शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

केंद्राचे धोरण साखर उद्योगविरोधी -हर्षवर्धन पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 02:43 IST

केंद्र सरकारने राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना आयकर भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच, कारखान्यांना साखरसाठा मर्यादेचे आदेश काढले आहेत. परिणामी, साखरेचे दर कमी झाले आहेत. अशा परिस्थितीतच दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ३ लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे.

बावडा : केंद्र सरकारने राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना आयकर भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच, कारखान्यांना साखरसाठा मर्यादेचे आदेश काढले आहेत. परिणामी, साखरेचे दर कमी झाले आहेत. अशा परिस्थितीतच दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ३ लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. केंद्र शासनाने साखर उद्योगाच्या विरोधातील धोरण बदलावे, असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.शहाजीनगर येथे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. या वेळी ते बोलत होते.पाटील म्हणाले, ‘‘आगामी हंगामात कारखान्याचे १२.५० टक्के साखर उताºयाचे उद्दिष्ट आहे. मागील गळीत हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे गाळप कमी झाले. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही प्रतिटनास रु. २५०५ दर देण्याचा शब्द आपण पाळला आहे. कारखान्याने उपपदार्थनिर्मितीचे सर्व प्रकल्प उभारले आहेत. आता आगामी काळात गुंतवणुकीसाठी नवीन कर्ज काढण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे येणाºया हंगामात ऊसदरात नीरा-भीमा कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत पुढेच राहील, यात शंका नाही.या वार्षिक सभेस अ‍ॅड. कृष्णाजी यादव, प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, किरण पाटील, देवराज जाधव, अमरसिंह पाटील, मनोज पाटील, मंगेश पाटील, रघुनाथ राऊत, अनिल पाटील,श्रीमंत ढोले, धनंजय कोरटकर, तानाजीराव देवकर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, महादेव घाडगे, सुरेश मेहेर, महेश जगदाळे, दत्तात्रय शिर्के, विश्वासराव काळकुटे, मोहन गुळवे, नागेश नष्टे, तानाजीराव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.७ लाख टन गाळप नियोजनकारखान्याने चालू गळीत हंगामात ७ लाख टन ऊस गाळपाचे नियोजन केलेले असून साखर उतारा वाढीसाठी शेतकºयांनी सहकार्य करावे, शेतकºयांनी नवीन ऊस बियाणे वापरावे, एकरी ऊस उत्पादकता वाढवावी, नीरा-भीमा कारखान्याच्या ऊस विकास कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी अहवालवाचन केले. कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Puneपुणे