शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशातील भारतीय वकिलाची पुण्यात मदतीची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 14:02 IST

एका हिंदू मुलीची घेतलेली केस सोडून द्यावी याकरिता माझ्यावर दबाव आला. त्यानंतर वेळोवेळी धमकी देऊन माझ्यावर दोनवेळा प्राणघातक हल्ला देखील झाला.

ठळक मुद्देकट्टर इस्लामिक मूलतत्ववाद्यांचा वकिली व्यवसाय सोडावा याकरिता दबाव बांग्लादेशमध्ये सुमारे चार लाख वकील असून त्यापैकी तीन हजार हिंदू वकील भारताचे परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान यांना पत्र लिहून याप्रकरणी लक्ष्य घालून योग्य ती कारवाईची मागणी करणार

पुणे : एका हिंदू मुलीची घेतलेली केस सोडून द्यावी याकरिता दबाव आला. त्यानंतर वेळोवेळी धमकी देऊन दोनवेळा प्राणघातक हल्ला देखील झाला. मात्र, बांग्लादेश मध्येच राहावयाचे असल्याने धमक्यांना घाबरलो नाही. अखेर राहते घर जमीनदोस्त करून २४ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला. त्यामुळे भाडयाच्या घरात राहावे लागत आहे...ही कैफियत आहे बांगलादेश मधील ढाका येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या रवींद्र घोष यांची.. मी पत्नी आणि मुलांसह बांग्लादेश मधील ढाका येथे राहतो. बांग्लादेशमधील ढाका येथे राहत असलेले रवींद्र घोष हे वकील बुधवारी पुणे न्यायालयात वकिलांनी मदत करावी याकरिता दाखल झाले. बांग्लादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू वकिलांवर अत्याचार होत असून मागील २५ वर्षापासून अधिककाळ सर्वाेच्च न्यायालयात आपण वकिली करतो. मात्र, कट्टर इस्लामिक मूलतत्ववाद्यांनी आपणावर वकिली व्यवसाय सोडावा याकरिता दबाव टाकत आहेत. माझ्याप्रमाणे इतर हिंदू वकिलांवर अत्याचार होत असून भारतीय प्रशासनाने याप्रकरणी लक्ष्य घालून बांग्लादेशातील हिंदूवरचे अत्याचार थांबवावेत अशी मागणी पत्रकारांशी बोलताना अ‍ॅड. घोष यांनी केली आहे. अ‍ॅड.घोष म्हणाले, मी पत्नी आणि मुलांसह बांग्लादेश मधील ढाका येथे राहतो. बांग्लादेशच्या सर्वाेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांच्यावर ही मूलतत्ववाद्यांनी दबाव टाकून नोव्हेंबर २००७ मध्ये त्यांना राहत्या घरात बंदी बनवून त्यांच्याकडून जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतला. बांग्लादेशमध्ये सुमारे चार लाख वकील असून त्यापैकी तीन हजार हिंदू वकील आहे. तर, ढाका येथील सर्वाेच्च न्यायालयात सुमारे दहा हजार वकील असून त्यापैकी २६३ हिंदू वकील असून त्यापैकी माझ्यासारख्या ५० वकिलांवर अत्याचार करण्यात येत आहे. याबाबत अधिवक्ता परिषदेचे शहर सचिव अ‍ॅड. सागर सातपुते म्हणाले, अधिवक्ता परिषदेतर्फे  बांग्लादेश मधील वकिलांवर होणा-या अत्याचाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो. वकील हे न्यायालयात लोकांची बाजू मांडत असतात. त्यांना मोकळेपणाने त्यांचे काम करण्याची मुभा मिळावी. याप्रकरणी आम्ही भारताचे परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान यांना पत्र लिहून याप्रकरणी लक्ष्य घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करणार आहे. ....................................

टॅग्स :PuneपुणेBangladeshबांगलादेशadvocateवकिलHinduहिंदू