शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

चांडोलीचे ट्रॉमा सेंटर दीड वर्षांपासून धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 03:03 IST

चांडोली रुग्णालयलगत कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले ट्रॉमा केअर सेंटर गेल्या दीड वर्षापासून धूळ खात पडून आहे. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नवीन वैद्यकीय यंत्रसाम्रगी आली असतानाही सेंटर सुरू केले जात नाही.

दावडी - चांडोली रुग्णालयलगत कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले ट्रॉमा केअर सेंटर गेल्या दीड वर्षापासून धूळ खात पडून आहे. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नवीन वैद्यकीय यंत्रसाम्रगी आली असतानाही सेंटर सुरू केले जात नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी तसेच खेड तालुक्यातील रुग्णांना तातडीने अत्यावश्यक सेवा मिळावी, यासाठी चांडोली येथे अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधण्यात आली. सेंटरच्या उभारणीनंतर आॅथोर्पेडिक विभाग, आयसीयू युनिट, आॅपरेशन थिएटर, अपघात कक्ष विभाग, एक्स-रे विभागसह आदी सोयीसुविधा उपलब्ध होणार होत्या. महिन्यापूर्वी सेंटरमध्ये वैद्यकीय यंत्रसामग्री आली; मात्र अद्यापही काही वैद्यकीय यंत्रसामग्री येणे बाकी आहे. त्यामुळे सेंटर बंदच असून नवीन आलेल्या वैद्यकीय यंत्रसामग्री धूळ खात पडून आहे. अपघातानंतर जखमींना थेट पुणे, पिंपरी-चिंचवड येथे हलविण्यात येते. झालेल्या अपघातग्रस्तांना दोन ते तीन तासांनी उपचार मिळतात.यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.ट्रॉमा सेंटरमध्ये वैद्यकीय यंत्रसाम्रगी अपूर्ण असल्यामुळे रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी कधी येतात व कधी जातात, कोणालाच कळत नाही. तसेच, शेजारील रुग्णालयातही ते दिसत नसल्याचे चित्र आहे.चांडोली येथे दररोज तालुक्यातून शेकडो रुग्ण उपचारांसाठी येतात. रुग्णालयात एक्स-रे, सोनोग्राफी मशीन आहे; मात्र वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन जादा पैसे देऊन उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोे.पॅथालॉजीची सेवा २४ तास उपलब्ध नसल्याने रात्री रुग्णांना बाहेरून तपासणी करून आणावी लागते. यामुळे गरीब रुग्णांना हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय नसतो.अपघातग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचा निर्णय झाला. इमारतीचे काम पूर्ण झाले; मात्र प्रत्यक्षात ट्रॉमा सेंटर कधी सुरू होईल, याबाबत अनभिज्ञताच आहे.रस्ते अपघातानंतर वेळेतउपचार मिळाले नाहीत म्हणून शेकडो नागरिकांचा दर वर्षी मृत्यू होतात. या पार्श्वभूमीवर, शासनाने महत्त्वाच्या रस्त्यांवर ट्रॉमा सेंटरसुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला होता. ट्रॉमा सेंटर सुरू झाल्यास नागरिकांचे हाल थांबतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटल