शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

पिंडाला शिवण्याकरिता कावळा सापडेना; शहरीकरणाचा असाही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 00:38 IST

हिंदू संस्कृतीमध्ये अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ते आश्विन मासातील अमावास्येपर्य$ंतच्या काळातील पितृ पंधरवड्यात दिवंगत झालेल्या आप्तांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध घातले जाते.

आंबेठाण - हिंदू संस्कृतीमध्ये अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ते आश्विन मासातील अमावास्येपर्य$ंतच्या काळातील पितृ पंधरवड्यात दिवंगत झालेल्या आप्तांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध घातले जाते. त्याकरिता काकस्पर्श महत्त्वाचा असतो; परंतु वाढते शहरीकरण व मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाची हानी होत आहे. परिणामी, शहरासह ग्रामीण भागातही कावळ्यांची संख्या कमी होत आहे.गरुडपुराणात म्हटले आहे, की पितृ पंधरवड्यात पितरांचे श्राद्ध घातल्याने पितर तृप्त होऊन सर्व मनोकामना पूर्ण करतात. पितरांचे श्राद्ध हे भाद्रपद शुक्ल पौर्णिमा ते आश्विन कृष्ण अमावास्या या पंधरवड्यात केले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक घटकाला स्थान देण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या सुरू होत असलेला पितृ पंधरवडा हा चौदा दिवसांचाच आहे. दि. ९ आॅक्टोबरला सर्वपित्री अमावास्या आहे. पितृ पंधरवड्यात पिंडाला (घासाला) शिवण्याकरिता कावळे आवश्यक असतात; परंतु वाढते शहरीकरण व निसर्गाच्या हानीमुळे दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे पिंडदान करणाºयांना तासनतास कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकेकाळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कावळ्यांचे वास्तव्य असायचे. मात्र, ग्रामीण भागातही कावळे दिसेनासे झालेआहेत.हिंदू संस्कृतीमध्ये पितृ पंधरवड्यात काकस्पर्श महत्त्वाचा मानतात. मृत व्यक्तीच्या दसपिंड विधीमध्येही काकस्पर्श महत्त्वाचा मानण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीत पौराणिक सांगड घालून कावळ्याचे महत्त्व पटविण्यात आले.ग्रामीण भागात कावळे दुर्मिळ झाले आहेत. वास्तविक सप्टेंबर, आॅक्टोबरदरम्यान शेतीची कामे केली जातात. त्यामुळे पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध असते. कावळा पर्यावरणरक्षणाचे काम करतो. परिसरात पडलेले सडके मांस, मृत प्राणी, किडे, अन्य कीटक यांच्यावर कावळा आपले जीवन जगतो. त्यामुळे पर्यावरणात तो स्वच्छतादूत म्हणून महत्त्वाचा ठरतो.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या