शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

नगर नियोजन विभाग ‘भुक्कड’ - गडकरींचा मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 06:43 IST

शहराचे नियोजन करण्यासाठी २०-२० वर्षे लावणारा नगर नियोजन हा विभागच होपलेस आहे, असली भुक्कड संस्था मी आजवर पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या अख्यतारीत असलेल्या नगर विकास खात्यावर निशाणा साधला.

पुणे : शहराचे नियोजन करण्यासाठी २०-२० वर्षे लावणारा नगर नियोजन हा विभागच होपलेस आहे, असली भुक्कड संस्था मी आजवर पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या अख्यतारीत असलेल्या नगर विकास खात्यावर निशाणा साधला.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने चांदणी चौकातील उड्डाण पुलासह पुणे जिल्ह्यातील १६ हजार ४३० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे गडकरी यांच्या हस्ते कोनशिला अनावरण व लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ‘‘पुण्याच्या विकासाचा विचार तुकड्या-तुकड्यामध्ये न करता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्हा यांचा एकत्रित केला पाहिजे. त्यासाठी व्हिजन तयार केले पाहिजे. नगर नियोजन वगैरे होपलेस आहेत, अशी भुक्कड संस्था मी पाहिलेली नाही. नियोजनाचा आराखडा तयार करण्यासाठी २०-२० वर्षे लावली जातात. सिंगापूर प्लॅनिंग आॅथरिटीसारख्या एजन्सीकडून विकास आराखडा तयार करून घेतला पाहिजे. बाहेरच्या संस्थेकडून पुण्याचा डेव्हलपमेंट प्लान तयार केला तर मुख्यमंत्री त्याला नक्की परवानगी देतील. आतापासून नियोजन केले तर प्रश्न सुटतील.’’ मी आणि मुख्यमंत्री विदर्भाचे असलो तरी आमचे पश्चिम महाराष्टÑाकडेही लक्ष असल्याचे गडकरी या वेळी म्हणाले....अन् शरदपवार यांनी दुरुस्ती केलीकेंद्रात गडकरी यांच्याकडे आम्ही सातत्याने मागण्या घेऊन चाललो आहोत. त्यामुळे एकट्या महाराष्टÑाचे किती प्रस्ताव मंजूर करू, अशी विचारणा ते करीत असल्याचे चंद्रकांत पाटील भाषणात म्हणाले होते. तो धागा पकडत शरद पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी विकासकामांसाठी निधीची मागणी करताना कंजुषी करतात, असे गडकरी यांनीच नागपूरमध्ये भाषणात सांगितले होते. त्यामुळे निधीची मागणी करताना कुठलाही संकोच करू नये. गडकरी यांनी केंद्रात कर्तृत्वाचा ठसा उमटल्याचे गौरवोद्गार पवारांनी काढले.अधिकारी काम करीत नाहीतहीच समस्याविकास योजनांसाठीआता मुबलक पैसा उपलब्ध आहे. शेअर बाजारातून कर्जरोख्यांद्वारेही यासाठी निधी उपलब्ध होत आहे.मात्र आता पैसा ही समस्या नसून अधिकारी कामचकरीत नाही ही खरी समस्या आहे अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस