शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

कुरकुंभकरांचा गुदमरतोय श्वास ! औद्योगिक क्षेत्रातील वायू प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 02:52 IST

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी सुधारणेचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. येथील टायर जाळण्याच्या प्रक्रिया उद्योगामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.

कुरकुंभ - कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी सुधारणेचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. येथील टायर जाळण्याच्या प्रक्रिया उद्योगामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनीक प्रकल्पात रासायनिक व इंजिनीअरिंग असे दोन विभाग करण्यात आले आहेत. ग्रामस्थ व नागरिकांनी वारंवार तक्रारी करु नही प्रदुषणाला आळा घालण्याकडे कंपनी कानाडोळा करीत आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे.या प्रकल्पातून उत्पादित होणारे वायू प्रदूषण रोखण्याचे नवीन आव्हा न उभे ठाकले आहे. मागील ३० वर्षांपासून या घातक प्रक्रियेतून उत्सर्जित होणाऱ्या वायुमुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रदुषित हवेचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. कुरकुंभच्या लोकवस्तीपासून अगदी जवळच टायर जाळण्याच्या दोन कंपन्यांना परवानगी दिली गेली आहे. यामध्ये रोज जवळपास वीस टन टायर जाळले जातात. त्यापासून उत्सर्जित होणा-या काळ्या धुरापासून व त्यामधून निघणाºया प्राणघातक वायूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कुरकुंभ परिसरात जाणवत आहे.औद्योगिक परिसरातील विविध कंपनीतील प्रदूषणाचा प्रश्न सध्या खूप भेडसावत आहे. कंपन्या अगदीच गावालगत असल्याने याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. नागरिकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवून तालुक्यातील राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वापरून सामान्य नागरिकांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतच्या मासिक सभेत कंपनीला बंद करण्याचा ठराव घेण्यात आला असून कंपनी मालकांना तो पाठवण्यात आला आहे- रशीद मुलाणी,प्रभारी सरपंच, कुरकुंभकंपनीच्या आसपासच्या भागातील परिसर काळवंडलाटायर जाळण्याच्या प्रक्रियेच्या कंपन्या इंजिनिअरिंग झोनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना परवाना देताना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने संपूर्ण परिसराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊनच परवाना देणे आवश्यक होते. कंपनीच्या माध्यमातून होणाºया वायू प्रदूषणाच्या तक्रारी आल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांशी चर्चा झाली असून त्यांना तत्काळ याबाबत निर्णय घेण्याबाबत सांगितले आहे.- विजय पेटकर, उपअभियंता अधिकारी,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कुरकुंभ

टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषणnewsबातम्या