शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

स्मार्ट सिटीवरील नाराजीची केंद्राकडून दखल, केंद्रीय पथक करणार पाहणी, सल्लागार कंपन्यांच्या कामाचे मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 06:03 IST

स्मार्ट सिटी योजनेवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. या योजनेतील विविध प्रकल्पांच्या कामावर आता थेट केंद्रीय नगरविकास खात्याचे विशेष पथक लक्ष ठेवून असणार आहे.

पुणे : स्मार्ट सिटी योजनेवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. या योजनेतील विविध प्रकल्पांच्या कामावर आता थेट केंद्रीय नगरविकास खात्याचे विशेष पथक लक्ष ठेवून असणार आहे. प्रकल्पासाठी भरमसाठ शुल्क अदा करून नियुक्त करण्यात आलेल्या विविध सल्लागार कंपन्यांच्या कामाचेही मूल्यमापन या पथकाकडून करण्यात येईल.साधारण दोन वर्षांपूर्वी गाजावजा करत सुरू करण्यात आलेल्या या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम काही केल्या पुढे सरकायला तयार नाही. त्यावर आतापर्यंत विरोधी पक्षांकडूनच टीका होत होती. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांनीच स्मार्ट सिटी कंपनीला धारेवर धरत असाच विलंब होत राहिला तर खर्च होणारा नागरिकांचा पैसा अधिकाºयांच्या खिशातून वसूल करावा लागेल, अशी तंबीच त्यांनी अधिकाºयांना जाहीरपणे दिली. स्मार्ट सिटी योजनेत ५१ प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्यातील मोजकाच अपवाद वगळता अनेक प्रकल्प कागदावरच आहेत. त्यामुळेच विरोधकांनी या योजनेची पुणेकरांची केंद्र सरकारने केलेली फसवणूक, अशी संभावना केली आहे. आता तर सत्ताधारीच योजनेच्या विरोधात बोलू लागल्यावर केंद्र सरकारने पथक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.योजनेतील विविध प्रकल्पांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार कंपन्यांवरही सातत्याने टीका केली जात आहे. त्यामुळे या पथकांकडून कंपन्यांनी केलेल्या कामांचे मूल्यमापनही करण्यात येणार असल्याचे महापालिकेतील काही अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे