स :Alandiआळंदीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड