शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Children' s Day : बालदिन म्हंजी काय ओ दादा..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 19:31 IST

सूर्य उगवला की रस्त्यावर आणि मावळला की फुटपाथवर..एवढ्या छोट्या जीवनरेषेत सामावलेली ही बंदिस्त मंडळी...

निशांत वाकोडे -  

पुणे: काही मुलांच्या आयुष्यातला ' बालदिन ' हा आकर्षक गिफ्ट,बागेतली मज्जा, भरपेट खाऊ, तसेच सहली यांनी समृध्द असतो. तर दुसरीकडे आभाळाचे छत , अंग झाकण्या इतपत देखील अपुरे कपडे, आयुष्याची दिशा सिग्नल, बसस्थानके , रेल्वेस्टेशन, यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांपुरतीच मर्यादित , यातना आणि अवहेलनेच्या चटक्यांसह रिकाम्या हातावर जे काही चार दोन रुपये , खाण्याच्या वस्तू पडतील ते स्विकारुन दोन घासांची सोय करत 'बाल दिन ' साजरा करणारे देवाघरची फुले..अर्थात त्या चिमुरड्यांना कुठे ठाऊक असेल बालदिन. त्यांचं आपलं सूर्य उगवला की रस्त्यावर आणि मावळला की फुटपाथवर.. एवढी छोटी जीवनरेषेने बंदिस्त मंडळीच्या ओठी एकच प्रश्न होता तो म्हणजे..बालदिन म्हंजी काय ओ.. दादा.?   बालदिन म्हणजे काय.? तो १४ नोव्हेंबर लाच का साजरा करतात, अशी सर्व माहिती त्यांना आजपर्यंत कुणी सांगितली पण नाही. आणि समजा चुकून कुणी दिलीही असेल तरी वर्षभर लक्षात राहण्याचे काही कारण नाही.. त्यांना ती माहिती करुन घेण्याची गरजही कधी पडली नाही. पण अशा काही मंडळींशी बालदिनाच्या निमित्ताने लोकमत प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यात ही छोटी छोटी चिमुरडी मुले, त्यांचे कुटुंब गाव, नातेवाईक यांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात वास्तव्याला येतात. त्यातील काही लोक हे युपी ,बिहारचे आहेत .तिकडे पुरेसा रोजगार नाही, स्वत:च्या हक्काची घरे नाही, शिक्षणाचा अभाव , आरोग्याच्या अपुऱ्या सोयी, कमी वयात मुला मुलींचे होणारे लग्न आणि त्यातून त्यांना होणारे अपत्य ही या देशाच्या नागरिकांची दयनीय अवस्था. या सर्व परिस्थितीत अठरा विश्व दारिद्रयाला सोबती घेत ही मंडळी रोजचा दिवस फक्त पुढे ठकलत असतात. हीच यांची दिशा राहिली तर भविष्याविषयी काय बोलणार..         शिक्षणापासून वंचित असलेली ही चिमुरडी बालके वर्षानुवर्षे त्याच अवस्थेत जगत राहतात. पुढे मग त्यांचा गुन्हेगारी, अवैध धंदे, चोऱ्या यात उपयोग होवू लागतो. दोन पैशांच्या कमाईसाठी ते रोजचे २४ तास आणि संपूर्ण आयुष्य भीतीच्या छायेखाली जगू लागतात. काही दिवसांनी ही अल्पवयीन मुले इतकी असंवेदनशील होतात की आपण काय करतोय, त्याचे भविष्यात जीवनावर किती भयानक परिणाम होणार आहे याचे जरासेही भानही त्यांना राहत नाही. परंतु, हा प्रश्न असाच सुरु राहील विना उत्तर कुणी पुढेच आले नाही तर.. कुठेतरी त्या मुलांच्या भवितव्याची पूर्ण नाही पण ५०- ५० टक्के जबाबदारी उचलली तर काहीतरी मार्ग निघू शकतो. सामाजिक बांधिलकी , संवेदनशील मन यांनी ही दरी नक्की भरुन येईल.काहीजण अशाच अंधारलेल्या वाटेवर शिक्षणाचा प्रकाशदिवा लावत हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत वेगवेगळ्या क्षेत्रात यशाचा झेंडा फडकविणाऱ्या मुलांची नावे झळकल्याची उदाहरणे देखील समाजात पाहायला मिळत आहे....  

टॅग्स :Puneपुणेchildren's dayबालदिन