शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

संभाजी महाराजांनी असीम शौर्याने अन् बलिदान देऊन हिंदवी स्वराज्य सुरक्षित राखले- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 15:36 IST

मुसंडी कशी मारायची याचा धडा शिवाजी महाराजांनी जगाला घालून दिला, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज किल्ले पुरंदरला भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र आदरांजली अर्पण केली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या येणार्‍या जयंतीच्या निमित्ताने येथील स्मारक आणि संग्रहालयाला भेट दिली. संग्रहालयातील छायाचित्रे पाहून आपला देदीप्यमान इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला, असं शरद पवारांनी फेसबुकद्वारे पोस्ट करुन सांगितलं. 

शरद पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं की, सह्याद्रीच्या कुशीत आकाराला येणाऱ्या हिंदवी स्वराज्यासाठी भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा हा पुरंदर किल्ला. विजापूरहून आक्रमण झाले असता स्वराज्याच्या वाटेवरील हा पहिला अडसर होता. वयाच्या १८ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तो स्वराज्यात सामील केला आणि आदिलशाहीला खडबडून जाग आली. पुरंदर ताब्यात घेण्यासाठी आदिलशाहाने १६४८ साली फत्तेखान नावाचा सरदार विजापूरहून दोन हजारांच्या सैन्यानिशी धाडला. शिवाजीराजे आणि गोदाजी जगतापांसारख्या शूर मावळ्यांनी फत्तेखानाला पळवून लावला.

बाजी पासलकरांनी खानाच्या बेलसरवरील तळावर चढाई केली. अटीतटीच्या लढाईत वीरमरण पत्करले पण स्वराज्याचे निशाण खाली पडू दिले नाही. महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा मनसुबा स्वराज्याच्या पहिल्या लढाईने दिल्लीच्या बादशाहला देखील समजला. पुरंदरचे दुसरे युद्ध ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले जाते. १६६५ साली मुघल सेनापती मिर्झाराजे जयसिंह याच्या नेतृत्वाखाली  दिलेरखानाने ह्या किल्ल्याला वेढा दिला. पुरंदर किल्ल्यावर महाकाय तोफांचा भडिमार केला. किल्लेदार मुरारबाजी देशपांडे ६० मावळ्यांसह ५०० पठाणी सैन्यात त्वेषाने घुसले. मुरारबाजींचा महापराक्रम पाहून दिलेरखानाने तोंडात बोटे घातली. मोगलांची चाकरी करण्यापेक्षा स्वराज्यासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. 

पुरंदरच्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांना मानहानीकारक तह करावा लागला. परंतु अपयशाने खचून न जाता, ध्येयावरील चित्त ढळू न देता मुसंडी कशी मारायची याचा धडा शिवाजी महाराजांनी जगाला घालून दिला. मुघल फौज भिमथडी ओलांडून स्वराज्याच्या वेशीवर धडकू नये म्हणून महाराजांनी नाशिकच्या उत्तरेकडील बागलाण प्रांत काबीज केला. बागलाणातील प्रतिकारानंतरही ते मावळापर्यंत पोहोचले तर स्वराज्याच्या सीमा जिंजी-तंजावरपर्यंत न्याव्यात म्हणून महाराजांनी दक्षिण दिग्विजय घडवला. पुरंदरच्या तहाने हिंदवी स्वराज्य विस्ताराचा असा पाया घातला. ह्याच पुरंदरावर १४ मे १६५७ रोजी स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म झाला. संभाजी महाराजांनी असीम शौर्याने आणि बलिदान देऊन हिंदवी स्वराज्य सुरक्षित राखले, असं शरद पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज