शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

वादाचा विकास आराखडा, पीएमआरडीए बरोबरच महापालिकेचाही दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 03:37 IST

न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या विकास आराखड्यावरून सध्या महापालिका व पीएमपीआरडीए यांच्यात वादंग सुरू झाले आहे.

पुणे : न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या विकास आराखड्यावरून सध्या महापालिका व पीएमपीआरडीए यांच्यात वादंग सुरू झाले आहे. या गावांचा विकास आराखडा आम्हीच करणार, असा दावा दोन्ही संस्थांकडून करण्यात येत आहे.महापालिकेत समाविष्ट झालेल्या या ११ गावांना नागरी चेहरा असला, तरीही ग्रामपंचायत हद्दीत असल्यामुळे त्यांचा नियोजनबद्ध विकास झालेला नाही. आता ही गावे महापालिकेत आल्यामुळे तसे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. असा आराखडा तयार करताना गावांच्या एकूण क्षेत्रफळाचा अभ्यास करून त्याचे निवासी, औद्योगिक असे विभाग पाडण्यात येतात. त्यात शाळा, दवाखाने, मैदाने, अशा मूलभूत तसेच आवश्यक सुविधांसाठी म्हणून भूखंडावर आरक्षण टाकण्यात येते. सरकारी जागांबरोबर असे आरक्षण खासगी जागांवरही पडते. त्याची नुकसानभरपाई संबंधित मालकांना टीडीआर, एफएसआय यापैकी एका स्वरूपात देण्यात येते.त्यामुळेच हा आराखडा तयार करण्याचा अधिकार पीएमआरडीएलासुद्धा हवा आहे व महापालिकेलाही पाहिजे आहे. गावांमधील नागरी सुविधा महापालिकेशी जोडून घेणे गरजेचे आहे. आराखडा तयार करण्यासाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळ पीएमआरडीएकडे नाही. महापालिकेकडे ते आहे, त्यामुळे महापालिकाच या गावांचा विकास आराखडा तयार करेल असे महापालिकेचे म्हणणे आहे. तर महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी ही गावे पीएमआरडीएच्याच अखत्यारीत होती, त्यामुळे आम्हीच आराखडा तयार करणार, असे पीएमआरडीएने जाहीर केले आहे.या गावांमधील बांधकामांच्या परवानग्या देण्यासाठी स्वीकारलेले विकासशुल्क (ज्यातून त्या त्या परिसरासाठी आवश्यक त्या सुविधा केल्या जातात) पीएमआरडीएकडेच आहे. त्यापूर्वी जिल्हा परिषदहे विकासशुल्क स्वीकारत असे. त्यातील अर्धी रक्कम सरकारजमा होऊन अर्धी जिल्हा परिषद व नंतर पीएमआरडीए कडे राहत असे. ही रक्कम द्यावी, अशी मागणी महापालिकेने केली आहे. त्यातून या गावांमध्ये नागरी सुविधा देता येतील, तसेच विकास आराखडाही तयार करता येईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे.दरम्यान, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, पालकमंत्री गिरीश बापट यांनी विकास आराखडा महापालिकेनेच तयार करावा, असे सांगितले असल्याची माहिती दिली. पीएमपीआरडीने हवे तर दोन ते तीन गावांचा असा आराखडा तयार करावा, मात्र हे काम महापालिकेचेच आहे, असा दावा भिमाले यांनी केली. येवलेवाडी सारखा समाविष्ट गावांचा विकास आराखडा तयार करण्यात येईल, असे भिमाले म्हणाले.ानगरसेवकांकडूनचदावे-प्रतिदावेएखाद्या परिसराचा विकास आराखडा तयार करताना त्यात बरेच गैरव्यवहार होत आहेत अशी चर्चा सुरू होती.आरक्षणे टाकणे, वापर नोंद बदलणे, रस्ते बदलणे अशा विषयांमधून असे व्यवहार होत असतात.महापालिका नगरसेवकांकडूनच याप्रकारचे अनेक आरोपकरून दावे-प्रतिदावे केले जातात.

टॅग्स :Puneपुणे