शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

समाजातून जात नष्ट व्हावी : डॉ. श्रीपाल सबनीस; पुण्यात गंगाधर स्वामी पुण्यतिथी व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:18 IST

जातीपातीच्या मर्यादा ओलांडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यास समाजातून जात ही संकल्पना नष्ट होऊ शकते, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘आर्थिक निकषांवर आरक्षण असावे का’ या विषयावर श्रीपाल सबनीस यांनी केले मार्गदर्शनसमाजातील दुर्बल वर्गाला अजूनही काही काळ आरक्षणाची गरज : न. म. जोशी

पुणे : आरक्षण पूर्णपणे नष्ट करता येणे शक्य नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये तशी तरतूदही नाही. अजूनही समाजातील काही मागासलेले आणि दुर्बल घटकांना आरक्षणाची गरज आहे. जातीपातीच्या मर्यादा ओलांडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यास समाजातून जात ही संकल्पना नष्ट होऊ शकते, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.देशमुखमहाराज फाऊंडेशनने आयोजिलेल्या गंगाधर स्वामी पुण्यतिथी सप्ताहातील व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘वाढत्या जातीय अस्मितेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक निकषांवर आरक्षण असावे का’ या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सप्ताहात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी, साहित्यिक बबन मिंडे, रा. स्व. संघाचे पश्चिम प्रांतप्रमुख हेमंत हरहरे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.तांबोळी म्हणाले, ‘जातीवाद ही अंधश्रद्धा आहे. संविधानाने धर्माला आरक्षण दिलेले नाही, तर मागासलेल्या वर्गाला आरक्षण दिले आहे. वाढत्या जातीय अस्मितेच्या जखमा समाजमनावर झाल्या आहेत. भारतीय संविधान आणि संसद हेच अंतिम सत्य आहे.’ देशमुख महाराजांनी प्रास्ताविक केले. या वेळी सुवर्णा बोलघाटे, नरहर शिरोदे, संजय देशमुख, प्रवीण साळुंके, गणेश अनारसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या जेवणातून आई लहान मुलांसाठी दोन घास बाजूला काढून ठेवते, यालाच आरक्षण म्हणतात. समाजातील दुर्बल वर्गाला अजूनही काही काळ आरक्षणाची गरज आहे.- न. म. जोशी

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPuneपुणे