शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

व्यावसायिकाने रचला अपहरणाचा बनाव

By admin | Updated: September 23, 2015 03:42 IST

अनेकांची झालेली देणी आणि कर्जबाजारीपणामुळे सुरक्षारक्षक एजन्सी चालवणाऱ्या व्यावसायिकाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले असून

पुणे : अनेकांची झालेली देणी आणि कर्जबाजारीपणामुळे सुरक्षारक्षक एजन्सी चालवणाऱ्या व्यावसायिकाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले असून, यामुळे पोलिसांची मात्र तीन दिवस चांगलीच धावपळ उडाली. पोलीस यंत्रणेला कामाला लावून हा व्यावसायिक दिल्लीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. व्यावसायिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.प्रवीणकुमार निरंजन शर्मा (वय ४0, रा. निलगिरी पठार, आंबेगाव पठार) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. शर्मा यांच्या पत्नीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी अपहरणाची तक्रार दाखल केली होती. शर्मा यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या पत्नीला धमकीचे फोन आणि मेसेज येऊ लागल्यामुळे पत्नीही घाबरून गेली होती. पोलिसांनी तसेच खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील व त्यांच्या पथकाने मोबाईलसह अन्य तांत्रिक बाबींचा तपास करून शर्मा यांचे ‘लोकेशन’ घेतले. शर्मा दिल्लीमधील नोएडा येथे असल्याचे निष्पन्न झाल्यावर तपास पथकाचे उपनिरीक्षक अमोल देवकर व कर्मचारी कुंदन शिंदे यांना तातडीने दिल्लीला विमानाने रवाना केले. पोलीस दिल्लीमधील शर्मा उतरलेल्या हॉटेलमध्ये पोचले खरे; परंतु तेथून शर्मा दिल्ली विमानतळावर गेल्याची माहिती मिळताच पोलीस तिकडे धावले. पण ते विमान निघाले होते. त्यामुळे पुणे विमानतळावर पोलिसांनी शर्मा यांना ताब्यात घेतले.