शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काळानुसार चित्रपटांचा चेहरा बदलतोय : शर्मिला टागोर; पुण्यात सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 11:59 IST

सिंंबायोसिस संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व अभिनेत्री श्रीमती शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीत झाले.

ठळक मुद्दे‘शर्मिला टागोर संगीत रजनी’तून उलगडला शर्मिला टागोर यांचा सुवर्णकाळ ६० च्या दशकात अभिनेत्रींनी कसे वागावे, कसे वागू नये, याचे अलिखित नियमच होते : टागोर

पुणे : बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीत चित्रपटांचा चेहराही बदलत आहे. लोकप्रिय चित्रपटांचे योगदान नाकारता येणार नाही. अवास्तव गोष्टी वास्तवाला धरून सांगण्याची ताकद लोकप्रिय व्यावसायिक चित्रपटांमध्ये आहे. तज्ज्ञ चित्रपटांबद्दल सखोल लेखन करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. पूर्वीच्या काळी कलाकारांना ठराविक प्रतिमेमध्ये अडकवले जायचे. आता कलाकारांची चौफेर मुशाफिरी आणि चित्रपटांचे आशयघन विषयांतून चित्रसृष्टी बहरत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीला उजाळा दिला. सिंंबायोसिस संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व अभिनेत्री श्रीमती शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी समारंभानंतर ‘शर्मिला टागोर संगीत रजनी’या कार्यक्रमातून शर्मिला टागोर यांचा सुवर्णकाळ संवाद, गाणी आणि चित्रपटातील प्रसंगांतून उलगडला. प्रा. अनुपम सिद्धार्थ यांनी मुलाखतीतून त्यांचा संपूर्ण जीवनपट मांडला. मुलाखतीदरम्यान कलाकारांनी टागोर यांची कोरा कागज था ये मन मेरा, ये देख के दिल झुमा, गुनगुना रहे है, दिल ढुँढता है फिर वही, अब के सजन सावन में, चलो सजना जहा तक घटा चले, हम तुम जुदा ना होंगे अशी गाजलेली गाणी सादर करत वातावरणात रंग भरले. त्यांच्या निवडक चित्रपटांतील प्रसंगही मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले. सत्यजित रे यांच्या सिनेमात तेराव्या वर्षी साकारलेली भूमिका, बंगाली ते हिंदी चित्रसृष्टीचा प्रवास, दिग्गज अभिनेत्यांबरोबर दिलेले हिट चित्रपट अशा विविध आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.

शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘माझी आई रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबर शिकली. त्यांचे फोटो पाहताना खूप मजा येते. टागोर कुटुंबात जन्माला आले हे माझे भाग्य आहे. शांतिनिकेतनमध्ये शिकण्याची माझी इच्छा होती. तेरा वर्षांची असताना सत्यजित रे यांनी मला चित्रपटामध्ये लहान नववधूची भूमिका मला आॅफर केली. त्या काळात चांगल्या घरातील मुलींनी चित्रपटात काम करणे फारसे मान्य नव्हते. मात्र माझी बहीण टिंकूने एका चित्रपटात काम केले होते. त्यामुळे आई-वडिलांनी मलाही परवानगी दिली. मात्र, शाळेच्या मुख्याध्यापिकांनी नकार दिला, त्यामुळे मला शाळा बदलावी लागली. बंगाली माध्यमातून मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. सुरुवातीला इंग्रजी बोलताना खूप अडचण यायची. मात्र, माझ्या शिक्षिकांनी मला सांभाळून घेतले.’‘सत्यजित रे यांची कामाची पद्धत खूप छान आणि वेगळी होती. पटकथा वाचा, पण पाठ करू नका, असे ते नेहमी सांगायचे. त्यांनी संवादांमध्ये बोलीभाषा आणली. पूर्वीच्या तुलनेत चित्रपट अधिक सुटसुटीत केले. त्यामुळे वेगळ्या अर्थाने ते चित्रपटांचे जनक आहेत. कामाच्या पद्धतीमुळे सांस्कृतिक, भाषिक मर्यादा ओलांडून त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी आपलेसे केले. चित्रसृष्टीतील परिवर्तनाची सुरुवात रे यांनी केली,’ असेही त्या म्हणाल्या. राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीवकुमार अशा कलाकारांसह काम करण्याचा अनुभव, त्यांची स्वभाववैैशिष्ट्ये असे विविध पैैलू त्यांनी गप्पांमधून उलगडले. ‘६० च्या दशकात अभिनेत्रींनी कसे वागावे, कसे वागू नये, याचे जणू अलिखित नियमच होते. अशा काळात मी ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात बिकिनी घालून पडद्यावर आले. हा बदल सर्वांसाठी धक्कादायक होता,’’असे टागोर म्हणाल्या. 

‘कश्मीर की कली’ या चित्रपटातील ‘ये देख के दिल झुमा’ हे माझे पहिलेच गाणे होते. त्या वेळी मला खूप टेन्शन आले होते. मात्र, गाणे चित्रीत झाल्यानंतर आशा भोसले यांनी माझ्या कामाचे कौैतुक केले आणि मला खूप छान वाटले. काम करताना पैैसा महत्त्वाचा असतोच; मात्र त्यापेक्षाही आपले वैैविध्य, सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असते. सध्या मी अ‍ॅसिड सर्व्हायवर्सच्या पुनर्वसनासाठी काम करत आहे. अभिनेत्री असल्यामुळे चेहरा किती महत्त्वाचा असतो, हे मला माहीत आहे. त्यांना झालेल्या शारीरिक, मानसिक जखमा, वास्तवाला सामोरे जाण्याची खिलाडूवृत्ती, आत्मविश्वास थक्क करणारा आहे, अशा भावना शर्मिला टागोर यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :symbiosisसिंबायोसिसSharmila Tagoreशर्मिला टागोरRamdas Athawaleरामदास आठवले