शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढता येईल का? यासाठी अँटिबॉडी चाचणी करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST

पुणे : कोरोनाच्या काळात अँटिबॉडी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अगदी परवलीचा शब्द झाला आहे. विशेषतः कोरोना होऊन गेल्यावर आणि लसीकरण ...

पुणे : कोरोनाच्या काळात अँटिबॉडी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अगदी परवलीचा शब्द झाला आहे. विशेषतः कोरोना होऊन गेल्यावर आणि लसीकरण झाल्यावर आपल्या शरीरात अँटिबॉडी किती प्रमाणात विकसित झाल्या आहेत, याबाबत सामान्यांना कुतूहल असते. याचाच परिणाम म्हणून गेल्या तीन महिन्यांमध्ये अँटिबॉडी चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये अँटिबॉडी चाचण्यांमध्ये २५-३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मार्च महिन्यापासून सामान्य नागरिकांना लसीकरण खुले झाले. लसीचा डोस घेतल्यानंतर, १४ दिवसांनी शरीरात अँटिबॉडी विकसित होण्यास सुरुवात होते. रोग प्रतिकारकशक्ती निर्माण होते आहे का, याची पडताळणी करण्यासाठी लसवंत झाल्यावर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी करण्यासाठी अनेक नागरिकांकडून चौकशी केली जात आहे. चौकशी करणाऱ्यांपैकी ९०-९५ टक्के लोक चाचणी करून घ्यायला आवर्जून येतात, असे निरीक्षण खासगी प्रयोगशाळांनी नोंदवले आहे.

पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय इंगळे म्हणाले, ''लसीचा डोस घेतल्यानंतर, रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी अँटिबॉडीज तयार करतात. मानवी शरीरातील या अँटिबॉडी कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी मदत करतात. कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर शरीरात अँटिबॉडीज निर्माण होतात. त्यामुळे शरीरात किती अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत हे पाहण्यासाठी अनेक लोक सध्या प्रोटिन अँटिबॉडी चाचणी करून घेण्यासाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये हजेरी लावत आहेत. अँटिबॉडी चाचणी करण्यासाठी व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. या चाचणीत ज्यांच्या रक्तात कोविड-१९ विषाणूला विरोध करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे, अशांची ही चाचणी पॉझिटिव्ह येते.''

------

कोरोना लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर, अनेक जण शरीरात किती अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. जेणेकरून आपल्याला कोरोना विषाणूशी लढता येईल, हे तपासून पाहण्यासाठी प्रोटिन अँटिबॉडी चाचणी करून घेत आहेत. परंतु, लस घेतल्यानंतर अँटिबॉडी चाचणीबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची शिफारस करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ला न घेता स्वतः ठरवून ही चाचणी करू नये. गरज असल्यास डॉक्टरांनी सांगितल्यावरच ही चाचणी करून घ्यावी.

- डॉ. संजय नगरकर, जनरल फिजिशियन

--------

कोरोनामुक्त झाल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती किती काळ टिकते आणि अँटिबॉडीपासून नेमके किती दिवस संरक्षण मिळते, याबद्दल अद्याप अभ्यास सुरू आहे. अँटिबॉडी तीन ते सहा महिने टिकतात, असा अंदाज बांधण्यात आला आहे. कोरोना किती तीव्र स्वरूपाचा होता, यावर अँटिबॉडीचे प्रमाण अवलंबून असते. काहींमध्ये प्रमाण अतिशय कमी, तर काहींमध्ये पुरेसे असते. अँटिबीडी टेस्टमधून हे प्रमाण कळते. चाचण्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत. प्रकारानुसार प्रयोगशाळांमधील चाचण्यांचे दर ठरलेले असतात. हे दर ३००-८०० रुपयादरम्यान असू शकतात.

- डॉ. मिहीर कुलकर्णी, जनरल फिजिशियन