शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

उमेदवारांची धाव बुवा-महाराजांकडे

By admin | Updated: February 18, 2017 03:00 IST

हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात झाली असून, त्यात प्रस्थापित गावपुढाऱ्यांची

लोणी काळभोर : हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरूवात झाली असून, त्यात प्रस्थापित गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बहुतांश ठिकाणी निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने आपणच निवडून यावे म्हणून उमेदवारांनी चक्क बुवा, मांत्रिक, देवरूषी, महाराज यांच्याकडेही आशीर्वादासाठी धाव घेतली आहे. त्यामुळे बाजारात नारळ, लिंबू - मिरची, गंडे - दोरे, अंगारा - धुपारा यांना भाव आल्याची तालुक्यात चर्चा आहे. अत्यंत गुप्तपणे अंगारा - धुपारा, लिंबू - मिरची, टाचणी व बिबव्यासह कुलदेवतेचा भंडारा उधळून निवडणूकीतील विजय निश्चितीसाठी देव - देवतांना कौल लावण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. केवळ सत्ता मिळावी या हव्यासापोटी अंधश्रध्देच्या मागे जाण्यात पुढारीही मागे नाहीत असे दिसून येत आहे. विजयाची निश्चिती करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा अवलंब सुरू आहे. सामिष जेवणावळींसह विविध प्रकारे साऱ्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हॉटेल, ढाबे, केटरिंगवाले यांना सुगीचे दिवस आले आहेत. उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला असल्याने गांवागावांतील वातावरण ढवळून निघाले आहे. (वार्ताहर)आळीनिहाय जेवणावळी!४इतर वेळी ढुंकूनही न पाहणारे राजकीय पुढारी आता मात्र दोन्ही हात जोडून वेळप्रसंगी साष्टांग दंडवत घालून ‘नमस्कार या वेळी लक्ष असू द्या’ असे म्हणत विनवण्या करून साद घालताना दिसत आहेत.४मतदार नाराज राहू नये याकरिता आळीनिहाय जेवणावळींचे आयोजन करण्यात येत असून, आग्रहाचे आमंत्रण देऊन मतदारराजाच्या आवडीचे खाद्यपदार्थ पुरवले जात आहेत.