शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्याकडे दुर्लक्ष, वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:29 IST

व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर हे अंतर अंदाजे दीड कि.मी., मात्र सकाळी किंवा संध्याकाळी हे अंतर जर तुम्हाला पार करायचे असेल तर यासाठी लागतात दीड तास. होय हे खरे आहे. या भागातील राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक वर्षांपासून या भागातील या रस्त्यावरून प्रवास करणारे लाखो नागरिक हा त्रास सहन करीत आहेत.

- अभिजित डुंगरवालबिबवेवाडी  - व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर हे अंतर अंदाजे दीड कि.मी., मात्र सकाळी किंवा संध्याकाळी हे अंतर जर तुम्हाला पार करायचे असेल तर यासाठी लागतात दीड तास. होय हे खरे आहे. या भागातील राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक वर्षांपासून या भागातील या रस्त्यावरून प्रवास करणारे लाखो नागरिक हा त्रास सहन करीत आहेत.पुणे-स्टेशनपासून कात्रज-कोंढवा रस्त्याला जोडणारा हा ८० फुटी रस्ता आईमाता मंदिरापासून व्हीआयटी चौकापर्यंत फक्त २० फुटी शिल्लक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनीराजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने उभारण्यात आलेले मंगलकार्यालयाचे पार्किंग व गोडाऊन यामुळे या रस्त्याला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. पालिकेचा बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्यातील एकाही अधिकाऱ्यामध्ये हे धाडस नाही, की ते या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकतील व आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतील.या प्रत्येक अतिक्रमणामध्ये राजकीय नेते व अधिकारी यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, म्हणूनच रस्त्यावरील एकाही मंगलकार्यालय किंवा गोडाऊनवर कारवाई करून रस्ता मोकाळा करून दाखवण्याचे धाडस पालिकेचे अधिकारी दाखवत नाहीत हे या भागातील वास्तव आहे.पालिकेला आता नवीन आयुक्त येणार आहेत. त्यांनी तरी येथील राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी न पडता, येथील प्रत्येक नागरिकाशी निगडित असलेला हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी येथील लाखो सामान्य नागरिक करीत आहेत.वाहतूक पोलीस पावती फाडण्यासाठीचया रस्त्यावर सहकारनगर वाहतूक विभागाचे चार-पाच कर्मचारी दिवसभर उभे असतात, मात्र ते येथील वाहतूककोंडी सोडवायची सोडून वरिष्ठांकडून आलेले पावतीचे टार्गेट पूर्ण करण्यामध्येच व्यस्त दिसतात. वाहतूक विभागाने पुण्यातील सर्वात मोठा वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पावती फाडण्यासाठी वेगळे पोलीस व वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वेगळे पोलीस अशी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तरच पुण्यातील वाहतूककोंडी सुटण्यामध्ये वाहतूक पोलिसांचा हातभार लागेल.कोर्टातील स्टेवर आयुक्तांनी लक्ष द्यावेया भागातील अनेक गोडाऊनवाल्यांनी कोर्टात जाऊन अतिक्रमणे पाडू नये यासाठी स्टेचा आधार घेतलेला आहे. कोर्टाचा स्टे असल्यामुळे अतिक्रमण विभागाला कारवाई करता येत नाही. मात्र हा गोडाऊन उभारलेला भाग हिल टॉप-हिल स्लोप आहे.कायद्याप्रमाणे या भागात एक हजार फुटाच्या भूखंडावर फक्त ४० फूट बांधकाम करता येते, तेही प्लॅनपास केल्यावर. त्यामुळे पहिल्याच तारखेला अनधिकृत रस्त्यावर गोडाऊन बांधणाºयाचा स्टे उठणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नाही.तारीख पे तारीख पुढे सुरू आहे. स्टेच्या विरोधात पालिकेने पूर्ण ताकदीने आता कोर्टासमोर बाजू मांडणे आवश्यक आहे. तरच या भागातील नागरिकांना न्याय मिळणार आहे. तसेच ज्यांनी मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकामे, गोडाऊन केले आहेत त्यांच्याकडून कारवाईचा खर्च व दंड वसूल करणेदेखील अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीnewsबातम्या