शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीवरील नाराजीची केंद्राकडून दखल, केंद्रीय पथक करणार पाहणी, सल्लागार कंपन्यांच्या कामाचे मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 06:03 IST

स्मार्ट सिटी योजनेवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. या योजनेतील विविध प्रकल्पांच्या कामावर आता थेट केंद्रीय नगरविकास खात्याचे विशेष पथक लक्ष ठेवून असणार आहे.

पुणे : स्मार्ट सिटी योजनेवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. या योजनेतील विविध प्रकल्पांच्या कामावर आता थेट केंद्रीय नगरविकास खात्याचे विशेष पथक लक्ष ठेवून असणार आहे. प्रकल्पासाठी भरमसाठ शुल्क अदा करून नियुक्त करण्यात आलेल्या विविध सल्लागार कंपन्यांच्या कामाचेही मूल्यमापन या पथकाकडून करण्यात येईल.साधारण दोन वर्षांपूर्वी गाजावजा करत सुरू करण्यात आलेल्या या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम काही केल्या पुढे सरकायला तयार नाही. त्यावर आतापर्यंत विरोधी पक्षांकडूनच टीका होत होती. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांनीच स्मार्ट सिटी कंपनीला धारेवर धरत असाच विलंब होत राहिला तर खर्च होणारा नागरिकांचा पैसा अधिकाºयांच्या खिशातून वसूल करावा लागेल, अशी तंबीच त्यांनी अधिकाºयांना जाहीरपणे दिली. स्मार्ट सिटी योजनेत ५१ प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, त्यातील मोजकाच अपवाद वगळता अनेक प्रकल्प कागदावरच आहेत. त्यामुळेच विरोधकांनी या योजनेची पुणेकरांची केंद्र सरकारने केलेली फसवणूक, अशी संभावना केली आहे. आता तर सत्ताधारीच योजनेच्या विरोधात बोलू लागल्यावर केंद्र सरकारने पथक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.योजनेतील विविध प्रकल्पांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार कंपन्यांवरही सातत्याने टीका केली जात आहे. त्यामुळे या पथकांकडून कंपन्यांनी केलेल्या कामांचे मूल्यमापनही करण्यात येणार असल्याचे महापालिकेतील काही अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे