शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने बस उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:24 IST

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल : तीन विद्यार्थी जखमी

आंबेगाव : मुंबई-बंगळुरू महामार्गावर कात्रजजवळ पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची बस उलटून झालेल्या अपघातात तीन विद्यार्थी जखमी झाले. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. आंबेगाव बुद्रुक येथील महामार्गाच्या लगत असलेल्या पोद्दार शाळेच्या इमारतीसमोरच चालकाचा ताबा सुटल्याने अपघात होऊन बस पलटी झाली. यात तीन मुलांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले असून, काही पालक मुलांना घरी घेऊन गेले.

या बसमध्ये एकूण पंधरा मुले होती. शाळेच्या शेजारीच अपघात झाल्याने तेथील मुलांना घेण्यासाठी आलेले पालक, शाळेचा स्टाफ, गाडीचालक तत्काळ धावून आल्याने मदत मिळून मुलांना बाहेर काढण्यासाठी मदत झाली. मुलांचे दैव बलवत्तर होते; कारण हाच अपघात दोनशे मीटर मागे असलेल्या आंबेगाव बुद्रुक भुयारी पुलाच्या मागील तीव्र उतारावर झाला असता तर खूप मोठी हानी झाली असती. या शाळेच्या दुपारच्या शिफ्टमध्ये धनकवडी, कात्रज, वंडरसिटी तसेच सावंत विहार भागातील एकूण १५ विद्यार्थी घेऊन ही बस शाळेकडे जात होती. शाळेजवळील उतारावर चालकाला बसचे ब्रेक निकामी असल्याचे लक्षात आल्यावर मोठा अपघात टाळण्यासाठी म्हणून उतारावरील एक दगडाला बस नेऊन धडकवली, बसचा वेग कमी असल्यामुळे ही बस अलगद पलटी झाल्याने मुलांना इजा झाली नाही. माहिती मिळाल्याप्रमाणे ही बस आठ वर्षे जुनी असून या गाडीची मागील काच फुटली होती. तसेच गाडीदेखील देखभाल-दुरुस्ती केलेली नसल्याचे समजते. तसेच शाळेत तक्रार करूनदेखील शाळा प्रशासनाने पालकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. या अपघाताची माहिती घेण्यासाठी म्हणून आंबेगाव पठार पोलीस चौकीचे उपनिरीक्षक शक्तीसिंग खानविलकर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली, तसेच पालकांचे व शाळेचे म्हणणे जाणून घेतले.बसच्या फोडल्या काचाया वेळी शाळेजवळ असणाऱ्या ईश्वरी भिवडे; तसेच इतर पालकांनी बसजवळ जाऊन बसच्या काचा फोडून जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. आम्ही सर्व पालक ही बस सहा महिन्यांपासून खराब असल्याची तक्रार करीत आहोत. या बसच्या मागील बाजूची काच तुटलेली होती, तसेच बस खराब असल्याची तक्रार करूनदेखील दुरुस्त करत नव्हते, शालेय फी भरमसाट आकारूनदेखील सोयी-सुविधा देत नसतील, तर शालेय प्रशासन काय करत आहे? हाच अपघात महामार्गावर किंवा अन्य गर्दीच्या ठिकाणी झाला असता तर मुलांचे काय हाल झाले असते?- सुशील कोळेकर,पालक 

टॅग्स :Puneपुणे