शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

अर्थव्यवस्थेला चालना आणि रोजगार देणारा उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 05:53 IST

आनंद सराफ सार्वजनिक गणेशोत्सवाला १२७ वर्षांची परंपरा लाभली आहे. वर्धिष्णू वृत्ती आणि परिवर्तनशीलता या दोन गुणांमुळे काळाच्या कसोटीवर टिकून ...

आनंद सराफसार्वजनिक गणेशोत्सवाला १२७ वर्षांची परंपरा लाभली आहे. वर्धिष्णू वृत्ती आणि परिवर्तनशीलता या दोन गुणांमुळे काळाच्या कसोटीवर टिकून गणेशोत्सव वर्षानुवर्षे वाढत चालला आहे. हा उत्सव समाजाची गरज आहे. कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा, कलाकारांचे व्यासपीठ, समाजोपयोगी अर्थकारण, समरसतेचे अंगण आणि तनामनाला उर्जा देणारा हा उत्सव आहे. गणेशोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेणारी ही गुणवैशिष्ट्ये आजतागायत टिकून आहेत.

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीमध्ये अर्थशक्ती शेतीमध्ये बंदिस्त असताना अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि रोजगार निर्माण करणारा गणेशोत्सव हा एक महत्त्वाचा समाजमान्य उत्सव आहे. हा फक्त एका देवाधर्माचा उत्सव न राहता संपूर्ण देशाचा एवढेच नव्हे, तर आज जगभरातील १२२ छोट्या-मोठ्या देशांमध्ये हा उत्सव पोहोचला आहे. परदेशामध्येही हा उत्सव धुमधडाक्यात साजरा होतो आहे यावरून या उत्सवाचे लोकांच्या मनातील स्थान अधोरेखित होते. काळाच्या कसोटीवर टिकून राहाणे, तो वाढणे हे गुणविशेष या महोत्सवात असल्याने त्याच्यातले दूषित प्रवाह आपसूक बाजूला होतात. गणेशोत्सवाची जी गुणवैशिष्ट्ये आहेत, ती इतर कुठल्याही उत्सवात पाहायला मिळत नाहीत. उत्सवाचे एकमेवाद्वितीय असे हे उदाहरण आहे. उत्सवाने कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारचा उत्साह संचारतो. उत्सवातून सामाजिक अभिसरण होतं असल्याने समाजातील प्रत्येक घटकाला गणेशोत्सव आपला वाटतो. आजमितीला गणेशोत्सव हा विशिष्ट धर्मापुरताच मर्यादित न राहता, धार्मिक सलोख्याचे वातावरण निर्माण करून समाजाला एकसंघ ठेवण्यात मोलाची मदत करणारा असा उत्सव झाला आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळ म्हणून हा उत्सव सुरू केला असला, तरी बदलत्या काळातसुद्धा आपापले स्वरूप बदलून वैशिष्ट्य कायम ठेवत आपल्यावरच उपकार केले आहेत. गणेशोत्सव अधिकाधिक व्यापक होत जाईल, यात शंकाच नाही.लेखक गणेशोत्सव अभ्यासक, आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत (पुणे )

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019