शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी येत नाही अन् बोलणार पण नाही" असं म्हणणाऱ्या भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भाजपात प्रवेश
2
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
3
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
4
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
5
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
6
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन
7
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
8
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
9
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
10
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
11
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
12
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
13
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
14
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
15
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
16
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
17
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
18
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
19
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
20
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल

फोफावला ‘मिनरल वॉटर’चा व्यवसाय

By admin | Updated: May 7, 2015 05:12 IST

एकीकडे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे पुरवत असल्याचा प्रशासन दावा करीत आहे, तरीही नागरिकांकडून बाटलीबंद पाण्याला मागणी वाढतच आहे.

अंकुश जगताप, पिंपरीएकीकडे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे पुरवत असल्याचा प्रशासन दावा करीत आहे, तरीही नागरिकांकडून बाटलीबंद पाण्याला मागणी वाढतच आहे. त्यामुळे मागील ५ वर्षांत पिंपरी-चिंचवड, मावळ, मुळशी परिसरात बाटलीबंद पाण्याचा धंदा वर्षाकाठी ४०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शहरातील एखाद्या बड्या उद्योगालाही अर्थार्जनात मागे टाकणारे व डोळे विस्फारणारे हे आकडे आहेत. यातून सार्वजनिक पाणी वितरणाचे वाभाडे निघत आहेत. प्रशासनाचे प्रयत्न फोल ठरत असून, बाटलीबंद पाणी विकणारांचे हित साध्य होत असल्याचे उघड होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात इतर शहरांच्या तुलनेत पाणी स्वच्छ मिळत असल्याचा दावा प्रशासन करीत असते. मात्र, मागील काही वर्षांमध्ये पाणी वितरणातील विस्कळीतपणाचा अनुभव शहरवासीयांना आला आहे. शहराची जीवनवाहिनी असणाऱ्या पवना नदीकाठचे ग्रामस्थ दहा वर्षांपूर्वीपर्यंत थेट नदीतील पाणी पिण्यासाठी वापरत. मात्र, कारखान्यांचे रसायणमिश्रित आणि गावे, शहरांचे सांडपाणी सोडले गेल्याने नदीची गटारगंगा झाली आहे. नदीचे पाणी पिण्यासाठी सोडा, अंघोळीसाठीही वापरले जात नाही. प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याची नासाडी झाली असतानाच शहरालगतच्या मावळ, मुळशी तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये सार्वजनिक पाणी व्यवस्था अद्यापही सक्षम नाही. अनेक गावांचे पाणी योजना प्रस्ताव शासनदरबारी मंजुरीविना अथवा निधीअभावी रखडले आहेत. परिणामी, या भागातील रहिवाशांना नाइलाजास्तव बाटलीबंद पाण्याच्या पर्यायांचा विचार करावा लागला आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न रखडवत ठेवून प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कळत नकळत बाटलीबंद पाणी व्यावसायिकांना पोषक धोरण राबविण्याचा प्रकार सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. शहरातील अधिकृत ५, तसेच बाहेरील पाणी शुद्धीकरण कारखान्यांकडून हे पाणी पुरविले जाते. मात्र, त्यापोटी खिशाला मोठी झळ बसत आहे.पाण्याच्या बाटलीचे दर : १ लिटर (" २०) अर्धा लिटर बाटली (" ६ ते १०) २० लिटर (" ५०) १५ लिटर जार (" ६० )मंगल कार्यालयांत बाटल्यांचे फॅडशहरात ८०, तर मावळ, मुळशी भागात ५० मंगल कार्यालये आहेत. काही वर्षांपासून त्यामध्ये पिण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीचे अथवा कार्यालय मालकाकडील बोअरवेलचे पाणी पिण्यास वापरणे बंद होत आहे. त्या ठिकाणी बाटल्यांमधूनच पाणी देण्याचा आग्रह धरला जातो. हजार लोकांसाठी अर्धा लिटरच्या १८०० बाटल्या अथवा २० लिटरच्या ४० बाटल्या लागतात. नवीन पद्धतीने आलेले थंड पाण्याचे ५५ जार पुरवावे लागत असल्याची माहिती एका आचाऱ्याने दिली. सर्व कार्यालयांचा विचार केला, तर सरासरी १ लाख लिटर पाण्याचा व्यवसाय होत आहे. बाटलीत पालिकेचेच पाणीविशेष म्हणजे स्वत: कोणतीच प्रक्रिया न करता थेट महापालिकेचे पाणी बाटलीत भरून त्यावर हातानेच बूचन ठोकून हे पाणी विकले जात असल्याचे प्रकार अनेकांना माहीत आहे. अन्न औषध प्रशासनाने कारवाई करून हे प्रकार उघडकीसही आणले आहेत. तरीही बाटलीबंद पाण्याचाच आधार लोकांना घ्यावा लागत आहे. मावळ तालुक्यातही मोठ्या प्रमाणात बोअरवेल घेऊन अथवा बाटलीबंद पाणीविक्रीचे धंदे वाढले आहेत.शहरातील मागणीशहरात दर दिवसाला घरगुती ग्राहकांकडून सरासरी ५ लाख लिटर पाण्याची मागणी असते. हॉटेल व्यावसायिकांकडून ५ लाख, रेल्वे, बस, खासगी वाहतूक प्रणालीतील प्रवाशांकडून ८ लाख लिटर, उद्योग व्यवसाय आणि खासगी कार्यालयांमध्ये ७ लाख लिटर विचार करता ही एकूण २५ लाख लिटर पाण्याची मागणी आहे. लिटरमागे सरासरी ८ रुपयांचा दर ग्राह्य धरला, तरी दिवसाला २ कोटी रुपयांचा गल्ला जमतो. सहा महिन्यांत मागणी अधिक असल्याने या काळातच ३६० कोटी रुपये होतात. उर्वरित सहा महिन्यांत कमी मागणी असल्याने ४० कोटी रुपयांचा व्यवसाय होत असल्याची माहिती एका डिलरने ‘लोकमत’ला दिली. मंगल कार्यालयांत नासाडी सध्या लग्नसराईत लहान बाटल्यांमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. जेवण करणाऱ्यामागे दुसरा वाट पाहत उभा असतो. जेवणासाठी घाई झाल्याने जेवण उरकून एखादा घोट पाणी पिल्यावर संपूर्ण बाटलीतील पाणी फेकून दिले जाते. परिणामी, मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. गरज नसतानाही बाटलीबंद जादा पाण्याचा भुर्दंड सोसण्याची वेळ वधुपित्यावर येऊन त्यामुळे व्यावसायिकांचा धंदा जोमात चालल्याचे चित्र आहे.