शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्याकडे दुर्लक्ष, वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:29 IST

व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर हे अंतर अंदाजे दीड कि.मी., मात्र सकाळी किंवा संध्याकाळी हे अंतर जर तुम्हाला पार करायचे असेल तर यासाठी लागतात दीड तास. होय हे खरे आहे. या भागातील राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक वर्षांपासून या भागातील या रस्त्यावरून प्रवास करणारे लाखो नागरिक हा त्रास सहन करीत आहेत.

- अभिजित डुंगरवालबिबवेवाडी  - व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर हे अंतर अंदाजे दीड कि.मी., मात्र सकाळी किंवा संध्याकाळी हे अंतर जर तुम्हाला पार करायचे असेल तर यासाठी लागतात दीड तास. होय हे खरे आहे. या भागातील राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक वर्षांपासून या भागातील या रस्त्यावरून प्रवास करणारे लाखो नागरिक हा त्रास सहन करीत आहेत.पुणे-स्टेशनपासून कात्रज-कोंढवा रस्त्याला जोडणारा हा ८० फुटी रस्ता आईमाता मंदिरापासून व्हीआयटी चौकापर्यंत फक्त २० फुटी शिल्लक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनीराजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने उभारण्यात आलेले मंगलकार्यालयाचे पार्किंग व गोडाऊन यामुळे या रस्त्याला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. पालिकेचा बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्यातील एकाही अधिकाऱ्यामध्ये हे धाडस नाही, की ते या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकतील व आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतील.या प्रत्येक अतिक्रमणामध्ये राजकीय नेते व अधिकारी यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, म्हणूनच रस्त्यावरील एकाही मंगलकार्यालय किंवा गोडाऊनवर कारवाई करून रस्ता मोकाळा करून दाखवण्याचे धाडस पालिकेचे अधिकारी दाखवत नाहीत हे या भागातील वास्तव आहे.पालिकेला आता नवीन आयुक्त येणार आहेत. त्यांनी तरी येथील राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी न पडता, येथील प्रत्येक नागरिकाशी निगडित असलेला हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी येथील लाखो सामान्य नागरिक करीत आहेत.वाहतूक पोलीस पावती फाडण्यासाठीचया रस्त्यावर सहकारनगर वाहतूक विभागाचे चार-पाच कर्मचारी दिवसभर उभे असतात, मात्र ते येथील वाहतूककोंडी सोडवायची सोडून वरिष्ठांकडून आलेले पावतीचे टार्गेट पूर्ण करण्यामध्येच व्यस्त दिसतात. वाहतूक विभागाने पुण्यातील सर्वात मोठा वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पावती फाडण्यासाठी वेगळे पोलीस व वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वेगळे पोलीस अशी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तरच पुण्यातील वाहतूककोंडी सुटण्यामध्ये वाहतूक पोलिसांचा हातभार लागेल.कोर्टातील स्टेवर आयुक्तांनी लक्ष द्यावेया भागातील अनेक गोडाऊनवाल्यांनी कोर्टात जाऊन अतिक्रमणे पाडू नये यासाठी स्टेचा आधार घेतलेला आहे. कोर्टाचा स्टे असल्यामुळे अतिक्रमण विभागाला कारवाई करता येत नाही. मात्र हा गोडाऊन उभारलेला भाग हिल टॉप-हिल स्लोप आहे.कायद्याप्रमाणे या भागात एक हजार फुटाच्या भूखंडावर फक्त ४० फूट बांधकाम करता येते, तेही प्लॅनपास केल्यावर. त्यामुळे पहिल्याच तारखेला अनधिकृत रस्त्यावर गोडाऊन बांधणाºयाचा स्टे उठणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नाही.तारीख पे तारीख पुढे सुरू आहे. स्टेच्या विरोधात पालिकेने पूर्ण ताकदीने आता कोर्टासमोर बाजू मांडणे आवश्यक आहे. तरच या भागातील नागरिकांना न्याय मिळणार आहे. तसेच ज्यांनी मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकामे, गोडाऊन केले आहेत त्यांच्याकडून कारवाईचा खर्च व दंड वसूल करणेदेखील अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीnewsबातम्या