शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदनगरमधील नागरिक सापांमुळे झालेत भयभीत; उद्योगनगरीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 12:49 IST

गवताचे वाढलेले प्रमाण, अस्वच्छता व प्रत्येक वसाहतीत आलेले जंगलाचे स्वरूप यामुळे उंदरांनी घातलेला धुमाकूळ, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उपद्रवामुळे वालचंदनगर येथील नागरिक भयभीत झालेले आहेत.

ठळक मुद्देवाढलेल्या गवतामुळे उंदरांचा सुळसुळाट, विषारी सापांची संख्याही वाढलीशहरातील कॉलनीकडे कंपनी व्यवस्थापक मंडळाचे दुर्लक्ष

वालचंदनगर : वालचंदनगर शहरातील गवताचे वाढलेले प्रमाण, अस्वच्छता व प्रत्येक वसाहतीत आलेले जंगलाचे स्वरूप यामुळे उंदरांनी घातलेला धुमाकूळ, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उपद्रवामुळे येथील नागरिक भयभीत झालेले आहेत. घोणस, नाग, मन्यार अशा विषारी सापाचे वाढलेले प्रमाणामुळे वालचंदनगर शहर नावाऐवजी सर्पनगरी नावाने ओळखले जावे, असे लेखी निवेदन कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकारी जे. के. पिल्लाई यांना देण्यात आलेले आहे. वालचंदनगर शहराची स्थापना शंभर वर्षापूर्वी वालचंद हिराचंद दोशी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केली. कामगारांच्या हितासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणारा देशातील पहिले शहर म्हणून वालचंदनगर शहराची ओळख आहे. या शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, दवाखाने सर्वच काळजी घेण्यात आलेले होते. परंतु कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाच्या दुर्लक्षामुळे वालचंदनगर शहरात जंगलाचे स्वरूप आलेले आहे. प्रत्येक कॉलनीत वाढलेल्या गवतामुळे उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे विषारी सापांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. परिसरात विषारी सर्प आढळून येत आहेत. या शहरातील कॉलनीकडे व्यवस्थापक मंडळाचे दुर्लक्ष झाल्याने अनेक खोल्यांची पडझड झालेली आहे. यामुळे हिंस्र प्राण्यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वालचंदनगर शहराचे वैभव या व्यवस्थापकीय मंडळीने नामशेष करण्याचा सपाटा लावल्याने वालचंदनगर नावाने ओळखण्याऐवजी सर्पनगरी या नावाने ओळखण्याची वेळ आलेले आहे. त्वरित या शहरातील प्रत्येक कॉलनीतील गवताचे वाढलेले प्रमाण काढण्यात यावे व येथे स्वच्छता करण्यात यावी अन्यथा कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महादेव मिसाळ यांनी दिला आहे.

टॅग्स :Puneपुणे