शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पिंडाला शिवण्याकरिता कावळा सापडेना; शहरीकरणाचा असाही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 00:38 IST

हिंदू संस्कृतीमध्ये अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ते आश्विन मासातील अमावास्येपर्य$ंतच्या काळातील पितृ पंधरवड्यात दिवंगत झालेल्या आप्तांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध घातले जाते.

आंबेठाण - हिंदू संस्कृतीमध्ये अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ते आश्विन मासातील अमावास्येपर्य$ंतच्या काळातील पितृ पंधरवड्यात दिवंगत झालेल्या आप्तांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध घातले जाते. त्याकरिता काकस्पर्श महत्त्वाचा असतो; परंतु वाढते शहरीकरण व मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाची हानी होत आहे. परिणामी, शहरासह ग्रामीण भागातही कावळ्यांची संख्या कमी होत आहे.गरुडपुराणात म्हटले आहे, की पितृ पंधरवड्यात पितरांचे श्राद्ध घातल्याने पितर तृप्त होऊन सर्व मनोकामना पूर्ण करतात. पितरांचे श्राद्ध हे भाद्रपद शुक्ल पौर्णिमा ते आश्विन कृष्ण अमावास्या या पंधरवड्यात केले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक घटकाला स्थान देण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या सुरू होत असलेला पितृ पंधरवडा हा चौदा दिवसांचाच आहे. दि. ९ आॅक्टोबरला सर्वपित्री अमावास्या आहे. पितृ पंधरवड्यात पिंडाला (घासाला) शिवण्याकरिता कावळे आवश्यक असतात; परंतु वाढते शहरीकरण व निसर्गाच्या हानीमुळे दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे पिंडदान करणाºयांना तासनतास कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकेकाळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कावळ्यांचे वास्तव्य असायचे. मात्र, ग्रामीण भागातही कावळे दिसेनासे झालेआहेत.हिंदू संस्कृतीमध्ये पितृ पंधरवड्यात काकस्पर्श महत्त्वाचा मानतात. मृत व्यक्तीच्या दसपिंड विधीमध्येही काकस्पर्श महत्त्वाचा मानण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीत पौराणिक सांगड घालून कावळ्याचे महत्त्व पटविण्यात आले.ग्रामीण भागात कावळे दुर्मिळ झाले आहेत. वास्तविक सप्टेंबर, आॅक्टोबरदरम्यान शेतीची कामे केली जातात. त्यामुळे पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध असते. कावळा पर्यावरणरक्षणाचे काम करतो. परिसरात पडलेले सडके मांस, मृत प्राणी, किडे, अन्य कीटक यांच्यावर कावळा आपले जीवन जगतो. त्यामुळे पर्यावरणात तो स्वच्छतादूत म्हणून महत्त्वाचा ठरतो.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या