शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

चौक्यांची सरंजामशाही संपणार

By admin | Updated: January 18, 2015 01:17 IST

पोलीस चौकीस्तरावर तक्रार घेण्यासाठी होणारी टाळाटाळ रोखण्यासाठी यापुढे केवळ पोलीस ठाण्यातच दखलपात्र गुन्हे दाखल करून घेतले जाणार आहेत.

पुणे : पोलीस चौकीस्तरावर तक्रार घेण्यासाठी होणारी टाळाटाळ रोखण्यासाठी यापुढे केवळ पोलीस ठाण्यातच दखलपात्र गुन्हे दाखल करून घेतले जाणार आहेत. भोसरी एमआयडीसीतील एका युवतीच्या छेडछाडीच्या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे तिला आत्महत्येचा प्रयत्न करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. या निर्णयामुळे पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसमोर तक्रारदार आपली कैफियत मांडू शकणार आहेत. तसेच, पोलीस चौक्यांच्या सरंजामशाहीलाही चाप बसणार आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनीही असाच निर्णय घेतला होता. त्याला काही प्रमाणात विरोधही झाला होता. परंतु, अनेकदा पोलीस चौकीस्तरावर काय सुरू आहे, याची माहितीच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तसेच, पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचारी तक्रार घेत असल्यामुळे त्यामधील त्रुटींचा फायदा आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होतो. कायद्यानुसार दखलपात्र गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसमोर होणे बंधनकारक आहे. मात्र, चौकीमधील घडामोडींची माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. अनेकदा शहर पोलीस नियंत्रण कक्षाकडून बीट मार्शलला (गस्त) कळवलेली माहिती पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे यापुढे केवळ पोलीस ठाण्यातच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा सूचना दिल्या. मार्चपर्यंत सीसीटीएनएस यंत्रणेद्वारे कामकाज करायला सुरुवात करावी, असे आदेश असल्यामुळे या निमित्ताने पोलीस ठाणे स्तरावर त्याचाही सराव सुरू होईल. ४येत्या २६ जानेवारीला दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. तसेच जर्मनी, अमेरिका आणि पॅरिसमध्ये घडलेल्या दहशवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन संजय कुमार यांनी केले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयास्पद व्यक्ती, संशयास्पद साहित्य आढळून आल्यास त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. प्रजासत्ताक दिनाला शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.