शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

समाजातून जात नष्ट व्हावी : डॉ. श्रीपाल सबनीस; पुण्यात गंगाधर स्वामी पुण्यतिथी व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:18 IST

जातीपातीच्या मर्यादा ओलांडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यास समाजातून जात ही संकल्पना नष्ट होऊ शकते, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘आर्थिक निकषांवर आरक्षण असावे का’ या विषयावर श्रीपाल सबनीस यांनी केले मार्गदर्शनसमाजातील दुर्बल वर्गाला अजूनही काही काळ आरक्षणाची गरज : न. म. जोशी

पुणे : आरक्षण पूर्णपणे नष्ट करता येणे शक्य नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये तशी तरतूदही नाही. अजूनही समाजातील काही मागासलेले आणि दुर्बल घटकांना आरक्षणाची गरज आहे. जातीपातीच्या मर्यादा ओलांडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यास समाजातून जात ही संकल्पना नष्ट होऊ शकते, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.देशमुखमहाराज फाऊंडेशनने आयोजिलेल्या गंगाधर स्वामी पुण्यतिथी सप्ताहातील व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘वाढत्या जातीय अस्मितेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक निकषांवर आरक्षण असावे का’ या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सप्ताहात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी, साहित्यिक बबन मिंडे, रा. स्व. संघाचे पश्चिम प्रांतप्रमुख हेमंत हरहरे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.तांबोळी म्हणाले, ‘जातीवाद ही अंधश्रद्धा आहे. संविधानाने धर्माला आरक्षण दिलेले नाही, तर मागासलेल्या वर्गाला आरक्षण दिले आहे. वाढत्या जातीय अस्मितेच्या जखमा समाजमनावर झाल्या आहेत. भारतीय संविधान आणि संसद हेच अंतिम सत्य आहे.’ देशमुख महाराजांनी प्रास्ताविक केले. या वेळी सुवर्णा बोलघाटे, नरहर शिरोदे, संजय देशमुख, प्रवीण साळुंके, गणेश अनारसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या जेवणातून आई लहान मुलांसाठी दोन घास बाजूला काढून ठेवते, यालाच आरक्षण म्हणतात. समाजातील दुर्बल वर्गाला अजूनही काही काळ आरक्षणाची गरज आहे.- न. म. जोशी

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPuneपुणे