शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अवैध रिक्षा वाहतूक करणाऱ्यांना कायदेशीर नोंदणी करण्याची संधी, आमदार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 18:07 IST

अवैध रिक्षा वाहतूक करणाऱ्यांना कायदेशीर नोंदणी करण्यास संधी देण्यात आली असून हि नोंदणी मार्च २०१८ पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली.

चाकण - अवैध रिक्षा वाहतूक करणाऱ्यांना कायदेशीर नोंदणी करण्यास संधी देण्यात आली असून हि नोंदणी मार्च २०१८ पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली.

आमदार सुरेश गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने परिपत्रक काढून वाहनांची कायदेशीर नोंदणी करण्यास मार्च २०१८ पर्यंत मुदत दिली आहे. दि.३१ मार्च २०१८ नंतर वाहनांवर होणाऱ्या कार्यवाहीबाबत कोणत्याही प्रकारची विनंती विचारात घेतली जाणार नसल्याने ३१ मार्चपूर्वीच वाहन चालकांना हि कायदेशीर नोंदणी करावी लागणार आहे. खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. अशी वाहतूक करताना बेकायदेशीर / सफेद नंबर प्लेट असलेल्या रिक्षांचे अपघात झाल्यास त्यात मुत्युमुखी पडलेल्या अथवा जखमी झालेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचेकडे अनेकदा व्यथा मांडून या समस्येकडे लक्ष वेधून घेतले. तसेच अधिवेशनामधे सभागृहात सदर विषय विविध मार्गाने मांडला होता.

तरुणांना रोजगार टिकावा यासाठी अशा प्रकारची अवैध प्रवासी वाहने कायदेशीर करण्यासाठी आमदार सुरेश गोरे यांच्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने परिवहन मंत्री यांनी शासन निर्णय काढून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सदर शासन निर्णयानुसार अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षा अथवा इतर प्रवासी वाहनांना कायमस्वरूपी कायदेशीर करण्याकरिता परिवहन विभागामधे नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी वाहनाच्या वयानुसार नोंदणीकरिता विशिष्ट शुल्क ठरवून दिले आहे. या शासन निर्णयाद्वारे बेकायदेशीर /अवैध प्रवासी वाहनांना कायदेशीर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता मार्च २०१८ पर्यंत मुदत दिली आहे.

  महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ चा नियम, २०१७ या नियमानुसार खालील प्रमाणे परवाना शुल्क आकारण्यात येईल.

१) ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून एक वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असल्यास, १००० रुपये२)  ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून एक वर्षापेक्षा अधिक आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला असल्यास २००० रुपये३) ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून दोन वर्षापेक्षा अधिक आणि तीन वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला असल्यास ३००० रुपये४) ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून तीन वर्षापेक्षा अधिक आणि चार वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला असल्यास ४०००रुपये५) ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून चार वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असल्यास ५००० रुपये