शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्याकडे दुर्लक्ष, वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:29 IST

व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर हे अंतर अंदाजे दीड कि.मी., मात्र सकाळी किंवा संध्याकाळी हे अंतर जर तुम्हाला पार करायचे असेल तर यासाठी लागतात दीड तास. होय हे खरे आहे. या भागातील राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक वर्षांपासून या भागातील या रस्त्यावरून प्रवास करणारे लाखो नागरिक हा त्रास सहन करीत आहेत.

- अभिजित डुंगरवालबिबवेवाडी  - व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर हे अंतर अंदाजे दीड कि.मी., मात्र सकाळी किंवा संध्याकाळी हे अंतर जर तुम्हाला पार करायचे असेल तर यासाठी लागतात दीड तास. होय हे खरे आहे. या भागातील राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक वर्षांपासून या भागातील या रस्त्यावरून प्रवास करणारे लाखो नागरिक हा त्रास सहन करीत आहेत.पुणे-स्टेशनपासून कात्रज-कोंढवा रस्त्याला जोडणारा हा ८० फुटी रस्ता आईमाता मंदिरापासून व्हीआयटी चौकापर्यंत फक्त २० फुटी शिल्लक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनीराजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने उभारण्यात आलेले मंगलकार्यालयाचे पार्किंग व गोडाऊन यामुळे या रस्त्याला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. पालिकेचा बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्यातील एकाही अधिकाऱ्यामध्ये हे धाडस नाही, की ते या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकतील व आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतील.या प्रत्येक अतिक्रमणामध्ये राजकीय नेते व अधिकारी यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, म्हणूनच रस्त्यावरील एकाही मंगलकार्यालय किंवा गोडाऊनवर कारवाई करून रस्ता मोकाळा करून दाखवण्याचे धाडस पालिकेचे अधिकारी दाखवत नाहीत हे या भागातील वास्तव आहे.पालिकेला आता नवीन आयुक्त येणार आहेत. त्यांनी तरी येथील राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी न पडता, येथील प्रत्येक नागरिकाशी निगडित असलेला हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी येथील लाखो सामान्य नागरिक करीत आहेत.वाहतूक पोलीस पावती फाडण्यासाठीचया रस्त्यावर सहकारनगर वाहतूक विभागाचे चार-पाच कर्मचारी दिवसभर उभे असतात, मात्र ते येथील वाहतूककोंडी सोडवायची सोडून वरिष्ठांकडून आलेले पावतीचे टार्गेट पूर्ण करण्यामध्येच व्यस्त दिसतात. वाहतूक विभागाने पुण्यातील सर्वात मोठा वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पावती फाडण्यासाठी वेगळे पोलीस व वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वेगळे पोलीस अशी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तरच पुण्यातील वाहतूककोंडी सुटण्यामध्ये वाहतूक पोलिसांचा हातभार लागेल.कोर्टातील स्टेवर आयुक्तांनी लक्ष द्यावेया भागातील अनेक गोडाऊनवाल्यांनी कोर्टात जाऊन अतिक्रमणे पाडू नये यासाठी स्टेचा आधार घेतलेला आहे. कोर्टाचा स्टे असल्यामुळे अतिक्रमण विभागाला कारवाई करता येत नाही. मात्र हा गोडाऊन उभारलेला भाग हिल टॉप-हिल स्लोप आहे.कायद्याप्रमाणे या भागात एक हजार फुटाच्या भूखंडावर फक्त ४० फूट बांधकाम करता येते, तेही प्लॅनपास केल्यावर. त्यामुळे पहिल्याच तारखेला अनधिकृत रस्त्यावर गोडाऊन बांधणाºयाचा स्टे उठणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नाही.तारीख पे तारीख पुढे सुरू आहे. स्टेच्या विरोधात पालिकेने पूर्ण ताकदीने आता कोर्टासमोर बाजू मांडणे आवश्यक आहे. तरच या भागातील नागरिकांना न्याय मिळणार आहे. तसेच ज्यांनी मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकामे, गोडाऊन केले आहेत त्यांच्याकडून कारवाईचा खर्च व दंड वसूल करणेदेखील अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीnewsबातम्या