शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बारामती-पाटस रस्त्यावर नागरिकांनी अनुभवला '' बर्निंग ट्रक'' चा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 16:41 IST

भरधाव वेगाने जाणाऱ्या कापुस भरलेला माल वाहतूक ट्रक अचानक पेट घेतल्याने जळुन खाक झाला.

बारामती:  बारामती-पाटस रस्त्यावर सोमवारी(दि २९) वाहनचालक आणि नागरिकांनी बर्निंग ट्रक चा थरार अनुभवला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कापुस भरलेला माल वाहतूक ट्रक उंडवडी सुपे गावच्या हद्दीतील जानाई मळ्याजवळ अचानक पेट घेतल्याने जळुन खाक झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. माल ट्रकने (क्रमांक एम.पी ०९ एच.एच ७८५१) आज (सोमवारी ) पहाटे पाचच्या सुमारास पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने जात असताना अचानक उंडवडी सुपे येथे आल्यानंतर भर रस्त्यातच पेट घेतला.मात्र,ट्रकचालकाला याची माहिती नव्हती.त्यामुळे रस्त्यावरुन पेटलेला ट्रक धावत होता.सुदैवाने यावेळी ट्रक पेटल्याचे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या इतर वाहन चालकांनी आपली वाहने थांबवून संबंधित ट्रक चालकाला इशारे करुन सांगितले.

यावेळी गोंधळलेल्या,घाबरलेल्या चालकाने ट्रक बाजुला घेतला.यावेळी ट्रक बाभळीच्या झाडावर गेल्याने गाडीबरोबर झाड देखील  जळुन खाक झाले. घटनेनंतर ट्रकचालक पळुन गेल्याने त्याचे नाव समजु शकले नाहि. प्रसंगावधान राखून ट्रक थांबवून गाडीतून वेळीच बाहेर पडल्याने चालक बचावला. ट्रक काही वेळातच पेटलेल्या ज्वाळांनी वेढला.यामध्ये ट्रक जळुन खाक झाला.त्यामुळे ट्रकमध्ये माल म्हणून कापूस भरला असावा,असा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी गर्दी स्थानिक ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ग्रामस्थांनीच सुपे पोलिसाना फोन करुन माहिती दिली.यावेळी काही वेळातच पोलिस घटनास्थळावर पोहचले. या घटनेनंतर एक - दीड तास रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संबंधित ट्रकची आग विझल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. गाडी पेटल्याची माहिती येथील नागरीक शरद तावरे यांनी पोलीस पाटिल व पत्रकारांना दिली . ट्रकला लागलेली आग विझविण्यासाठी बारामती एमआयडीसीची अग्निशमन दलाची गाडीने विझविण्याचा प्रयत्न केला. आग मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचा मोठा भडका होत असल्याने आग आटोक्यात आणण्यास अपयश आले. बारामती नगरपालिकेची आणखी एक अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली.

टॅग्स :Baramatiबारामतीfireआग