शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

केंद्राचे धोरण साखर उद्योगविरोधी -हर्षवर्धन पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 02:43 IST

केंद्र सरकारने राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना आयकर भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच, कारखान्यांना साखरसाठा मर्यादेचे आदेश काढले आहेत. परिणामी, साखरेचे दर कमी झाले आहेत. अशा परिस्थितीतच दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ३ लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे.

बावडा : केंद्र सरकारने राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना आयकर भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच, कारखान्यांना साखरसाठा मर्यादेचे आदेश काढले आहेत. परिणामी, साखरेचे दर कमी झाले आहेत. अशा परिस्थितीतच दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ३ लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. केंद्र शासनाने साखर उद्योगाच्या विरोधातील धोरण बदलावे, असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.शहाजीनगर येथे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. या वेळी ते बोलत होते.पाटील म्हणाले, ‘‘आगामी हंगामात कारखान्याचे १२.५० टक्के साखर उताºयाचे उद्दिष्ट आहे. मागील गळीत हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे गाळप कमी झाले. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही प्रतिटनास रु. २५०५ दर देण्याचा शब्द आपण पाळला आहे. कारखान्याने उपपदार्थनिर्मितीचे सर्व प्रकल्प उभारले आहेत. आता आगामी काळात गुंतवणुकीसाठी नवीन कर्ज काढण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे येणाºया हंगामात ऊसदरात नीरा-भीमा कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत पुढेच राहील, यात शंका नाही.या वार्षिक सभेस अ‍ॅड. कृष्णाजी यादव, प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, किरण पाटील, देवराज जाधव, अमरसिंह पाटील, मनोज पाटील, मंगेश पाटील, रघुनाथ राऊत, अनिल पाटील,श्रीमंत ढोले, धनंजय कोरटकर, तानाजीराव देवकर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, महादेव घाडगे, सुरेश मेहेर, महेश जगदाळे, दत्तात्रय शिर्के, विश्वासराव काळकुटे, मोहन गुळवे, नागेश नष्टे, तानाजीराव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.७ लाख टन गाळप नियोजनकारखान्याने चालू गळीत हंगामात ७ लाख टन ऊस गाळपाचे नियोजन केलेले असून साखर उतारा वाढीसाठी शेतकºयांनी सहकार्य करावे, शेतकºयांनी नवीन ऊस बियाणे वापरावे, एकरी ऊस उत्पादकता वाढवावी, नीरा-भीमा कारखान्याच्या ऊस विकास कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी अहवालवाचन केले. कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Puneपुणे