शहरं
Join us  
Trending Stories
1
"'मी गौमांस खातो, कोण मला आडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवण करतायेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
2
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
3
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
5
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
6
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
7
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
8
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
9
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
10
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
11
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
12
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
13
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
14
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
15
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
16
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
17
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
18
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
19
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
20
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

Children' s Day : बालदिन म्हंजी काय ओ दादा..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 19:31 IST

सूर्य उगवला की रस्त्यावर आणि मावळला की फुटपाथवर..एवढ्या छोट्या जीवनरेषेत सामावलेली ही बंदिस्त मंडळी...

निशांत वाकोडे -  

पुणे: काही मुलांच्या आयुष्यातला ' बालदिन ' हा आकर्षक गिफ्ट,बागेतली मज्जा, भरपेट खाऊ, तसेच सहली यांनी समृध्द असतो. तर दुसरीकडे आभाळाचे छत , अंग झाकण्या इतपत देखील अपुरे कपडे, आयुष्याची दिशा सिग्नल, बसस्थानके , रेल्वेस्टेशन, यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांपुरतीच मर्यादित , यातना आणि अवहेलनेच्या चटक्यांसह रिकाम्या हातावर जे काही चार दोन रुपये , खाण्याच्या वस्तू पडतील ते स्विकारुन दोन घासांची सोय करत 'बाल दिन ' साजरा करणारे देवाघरची फुले..अर्थात त्या चिमुरड्यांना कुठे ठाऊक असेल बालदिन. त्यांचं आपलं सूर्य उगवला की रस्त्यावर आणि मावळला की फुटपाथवर.. एवढी छोटी जीवनरेषेने बंदिस्त मंडळीच्या ओठी एकच प्रश्न होता तो म्हणजे..बालदिन म्हंजी काय ओ.. दादा.?   बालदिन म्हणजे काय.? तो १४ नोव्हेंबर लाच का साजरा करतात, अशी सर्व माहिती त्यांना आजपर्यंत कुणी सांगितली पण नाही. आणि समजा चुकून कुणी दिलीही असेल तरी वर्षभर लक्षात राहण्याचे काही कारण नाही.. त्यांना ती माहिती करुन घेण्याची गरजही कधी पडली नाही. पण अशा काही मंडळींशी बालदिनाच्या निमित्ताने लोकमत प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यात ही छोटी छोटी चिमुरडी मुले, त्यांचे कुटुंब गाव, नातेवाईक यांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात वास्तव्याला येतात. त्यातील काही लोक हे युपी ,बिहारचे आहेत .तिकडे पुरेसा रोजगार नाही, स्वत:च्या हक्काची घरे नाही, शिक्षणाचा अभाव , आरोग्याच्या अपुऱ्या सोयी, कमी वयात मुला मुलींचे होणारे लग्न आणि त्यातून त्यांना होणारे अपत्य ही या देशाच्या नागरिकांची दयनीय अवस्था. या सर्व परिस्थितीत अठरा विश्व दारिद्रयाला सोबती घेत ही मंडळी रोजचा दिवस फक्त पुढे ठकलत असतात. हीच यांची दिशा राहिली तर भविष्याविषयी काय बोलणार..         शिक्षणापासून वंचित असलेली ही चिमुरडी बालके वर्षानुवर्षे त्याच अवस्थेत जगत राहतात. पुढे मग त्यांचा गुन्हेगारी, अवैध धंदे, चोऱ्या यात उपयोग होवू लागतो. दोन पैशांच्या कमाईसाठी ते रोजचे २४ तास आणि संपूर्ण आयुष्य भीतीच्या छायेखाली जगू लागतात. काही दिवसांनी ही अल्पवयीन मुले इतकी असंवेदनशील होतात की आपण काय करतोय, त्याचे भविष्यात जीवनावर किती भयानक परिणाम होणार आहे याचे जरासेही भानही त्यांना राहत नाही. परंतु, हा प्रश्न असाच सुरु राहील विना उत्तर कुणी पुढेच आले नाही तर.. कुठेतरी त्या मुलांच्या भवितव्याची पूर्ण नाही पण ५०- ५० टक्के जबाबदारी उचलली तर काहीतरी मार्ग निघू शकतो. सामाजिक बांधिलकी , संवेदनशील मन यांनी ही दरी नक्की भरुन येईल.काहीजण अशाच अंधारलेल्या वाटेवर शिक्षणाचा प्रकाशदिवा लावत हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत वेगवेगळ्या क्षेत्रात यशाचा झेंडा फडकविणाऱ्या मुलांची नावे झळकल्याची उदाहरणे देखील समाजात पाहायला मिळत आहे....  

टॅग्स :Puneपुणेchildren's dayबालदिन