शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कालवा सल्लागार समितीची बैठक होणार सोमवारी : जल निर्णयाची प्रतिक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 19:27 IST

शहराच्या पाणी वापरावरुन गेले काही महिने सतत वाद घडत आहेत. त्यातच शेतीला देखील उन्हाळी आवर्तन देण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देशहरी-ग्रामीण भागाच्या पाण्याचा वाटा होणार निश्चित उपलब्ध जलसाठ्यानुसार १५ ऑक्टोबर ते १५ जुलैचे नियोजन राज्य सरकारच्या मध्यस्थीने शहराला १३५० एमएलडी (दशलक्ष लिटर) दररोज पाणी देण्याचा निर्णय

पुणे : शहर आणि ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या कालवा सल्लागार समितीची बैठक येत्या सोमवारी (दि. २५) पुण्यामध्ये होत आहे. शहराच्या पाणी वापरावरुन गेले काही महिने सतत वाद घडत आहेत. त्यातच शेतीला देखील उन्हाळी आवर्तन देण्याची मागणी होत आहे. उपलब्ध पाण्यामध्ये शहराचा आणि जिल्ह्याचा वाटा नक्की किती असेल, हे या बैठकीत ठरेल. त्यामुळे समितीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.  कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री अथवा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होत असते. पावसाळा संपल्यानंतर १५ आॉक्टोबररोजी उपलब्ध जलसाठ्यानुसार पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगासाठीचे १५ ऑक्टोबर ते १५ जुलैचे नियोजन करण्यात येते. तसेच, २८ फेब्रुवारी रोजी उपलब्ध साठ्याच्या आधारे उन्हाळी आवर्तनाचे देखील विचार करण्यात येतो. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक होणार नाही. जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुण्याला ८९२ एमएलडी (वार्षिक ११.५० अब्ज घनफूट) दैनंदिन पाणी वापराची परवानगी दिली आहे. शहरातील पाण्याची तब्बल ३५ टक्के गळती होते. त्यामुळे जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या निकषानुसार महापालिकेला पाणी पुरविणे शक्य नाही. त्यामुळे राज्यसरकारने मध्यस्ती करीत शहराला १३५० एमएलडी (दशलक्ष लिटर) दररोज पाणी देण्याचा निर्णय घेतला. हे पाणी वार्षिक १७.३९ टीएमसी इतके होते. दुसरीकडे उन्हाळी आवर्तन द्यावे यासाठी काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतीला २.८२ टीएमसी पाणी देण्याच्या हालचाली जलसंपदा विभागाने सुरु केल्या असल्याचे समजते. तसेच, पुण्याच्या देखील पाण्यात कपात केली जाणार नसल्याचे आत्ता तरी, सांगण्यात येत आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पात शुक्रवार अखेरीस (दि. २२) १०.३१ टीएमसी पाणीसाठा आहे. बाष्पीभवनाचा वार्षिक दर हा ३ टीएमसी इतका आहे. त्यातील जवळपास २ टीएमसी पाण्याचे एप्रिल आणि मे महिन्यात बाष्पीभवन होते. हे सर्व लक्षात घेता सोमवारच्या बैठकीत नक्की काय निर्णय होतो, याकडे महापालिका आणि ग्रामीण भागातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीagricultureशेती