शहरं
Join us  
Trending Stories
1
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2
कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
5
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
6
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
7
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
8
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
9
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
10
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
11
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
12
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
13
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
14
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
15
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
16
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
17
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
18
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
19
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
20
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर

Children' s Day : बालदिन म्हंजी काय ओ दादा..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 19:31 IST

सूर्य उगवला की रस्त्यावर आणि मावळला की फुटपाथवर..एवढ्या छोट्या जीवनरेषेत सामावलेली ही बंदिस्त मंडळी...

निशांत वाकोडे -  

पुणे: काही मुलांच्या आयुष्यातला ' बालदिन ' हा आकर्षक गिफ्ट,बागेतली मज्जा, भरपेट खाऊ, तसेच सहली यांनी समृध्द असतो. तर दुसरीकडे आभाळाचे छत , अंग झाकण्या इतपत देखील अपुरे कपडे, आयुष्याची दिशा सिग्नल, बसस्थानके , रेल्वेस्टेशन, यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांपुरतीच मर्यादित , यातना आणि अवहेलनेच्या चटक्यांसह रिकाम्या हातावर जे काही चार दोन रुपये , खाण्याच्या वस्तू पडतील ते स्विकारुन दोन घासांची सोय करत 'बाल दिन ' साजरा करणारे देवाघरची फुले..अर्थात त्या चिमुरड्यांना कुठे ठाऊक असेल बालदिन. त्यांचं आपलं सूर्य उगवला की रस्त्यावर आणि मावळला की फुटपाथवर.. एवढी छोटी जीवनरेषेने बंदिस्त मंडळीच्या ओठी एकच प्रश्न होता तो म्हणजे..बालदिन म्हंजी काय ओ.. दादा.?   बालदिन म्हणजे काय.? तो १४ नोव्हेंबर लाच का साजरा करतात, अशी सर्व माहिती त्यांना आजपर्यंत कुणी सांगितली पण नाही. आणि समजा चुकून कुणी दिलीही असेल तरी वर्षभर लक्षात राहण्याचे काही कारण नाही.. त्यांना ती माहिती करुन घेण्याची गरजही कधी पडली नाही. पण अशा काही मंडळींशी बालदिनाच्या निमित्ताने लोकमत प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यात ही छोटी छोटी चिमुरडी मुले, त्यांचे कुटुंब गाव, नातेवाईक यांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात वास्तव्याला येतात. त्यातील काही लोक हे युपी ,बिहारचे आहेत .तिकडे पुरेसा रोजगार नाही, स्वत:च्या हक्काची घरे नाही, शिक्षणाचा अभाव , आरोग्याच्या अपुऱ्या सोयी, कमी वयात मुला मुलींचे होणारे लग्न आणि त्यातून त्यांना होणारे अपत्य ही या देशाच्या नागरिकांची दयनीय अवस्था. या सर्व परिस्थितीत अठरा विश्व दारिद्रयाला सोबती घेत ही मंडळी रोजचा दिवस फक्त पुढे ठकलत असतात. हीच यांची दिशा राहिली तर भविष्याविषयी काय बोलणार..         शिक्षणापासून वंचित असलेली ही चिमुरडी बालके वर्षानुवर्षे त्याच अवस्थेत जगत राहतात. पुढे मग त्यांचा गुन्हेगारी, अवैध धंदे, चोऱ्या यात उपयोग होवू लागतो. दोन पैशांच्या कमाईसाठी ते रोजचे २४ तास आणि संपूर्ण आयुष्य भीतीच्या छायेखाली जगू लागतात. काही दिवसांनी ही अल्पवयीन मुले इतकी असंवेदनशील होतात की आपण काय करतोय, त्याचे भविष्यात जीवनावर किती भयानक परिणाम होणार आहे याचे जरासेही भानही त्यांना राहत नाही. परंतु, हा प्रश्न असाच सुरु राहील विना उत्तर कुणी पुढेच आले नाही तर.. कुठेतरी त्या मुलांच्या भवितव्याची पूर्ण नाही पण ५०- ५० टक्के जबाबदारी उचलली तर काहीतरी मार्ग निघू शकतो. सामाजिक बांधिलकी , संवेदनशील मन यांनी ही दरी नक्की भरुन येईल.काहीजण अशाच अंधारलेल्या वाटेवर शिक्षणाचा प्रकाशदिवा लावत हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत वेगवेगळ्या क्षेत्रात यशाचा झेंडा फडकविणाऱ्या मुलांची नावे झळकल्याची उदाहरणे देखील समाजात पाहायला मिळत आहे....  

टॅग्स :Puneपुणेchildren's dayबालदिन