शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

कुकडीच्या डाव्या कालव्याला धोका होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:21 IST

दुरूस्तीची मागणी : ठिकठिकाणी भगदाडे; २५ वर्षापासून प्रशासनाकडून दुर्लक्ष

राजुरी : येथील कुकडी डावा कालवा ठिकठिकाणी खराब झाला आहे. या कालव्याचे अस्तरीकरण निघाले असल्याने भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता येथील ग्रामस्थांनी दर्शवली आहे. त्यामुळे या कालव्याच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

जुन्नर तालुक्यात असलेल्या व कुकडी प्रकल्पातील व येडगाव धरणातून सुरू केलेला येडगाव धरण ते कर्जत करमाळा जवळपास अडीचशे किलोमीटर अंतर असून या कालव्याच्या कामाला २५ वर्षांहून अधिक वर्ष झालेली आहेत. या कालव्यातून मोठ्य प्रमाणात तेराशे क्युसेक्स सोडले जात असते. कालव्याचे अस्तरीकरण ठिकठिकाणी निघालेले असून आतल्या बाजूस मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.साधारण या कालव्याची दुरुस्ती सन २००८ मध्ये करण्यात आली होती. परंतु तेव्हा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे कालव्याला प्लॅस्टर केलेले सिमेंट निघून गेले आहे. तसेच कालव्यामध्ये मोठमोठी झाडेझुडपे वाढलेली असल्याने कालव्याच्या अस्तरीकरणाला भेगा पडलेल्या आहेत. गेल्याच वर्षी उन्हाळ््यात कालव्याला कर्जत करमाळा या ठिकाणी भगदाड पडून हा कालवा फुटला होता. तेव्हा ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन नुकसान झाले होते. कालव्याचे प्लॅस्टर निघाल्याने येथील माती पाण्यात वाहून जात आहे. त्यामुळे येथे मोठे खड्डे पडू लागले आहेत. कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण न केल्यास या कालव्याला भविष्यात नक्कीच धोका उद्भवणार आहे. त्यामुळेच खड्डे भरून संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनीकेली आहे.हा कालवा ज्या ठिकाणाहून सुरू झाला आहे त्या ठिकाणापासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. बोरी बुद्रुक या ठिकाणी तर या कालव्याच्या भिंतीमधून गळती होऊन दर सेकंदाला हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

टॅग्स :Puneपुणे