शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

चाळी होताहेत नामशेष

By admin | Updated: June 1, 2017 02:10 IST

पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. राज्यभरातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रोजगाराच्या

लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. राज्यभरातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रोजगाराच्या उद्देशाने अनेक नागरिक येथे येऊन राहण्यासाठी आसरा शोधू लागतात. बरेच नागरिक कामाच्या ठिकाणीच राहतात. मात्र, सर्वांनाच हे जमते असे नाही. त्यासाठी भाड्याने एखादी रूम घेणे पसंत करतात. त्यासाठी या उपनगरातील अनेक स्थानिकांनी चाळी बांधून रूम भाड्याने देण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला. मात्र, या चाळीच्या जागी बहुमजली इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे या उपनगरातील अनेक दशकांची चाळ संस्कृती बंद झाल्याने कमी भाड्याचे घर नागरिकांना मिळणे मुश्कील झाले आहे. या शहरात सर्वसामान्य नागरिकांना घर घेणे परवडत नाही तर भाड्याने घर मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पालिकेने अनधिकृत बांधकामांवर निर्बंध आणल्याने अनेक घरमालक चाळी बिल्डरला विकत आहेत किंवा भागीदारीत बहुमजली इमारती बांधण्यावर भर देत आहेत़ कामाच्या शोधात अनेक कामगार राहण्यास घर शोधात आहेत, सध्या शहरात कामाचा सुकाळ असला तरी राहण्यास घर मिळत नसल्याने अनेक कामगार गावी परतू लागले आहेत. वन बीएच के किंवा वन आरके मध्यमवर्गीय नागरिकांना न परवडणारे असल्याने आहे त्या सिंगल खोल्याना मोठ्या प्रमाणात भाव आले आहेत. सध्या ज्यांच्याकडे सिंगल रूम आहे त्याचे भाडे चार ते साडेचार हजाराच्या पुढेच असून लाईट बिल वेगळे आकारले जात आहे. त्यामुळे सिंगल रूमला महिना ५ हजार मोजावे लागत असल्याने अनेक नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महिन्याचा आर्थिक खर्च व कमाई याचा ताळमेळ लागत नसल्याने कामगार वर्गात दैनंदिन जीवन कसे जगावे हा खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला असल्याने अनेकांनी ह्यगड्या आपला गावच बराह्ण हा पर्याय निवडला आहे. विशेष म्हणजे अशा ठिकाणी काम करणारा मध्यम वर्ग हा बहुधा चाळीत राहत होता त्यांनी भाडे परवडत नाही म्हणून शहरातून आपल्या गावी व कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.चाळीत राहातो तो सर्वसामान्य कामगार माणूस, छोटे व्यावसायिक मात्र चाळीच नाहीशा होत असल्याने अनेकांची परवड होत आहे. तर दुसरीकडे आहे त्या चाळीमालकांनी भाडे वाढविण्याचा झपाटा लावला आहे. सध्या शाळांना सुटी असल्याने अनेक कुटुंब गावी गेले आहेत. जे नागरिक सध्या शहरात वास्तव्यास आहेत ते नागरिक आताच गल्लोगल्ली भाड्याने रूम आहे का रूम म्हणत फिरताना दिसून येत आहेत. विकसकाशी करार : उत्पन्नासाठी टोलेजंग इमारतीशहरात वाढती लोकसंख्या पाहून अनेक स्थानिक जागा मालकांनी लाखो रुपये खर्च करून उत्पन्नाचे साधन म्हणून ठिकठिकाणी चाळी उभारल्या आहेत़ त्यातून येणारे उत्पन्न हेच त्याचे उदरनिर्वाहाचे साधन बनले होते. मुलांचे शिक्षण, घर खर्च, दवाखाना, लग्न कार्य व इत्तर दैनंदिन खर्च याच उत्पन्नावर अवलंबून होते. मात्र, चाळीतील भाड्यापेक्षा इमारतीतील भाडे जास्त येत असल्याने अनेकांनी चाळी पाडून इमारत बांधण्याचा सपाटा लावला आहे. एखाद्या नागरिकाला भाड्याने रूम देताना भाडे करार करून त्याची पोलीस स्टेशनला नोंद करणे बंधनकारक करण्यात आल्याने घर मालक मेटाकुटीला आले होते. नको ती भानगड म्हणत अनेकांनी चाळी पाडण्याचा सपाटा लावला आहे.