शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बायपास रस्ता झालाय धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:30 IST

अनेक वेळा निवेदने देऊनही रस्ते बांधकाम विभागाचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले

वाघापूर : दिवे घाटातून पुरंदर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर झेंडेवाडी ते कुंभारवळण असा वनपुरीमार्गे बायपास रस्ता महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी तयार केला आहे. परंतु या संपूर्ण मार्गावर रस्ते बांधकाम विभागाने सूचनाफलक, दिशादर्शक फलक, साईड पट्टे अथवा रात्रीच्या वेळी दिसणारे रिफ्लेक्टर दिवे बसविलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अंदाज न आल्याने गेल्या दोन वर्षांत अनेक मोठे अपघात होऊन कित्येक जणांचे प्राण गेले आहेत.याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा निवेदने देऊनही रस्ते बांधकाम विभागाचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून आलेआहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.एवढे होऊनही सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग मात्र सुस्तच असल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, वाघापूर, माळशीरस तसेच यवत आणि वाघापूरमार्गे, उरुळी, कांचन या रस्त्यांना मिळण्यासाठी झेंडेवाडीते वनपुरी या मार्गाचा अवलंब केला आहे. या रस्त्यावरून वाहतूक केल्याने सासवड येथे येण्याची गरज नसते तसेच किमान पाच किलो मीटरचे अंतर वाचत असल्यामुळे वेळ आणि इंधन यांचीही बचत होत आहे. यामुळे या मार्गाला वाहनचालकांची पहिली पसंती आहे. परंतु केवळ रस्ते बांधकाम विभागाचा हलगर्जीपणामुळे आता अनेकांच्या जिवावर बेतला आहे.या ठिकाणी आजपर्यंत किमान सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू आणि कित्येक जखमी झाल्याचे घाटना घडल्या आहेत.तर येथे मोठया घटना घडण्याचीही शक्यता आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींसह एकाही अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.>एकही दिशादर्शक फलक नाही...झेंडेवाडीपासून पूर्वेकडे दिवे, सोनोरी, वनपुरी आणि कुंभारवळण आणि पुढे पारगाव-मेमाणे या रस्त्याला हा रस्ता मिळतो. वास्तविक, या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करायला हव्या होत्या; मात्र संपूर्ण मार्गावर एकही दिशादर्शक फलक, वळण, पारदर्शक दिवे अथवा गावांचे बोर्ड अथवा झेब्रा क्रॉसिंग पट्टे असे कुठलेच फलक न लावल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाहीतआणि त्यामुळे वारंवार जीवघेणे अपघात होत आहेत.विशेषत: वनपुरीजवळ झेंडेवाडी ते कुंभारवळण आणि सासवड ते वाघापूर असा चौफुला तयार झाला असून चारही बाजूंनी अखंड वाहतूक सुरू असते. तसेच, या संपूर्ण मार्गावर रस्त्यालगत अनेक मोठमोठी झाडे असून त्यामुळेही वाहनचालकांना अंदाज येत नाही. यामुळे मार्गावर विविध कामांची मागणी वाहनचालक तसेच स्थानिकांकडून वारंवार केली जाते. तसेच याकडे वेळीच लक्ष न दिल्यास अनेक नागरिक आणि संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Puneपुणे