शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कुरकुंभकरांचा गुदमरतोय श्वास ! औद्योगिक क्षेत्रातील वायू प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 02:52 IST

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी सुधारणेचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. येथील टायर जाळण्याच्या प्रक्रिया उद्योगामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.

कुरकुंभ - कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी सुधारणेचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. येथील टायर जाळण्याच्या प्रक्रिया उद्योगामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनीक प्रकल्पात रासायनिक व इंजिनीअरिंग असे दोन विभाग करण्यात आले आहेत. ग्रामस्थ व नागरिकांनी वारंवार तक्रारी करु नही प्रदुषणाला आळा घालण्याकडे कंपनी कानाडोळा करीत आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे.या प्रकल्पातून उत्पादित होणारे वायू प्रदूषण रोखण्याचे नवीन आव्हा न उभे ठाकले आहे. मागील ३० वर्षांपासून या घातक प्रक्रियेतून उत्सर्जित होणाऱ्या वायुमुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रदुषित हवेचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. कुरकुंभच्या लोकवस्तीपासून अगदी जवळच टायर जाळण्याच्या दोन कंपन्यांना परवानगी दिली गेली आहे. यामध्ये रोज जवळपास वीस टन टायर जाळले जातात. त्यापासून उत्सर्जित होणा-या काळ्या धुरापासून व त्यामधून निघणाºया प्राणघातक वायूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कुरकुंभ परिसरात जाणवत आहे.औद्योगिक परिसरातील विविध कंपनीतील प्रदूषणाचा प्रश्न सध्या खूप भेडसावत आहे. कंपन्या अगदीच गावालगत असल्याने याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. नागरिकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवून तालुक्यातील राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वापरून सामान्य नागरिकांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतच्या मासिक सभेत कंपनीला बंद करण्याचा ठराव घेण्यात आला असून कंपनी मालकांना तो पाठवण्यात आला आहे- रशीद मुलाणी,प्रभारी सरपंच, कुरकुंभकंपनीच्या आसपासच्या भागातील परिसर काळवंडलाटायर जाळण्याच्या प्रक्रियेच्या कंपन्या इंजिनिअरिंग झोनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना परवाना देताना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने संपूर्ण परिसराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊनच परवाना देणे आवश्यक होते. कंपनीच्या माध्यमातून होणाºया वायू प्रदूषणाच्या तक्रारी आल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांशी चर्चा झाली असून त्यांना तत्काळ याबाबत निर्णय घेण्याबाबत सांगितले आहे.- विजय पेटकर, उपअभियंता अधिकारी,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कुरकुंभ

टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषणnewsबातम्या