शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

रस्तेबांधणीतील दोषांमुळे नागरिकांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 03:13 IST

ठिकठिकाणी खड्डे, चढ-उताराचे रस्ते; वाहने घसरून पडल्याने जाताहेत जीव, उपाययोजना करण्याची मागणी

चंदननगर : मुंढवा येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर पडलेला खड्डा व्यवस्थित बुजवा अशी पोलिसांची सूचना देऊनही महापालिकेने दुर्लक्ष केले. त्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेला. परंतु, चंदननगर परिसरातील अनेक रस्त्यांवर चुकीची रस्तेबांधणीझालेली आहे. कुठे खड्डे आहेत, तर कुठे चढ-उतार आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण जाते. परिणामी अपघातहोत असल्याने नागरिकांचे बळी जात आहेत.

रस्त्याने जाताना एखादा खड्डा अथवा वर आलेले चेंबर दिसते. काही ठिकाणी रस्त्याची रचना वर-खाली झालेली असते मात्र या छोट्या गोष्टी अपघातास निमंत्रण देणाऱ्या ठरतात. कुटुंबातील व्यक्ती जखमी असली अथवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यास सर्वांची पळापळ होते. किरकोळ उपचाराचा खर्च परवडत नाही. उपचारास किती खर्च येईल याबाबत शाश्वती नसते. कधीकधी तर वारेमाप पैसा खर्च केला जातो. रस्ते बांधणी करताना ते काम उत्कृष्ट आणि टिकाऊ होणे अपेक्षित असते मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. कामाचा दर्जा गांभीर्याने पाहिला जात नाही. एकदा काम झाले की पुन्हा त्याकडे लक्ष दिले जात नाही. एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरतीच डागडुजी करण्यात येते. परंंतु, त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होते. काही वेळा वृद्ध व्यक्ती दुचाकीवर असते, दरम्यान खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होऊन मोठे नुकसान होते. अशा वेळी तातडीने सुधारणा करणे गरजेचे असताना तत्परता दाखवली जात नाही. एखादा अपघात घडल्यानंतर त्या ठिकाणाबाबत चर्चा होते. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात, दुचाकी घसरून मृत्यू , पडल्याने डोक्याला मार, अंदाज न आल्याने अपघात अशा घटना नेहमीच घडत आहेत. तरी देखील प्रशासन जागे होताना दिसून येत नाही.जलवाहिनीची झाकणे धोकादायककल्याणीनगर : नगर रोड, कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क मधील अनेक ड्रेनेजची झाकणे े(मॅनहोल्स) रस्त्याशी समलत नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वारांचा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. या नादुरुस्त मॅनहोल्सची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.तीन वर्षांपूर्वी धनकवडीतील तीन हत्ती चौकामध्ये दोन दुचाकीस्वारांचा नादुरुस्त मॅनहोल्स मुळे झालेल्या अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला होता. या अपघाताचे पडसाद मुख्यसभेत उमटले होते. मुख्य सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली होती. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अपघात होतो असा आरोप केला होता. त्या वेळी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी तातडीने धोकादायक मॅनहोल्सचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पथ विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहराच्या विविध रस्त्यांवर मॅनहोल्स धोकादायक स्थितीत असल्याची माहिती समोर आली होती. पालिकेच्या पथ विभागातर्फे त्याची तातडीने दुरुस्ती हाती घेण्यात आली होती. शहरातील अतंर्गत रस्त्यावरील मेनहोल्सचे सर्वेक्षण क्षेत्रीय कार्यालय- निहाय केले जाणार होते. मात्र, कालांतराने मेनहोल्सच्या दुरुस्तीचे काम थंडावले गेले. पालिका प्रशासनाने मेनहोल्सच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. नगर रोडवर रामवाडी भुयारी मार्ग ते खराडी बायपास रस्त्यादरम्यान अनेक मेनहोल्सचे झाकणे रस्त्याच्या खाली गेली आहेत. त्यामुळे नगर रस्त्यावर खड्डे तयार झाले आहेत.याप्रमाणे कल्याणीनगरमधील अंतर्गत रस्त्यावर मेनहोल्समुळे अनेक खड्डे तयार झाले आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नाहीत. यामुळे किरकोळ अपघात होत आहे. खड्ड्यातून गाडी गेल्यामुळे पाठीला दुखापत होत आहे. गाडीचे नुकसान होत आहे. या नादुरुस्त मेनहॉलमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व मेनहोल्स त्वरित दुरूस्त करण्याची मागणी नागरिक करूलागले आहे.खराडी परिसर धोकादायकवडगावशेरी, खराडी, चंदननगरसह नगर रस्त्यावर, अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्याचबरोबर रस्त्यातील असलेली चेंबरची झाकणे वर-खाली झाली असून, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका असून, जी घटना मुंढव्यात घडली तशीच परिस्थिती वडगावशेरी, चंदननगर परिसरातील रस्त्यांची आहे. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.रस्त्याची पाहणी करणारयाबाबत नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग पाचचे अधिकारी ज्ञानेश्वर लाखे यांनी सांगितले, की कल्याणीननगर येथील रस्त्याची पाहणी केली जाईल. त्यांनतर मॅनहोल्सची दुरुस्ती करणार आहे. नगर रस्त्यावरील मेनहोल्स संदर्भात संबंधित अधिकाºयांना माहितीकळवली जाईल. त्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यातयेणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा