शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोलेगावच्या सैन्यभरतीची शताब्दी

By admin | Updated: January 26, 2015 01:22 IST

शिरूर गावातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात असणा-या, सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणा-या गोलेगाव या गावाची सैन्यभरतीची शताब्दी या वर्षी पूर्ण झाली

प्रवीण गायकवाड, शिरूरशिरूर गावातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात असणा-या, सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणा-या गोलेगाव या गावाची सैन्यभरतीची शताब्दी या वर्षी पूर्ण झाली. १९१५ साली या गावातील मुकुंद मनाजी कटके हे सर्वप्रथम सैन्यात भरती झाले. तेव्हापासून सैन्यभरतीचा सुरू झालेला सिलसिला आजही सुरू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या पाल्याला सैन्यात पाठविण्यास पालक धजवत नव्हते. विशेषत: ग्रामीण भागात असे चित्र पाहावयास मिळत असे. अशात तालुक्यातील गोलेगाव हे मात्र यास अपवाद होते. १९१५ साली कटके यांच्यासह गुजाबा पडवळ, दगडू पडवळ आदीदेखील सैन्यात भरती झाले. यांची प्रेरणा घेऊन गावातील इतर घरांतील तरुणही पुढे सैन्यात भरती झाले. सैन्यभरतीचे लोण जणू गावभर पसरू लागले व गावातील प्रत्येक घरातील तरुण सैन्यभरती होऊ लागला. स्वातंत्र्योत्तर काळात हे प्रमाण वाढत गेले. गावातील तरुण सैन्यभरती होत होते. वेळेला निवृत्तही होत होते. मात्र, भागूजी बाळाजी वाखारे, श्रीपती विनोबा भोगावडे, बापू शंकर वाखारे, किसन शंकर वाखारे, बापू मारुती भोगावडे, चिमाजी गणपत इसवे या सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धात देशासाठी दिलेली प्राणाची आहुती गोलेगांवचे देशाप्रती असलेले प्रेम अधोरेखित करून गेली. या शहिदांबरोबरच १९६२ च्या युद्धात जयराम नारायण महाजन, तर १९७१ च्या युद्धात सोपान बळवंत वाखारे हेदेखील शहीद झाले. कारगिल युद्धात (२०००) बाळासाहेब धोंडिबा गायकवाड शहीद झाले. गावातील एकूण नऊ जण शहीद झाले. मात्र, सैन्यात भरती होण्याचा, देशासाठी प्राणपणाला लावण्याचा जुनुन मात्र कमी झाला नाही. देशसेवेसाठीच आपली मुलं जन्माला आलीत. जणू याच भावनेतून आई-वडील आपल्या पाल्याला सैन्यात भरती करीत राहिले. तालुक्यात निर्माण झालेल्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. सिंचन प्रकल्पामुळे बागायत क्षेत्र वाढले. यातून शेती व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. नदीच्या किनारी असलेल्या गोलेगावातील तरुणांनाही या संधी निर्माण झाल्या. मात्र, देशसेवेचे प्रेम (सैन्यभरती होण्याचे) तसूभरही कमी झाल्याचे आजही दिसत नाही.