शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

चैैतन्य खून प्रकरण; आणखी एक अटकेत

By admin | Updated: March 16, 2015 04:16 IST

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीची

लोणी काळभोर : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या चैतन्य गवळी या विद्यार्थ्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी आणखी एकास ताब्यात घेतले. आतापर्यंत एकूण बारा जणांना अटक करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रिणीशी असलेले संबंध तोडावेत, असे सांगूनही न ऐकल्याने चैतन्य ज्ञानदेव गवळी (वय १८, रा. चंदनवाडी, ता. दौंड) याचा २८ फेब्रुवारी रोजी कोयता व गुप्तीसारख्या हत्याराने निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे. आज ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन या प्रकरणात अटक करण्यात आलेला बारावा आरोपी आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार दत्तात्रय गिरमकर व रॉकी देवकाते यांना हा अल्पवयीन मुलगा मावळ तालुक्यात असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून मावळ तालुक्यात शोधमोहीम चालू केली होती. त्या मोहिमेला आज यश मिळाले आहे. (वार्ताहर)