शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

काळानुसार चित्रपटांचा चेहरा बदलतोय : शर्मिला टागोर; पुण्यात सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 11:59 IST

सिंंबायोसिस संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व अभिनेत्री श्रीमती शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीत झाले.

ठळक मुद्दे‘शर्मिला टागोर संगीत रजनी’तून उलगडला शर्मिला टागोर यांचा सुवर्णकाळ ६० च्या दशकात अभिनेत्रींनी कसे वागावे, कसे वागू नये, याचे अलिखित नियमच होते : टागोर

पुणे : बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीत चित्रपटांचा चेहराही बदलत आहे. लोकप्रिय चित्रपटांचे योगदान नाकारता येणार नाही. अवास्तव गोष्टी वास्तवाला धरून सांगण्याची ताकद लोकप्रिय व्यावसायिक चित्रपटांमध्ये आहे. तज्ज्ञ चित्रपटांबद्दल सखोल लेखन करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. पूर्वीच्या काळी कलाकारांना ठराविक प्रतिमेमध्ये अडकवले जायचे. आता कलाकारांची चौफेर मुशाफिरी आणि चित्रपटांचे आशयघन विषयांतून चित्रसृष्टी बहरत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीला उजाळा दिला. सिंंबायोसिस संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व अभिनेत्री श्रीमती शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी समारंभानंतर ‘शर्मिला टागोर संगीत रजनी’या कार्यक्रमातून शर्मिला टागोर यांचा सुवर्णकाळ संवाद, गाणी आणि चित्रपटातील प्रसंगांतून उलगडला. प्रा. अनुपम सिद्धार्थ यांनी मुलाखतीतून त्यांचा संपूर्ण जीवनपट मांडला. मुलाखतीदरम्यान कलाकारांनी टागोर यांची कोरा कागज था ये मन मेरा, ये देख के दिल झुमा, गुनगुना रहे है, दिल ढुँढता है फिर वही, अब के सजन सावन में, चलो सजना जहा तक घटा चले, हम तुम जुदा ना होंगे अशी गाजलेली गाणी सादर करत वातावरणात रंग भरले. त्यांच्या निवडक चित्रपटांतील प्रसंगही मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले. सत्यजित रे यांच्या सिनेमात तेराव्या वर्षी साकारलेली भूमिका, बंगाली ते हिंदी चित्रसृष्टीचा प्रवास, दिग्गज अभिनेत्यांबरोबर दिलेले हिट चित्रपट अशा विविध आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.

शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘माझी आई रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबर शिकली. त्यांचे फोटो पाहताना खूप मजा येते. टागोर कुटुंबात जन्माला आले हे माझे भाग्य आहे. शांतिनिकेतनमध्ये शिकण्याची माझी इच्छा होती. तेरा वर्षांची असताना सत्यजित रे यांनी मला चित्रपटामध्ये लहान नववधूची भूमिका मला आॅफर केली. त्या काळात चांगल्या घरातील मुलींनी चित्रपटात काम करणे फारसे मान्य नव्हते. मात्र माझी बहीण टिंकूने एका चित्रपटात काम केले होते. त्यामुळे आई-वडिलांनी मलाही परवानगी दिली. मात्र, शाळेच्या मुख्याध्यापिकांनी नकार दिला, त्यामुळे मला शाळा बदलावी लागली. बंगाली माध्यमातून मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. सुरुवातीला इंग्रजी बोलताना खूप अडचण यायची. मात्र, माझ्या शिक्षिकांनी मला सांभाळून घेतले.’‘सत्यजित रे यांची कामाची पद्धत खूप छान आणि वेगळी होती. पटकथा वाचा, पण पाठ करू नका, असे ते नेहमी सांगायचे. त्यांनी संवादांमध्ये बोलीभाषा आणली. पूर्वीच्या तुलनेत चित्रपट अधिक सुटसुटीत केले. त्यामुळे वेगळ्या अर्थाने ते चित्रपटांचे जनक आहेत. कामाच्या पद्धतीमुळे सांस्कृतिक, भाषिक मर्यादा ओलांडून त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी आपलेसे केले. चित्रसृष्टीतील परिवर्तनाची सुरुवात रे यांनी केली,’ असेही त्या म्हणाल्या. राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीवकुमार अशा कलाकारांसह काम करण्याचा अनुभव, त्यांची स्वभाववैैशिष्ट्ये असे विविध पैैलू त्यांनी गप्पांमधून उलगडले. ‘६० च्या दशकात अभिनेत्रींनी कसे वागावे, कसे वागू नये, याचे जणू अलिखित नियमच होते. अशा काळात मी ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात बिकिनी घालून पडद्यावर आले. हा बदल सर्वांसाठी धक्कादायक होता,’’असे टागोर म्हणाल्या. 

‘कश्मीर की कली’ या चित्रपटातील ‘ये देख के दिल झुमा’ हे माझे पहिलेच गाणे होते. त्या वेळी मला खूप टेन्शन आले होते. मात्र, गाणे चित्रीत झाल्यानंतर आशा भोसले यांनी माझ्या कामाचे कौैतुक केले आणि मला खूप छान वाटले. काम करताना पैैसा महत्त्वाचा असतोच; मात्र त्यापेक्षाही आपले वैैविध्य, सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असते. सध्या मी अ‍ॅसिड सर्व्हायवर्सच्या पुनर्वसनासाठी काम करत आहे. अभिनेत्री असल्यामुळे चेहरा किती महत्त्वाचा असतो, हे मला माहीत आहे. त्यांना झालेल्या शारीरिक, मानसिक जखमा, वास्तवाला सामोरे जाण्याची खिलाडूवृत्ती, आत्मविश्वास थक्क करणारा आहे, अशा भावना शर्मिला टागोर यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :symbiosisसिंबायोसिसSharmila Tagoreशर्मिला टागोरRamdas Athawaleरामदास आठवले