शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

कोरोनाशी लढता येईल का? यासाठी अँटिबॉडी चाचणी करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST

पुणे : कोरोनाच्या काळात अँटिबॉडी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अगदी परवलीचा शब्द झाला आहे. विशेषतः कोरोना होऊन गेल्यावर आणि लसीकरण ...

पुणे : कोरोनाच्या काळात अँटिबॉडी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अगदी परवलीचा शब्द झाला आहे. विशेषतः कोरोना होऊन गेल्यावर आणि लसीकरण झाल्यावर आपल्या शरीरात अँटिबॉडी किती प्रमाणात विकसित झाल्या आहेत, याबाबत सामान्यांना कुतूहल असते. याचाच परिणाम म्हणून गेल्या तीन महिन्यांमध्ये अँटिबॉडी चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये अँटिबॉडी चाचण्यांमध्ये २५-३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मार्च महिन्यापासून सामान्य नागरिकांना लसीकरण खुले झाले. लसीचा डोस घेतल्यानंतर, १४ दिवसांनी शरीरात अँटिबॉडी विकसित होण्यास सुरुवात होते. रोग प्रतिकारकशक्ती निर्माण होते आहे का, याची पडताळणी करण्यासाठी लसवंत झाल्यावर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी करण्यासाठी अनेक नागरिकांकडून चौकशी केली जात आहे. चौकशी करणाऱ्यांपैकी ९०-९५ टक्के लोक चाचणी करून घ्यायला आवर्जून येतात, असे निरीक्षण खासगी प्रयोगशाळांनी नोंदवले आहे.

पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय इंगळे म्हणाले, ''लसीचा डोस घेतल्यानंतर, रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी अँटिबॉडीज तयार करतात. मानवी शरीरातील या अँटिबॉडी कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी मदत करतात. कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर शरीरात अँटिबॉडीज निर्माण होतात. त्यामुळे शरीरात किती अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत हे पाहण्यासाठी अनेक लोक सध्या प्रोटिन अँटिबॉडी चाचणी करून घेण्यासाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये हजेरी लावत आहेत. अँटिबॉडी चाचणी करण्यासाठी व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. या चाचणीत ज्यांच्या रक्तात कोविड-१९ विषाणूला विरोध करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे, अशांची ही चाचणी पॉझिटिव्ह येते.''

------

कोरोना लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर, अनेक जण शरीरात किती अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. जेणेकरून आपल्याला कोरोना विषाणूशी लढता येईल, हे तपासून पाहण्यासाठी प्रोटिन अँटिबॉडी चाचणी करून घेत आहेत. परंतु, लस घेतल्यानंतर अँटिबॉडी चाचणीबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची शिफारस करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ला न घेता स्वतः ठरवून ही चाचणी करू नये. गरज असल्यास डॉक्टरांनी सांगितल्यावरच ही चाचणी करून घ्यावी.

- डॉ. संजय नगरकर, जनरल फिजिशियन

--------

कोरोनामुक्त झाल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती किती काळ टिकते आणि अँटिबॉडीपासून नेमके किती दिवस संरक्षण मिळते, याबद्दल अद्याप अभ्यास सुरू आहे. अँटिबॉडी तीन ते सहा महिने टिकतात, असा अंदाज बांधण्यात आला आहे. कोरोना किती तीव्र स्वरूपाचा होता, यावर अँटिबॉडीचे प्रमाण अवलंबून असते. काहींमध्ये प्रमाण अतिशय कमी, तर काहींमध्ये पुरेसे असते. अँटिबीडी टेस्टमधून हे प्रमाण कळते. चाचण्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत. प्रकारानुसार प्रयोगशाळांमधील चाचण्यांचे दर ठरलेले असतात. हे दर ३००-८०० रुपयादरम्यान असू शकतात.

- डॉ. मिहीर कुलकर्णी, जनरल फिजिशियन