शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

गोलेगावच्या सैन्यभरतीची शताब्दी

By admin | Updated: January 26, 2015 01:22 IST

शिरूर गावातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात असणा-या, सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणा-या गोलेगाव या गावाची सैन्यभरतीची शताब्दी या वर्षी पूर्ण झाली

प्रवीण गायकवाड, शिरूरशिरूर गावातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात असणा-या, सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणा-या गोलेगाव या गावाची सैन्यभरतीची शताब्दी या वर्षी पूर्ण झाली. १९१५ साली या गावातील मुकुंद मनाजी कटके हे सर्वप्रथम सैन्यात भरती झाले. तेव्हापासून सैन्यभरतीचा सुरू झालेला सिलसिला आजही सुरू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या पाल्याला सैन्यात पाठविण्यास पालक धजवत नव्हते. विशेषत: ग्रामीण भागात असे चित्र पाहावयास मिळत असे. अशात तालुक्यातील गोलेगाव हे मात्र यास अपवाद होते. १९१५ साली कटके यांच्यासह गुजाबा पडवळ, दगडू पडवळ आदीदेखील सैन्यात भरती झाले. यांची प्रेरणा घेऊन गावातील इतर घरांतील तरुणही पुढे सैन्यात भरती झाले. सैन्यभरतीचे लोण जणू गावभर पसरू लागले व गावातील प्रत्येक घरातील तरुण सैन्यभरती होऊ लागला. स्वातंत्र्योत्तर काळात हे प्रमाण वाढत गेले. गावातील तरुण सैन्यभरती होत होते. वेळेला निवृत्तही होत होते. मात्र, भागूजी बाळाजी वाखारे, श्रीपती विनोबा भोगावडे, बापू शंकर वाखारे, किसन शंकर वाखारे, बापू मारुती भोगावडे, चिमाजी गणपत इसवे या सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धात देशासाठी दिलेली प्राणाची आहुती गोलेगांवचे देशाप्रती असलेले प्रेम अधोरेखित करून गेली. या शहिदांबरोबरच १९६२ च्या युद्धात जयराम नारायण महाजन, तर १९७१ च्या युद्धात सोपान बळवंत वाखारे हेदेखील शहीद झाले. कारगिल युद्धात (२०००) बाळासाहेब धोंडिबा गायकवाड शहीद झाले. गावातील एकूण नऊ जण शहीद झाले. मात्र, सैन्यात भरती होण्याचा, देशासाठी प्राणपणाला लावण्याचा जुनुन मात्र कमी झाला नाही. देशसेवेसाठीच आपली मुलं जन्माला आलीत. जणू याच भावनेतून आई-वडील आपल्या पाल्याला सैन्यात भरती करीत राहिले. तालुक्यात निर्माण झालेल्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. सिंचन प्रकल्पामुळे बागायत क्षेत्र वाढले. यातून शेती व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. नदीच्या किनारी असलेल्या गोलेगावातील तरुणांनाही या संधी निर्माण झाल्या. मात्र, देशसेवेचे प्रेम (सैन्यभरती होण्याचे) तसूभरही कमी झाल्याचे आजही दिसत नाही.