शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चाळी होताहेत नामशेष

By admin | Updated: June 1, 2017 02:10 IST

पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. राज्यभरातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रोजगाराच्या

लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. राज्यभरातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रोजगाराच्या उद्देशाने अनेक नागरिक येथे येऊन राहण्यासाठी आसरा शोधू लागतात. बरेच नागरिक कामाच्या ठिकाणीच राहतात. मात्र, सर्वांनाच हे जमते असे नाही. त्यासाठी भाड्याने एखादी रूम घेणे पसंत करतात. त्यासाठी या उपनगरातील अनेक स्थानिकांनी चाळी बांधून रूम भाड्याने देण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला. मात्र, या चाळीच्या जागी बहुमजली इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे या उपनगरातील अनेक दशकांची चाळ संस्कृती बंद झाल्याने कमी भाड्याचे घर नागरिकांना मिळणे मुश्कील झाले आहे. या शहरात सर्वसामान्य नागरिकांना घर घेणे परवडत नाही तर भाड्याने घर मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पालिकेने अनधिकृत बांधकामांवर निर्बंध आणल्याने अनेक घरमालक चाळी बिल्डरला विकत आहेत किंवा भागीदारीत बहुमजली इमारती बांधण्यावर भर देत आहेत़ कामाच्या शोधात अनेक कामगार राहण्यास घर शोधात आहेत, सध्या शहरात कामाचा सुकाळ असला तरी राहण्यास घर मिळत नसल्याने अनेक कामगार गावी परतू लागले आहेत. वन बीएच के किंवा वन आरके मध्यमवर्गीय नागरिकांना न परवडणारे असल्याने आहे त्या सिंगल खोल्याना मोठ्या प्रमाणात भाव आले आहेत. सध्या ज्यांच्याकडे सिंगल रूम आहे त्याचे भाडे चार ते साडेचार हजाराच्या पुढेच असून लाईट बिल वेगळे आकारले जात आहे. त्यामुळे सिंगल रूमला महिना ५ हजार मोजावे लागत असल्याने अनेक नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महिन्याचा आर्थिक खर्च व कमाई याचा ताळमेळ लागत नसल्याने कामगार वर्गात दैनंदिन जीवन कसे जगावे हा खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला असल्याने अनेकांनी ह्यगड्या आपला गावच बराह्ण हा पर्याय निवडला आहे. विशेष म्हणजे अशा ठिकाणी काम करणारा मध्यम वर्ग हा बहुधा चाळीत राहत होता त्यांनी भाडे परवडत नाही म्हणून शहरातून आपल्या गावी व कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतर करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.चाळीत राहातो तो सर्वसामान्य कामगार माणूस, छोटे व्यावसायिक मात्र चाळीच नाहीशा होत असल्याने अनेकांची परवड होत आहे. तर दुसरीकडे आहे त्या चाळीमालकांनी भाडे वाढविण्याचा झपाटा लावला आहे. सध्या शाळांना सुटी असल्याने अनेक कुटुंब गावी गेले आहेत. जे नागरिक सध्या शहरात वास्तव्यास आहेत ते नागरिक आताच गल्लोगल्ली भाड्याने रूम आहे का रूम म्हणत फिरताना दिसून येत आहेत. विकसकाशी करार : उत्पन्नासाठी टोलेजंग इमारतीशहरात वाढती लोकसंख्या पाहून अनेक स्थानिक जागा मालकांनी लाखो रुपये खर्च करून उत्पन्नाचे साधन म्हणून ठिकठिकाणी चाळी उभारल्या आहेत़ त्यातून येणारे उत्पन्न हेच त्याचे उदरनिर्वाहाचे साधन बनले होते. मुलांचे शिक्षण, घर खर्च, दवाखाना, लग्न कार्य व इत्तर दैनंदिन खर्च याच उत्पन्नावर अवलंबून होते. मात्र, चाळीतील भाड्यापेक्षा इमारतीतील भाडे जास्त येत असल्याने अनेकांनी चाळी पाडून इमारत बांधण्याचा सपाटा लावला आहे. एखाद्या नागरिकाला भाड्याने रूम देताना भाडे करार करून त्याची पोलीस स्टेशनला नोंद करणे बंधनकारक करण्यात आल्याने घर मालक मेटाकुटीला आले होते. नको ती भानगड म्हणत अनेकांनी चाळी पाडण्याचा सपाटा लावला आहे.