शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

पिंडाला शिवण्याकरिता कावळा सापडेना; शहरीकरणाचा असाही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 00:38 IST

हिंदू संस्कृतीमध्ये अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ते आश्विन मासातील अमावास्येपर्य$ंतच्या काळातील पितृ पंधरवड्यात दिवंगत झालेल्या आप्तांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध घातले जाते.

आंबेठाण - हिंदू संस्कृतीमध्ये अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ते आश्विन मासातील अमावास्येपर्य$ंतच्या काळातील पितृ पंधरवड्यात दिवंगत झालेल्या आप्तांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध घातले जाते. त्याकरिता काकस्पर्श महत्त्वाचा असतो; परंतु वाढते शहरीकरण व मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाची हानी होत आहे. परिणामी, शहरासह ग्रामीण भागातही कावळ्यांची संख्या कमी होत आहे.गरुडपुराणात म्हटले आहे, की पितृ पंधरवड्यात पितरांचे श्राद्ध घातल्याने पितर तृप्त होऊन सर्व मनोकामना पूर्ण करतात. पितरांचे श्राद्ध हे भाद्रपद शुक्ल पौर्णिमा ते आश्विन कृष्ण अमावास्या या पंधरवड्यात केले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक घटकाला स्थान देण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या सुरू होत असलेला पितृ पंधरवडा हा चौदा दिवसांचाच आहे. दि. ९ आॅक्टोबरला सर्वपित्री अमावास्या आहे. पितृ पंधरवड्यात पिंडाला (घासाला) शिवण्याकरिता कावळे आवश्यक असतात; परंतु वाढते शहरीकरण व निसर्गाच्या हानीमुळे दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे पिंडदान करणाºयांना तासनतास कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकेकाळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कावळ्यांचे वास्तव्य असायचे. मात्र, ग्रामीण भागातही कावळे दिसेनासे झालेआहेत.हिंदू संस्कृतीमध्ये पितृ पंधरवड्यात काकस्पर्श महत्त्वाचा मानतात. मृत व्यक्तीच्या दसपिंड विधीमध्येही काकस्पर्श महत्त्वाचा मानण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीत पौराणिक सांगड घालून कावळ्याचे महत्त्व पटविण्यात आले.ग्रामीण भागात कावळे दुर्मिळ झाले आहेत. वास्तविक सप्टेंबर, आॅक्टोबरदरम्यान शेतीची कामे केली जातात. त्यामुळे पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध असते. कावळा पर्यावरणरक्षणाचे काम करतो. परिसरात पडलेले सडके मांस, मृत प्राणी, किडे, अन्य कीटक यांच्यावर कावळा आपले जीवन जगतो. त्यामुळे पर्यावरणात तो स्वच्छतादूत म्हणून महत्त्वाचा ठरतो.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या