शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जमिनीच्या मोहापायी सख्ख्या भावाचा काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:31 IST

वडिलोपार्जित शेतजमिनीच्या भांडणाच्या कारणावरून मेहुण्याच्या सांगण्यावरून कट रचून भावाने आपल्या दोन मुलांच्या सहाय्याने सख्ख्या भावाचा लाकडी दांडके व टिकावाने मारून निर्घृणपणे खून केल्याची घटना भांबोरा, यमाईनगर, (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे घडली.

लोणी काळभोर -  वडिलोपार्जित शेतजमिनीच्या भांडणाच्या कारणावरून मेहुण्याच्या सांगण्यावरून कट रचून भावाने आपल्या दोन मुलांच्या सहाय्याने सख्ख्या भावाचा लाकडी दांडके व टिकावाने मारून निर्घृणपणे खून केल्याची घटना भांबोरा, यमाईनगर, (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे घडली.या घटनेत हनुमंत कोंडिबा चव्हाण (वय ५५) यांचा खून झाला असून त्यांचा मुलगा राहुल हनुमंत चव्हाण (वय २७, रा. भांबोरा, यमाईनगर, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश कोंडिबा चव्हाण, किरण रमेश चव्हाण, गणेश रमेश चव्हाण (भांबोरा, यमाईनगर, ता. कर्जत, जि. अहमदनगर) व सुनील रामदास पवार (रा. घुगलवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) या चौघांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हनुमंत व रमेश चव्हाण या दोघांनी ७ ते ८ वर्षांपूर्वी बहीण भामाबाई सर्जेराव शितोळे (रा. भांबोरा, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांच्याकडून प्रत्येकी अर्धा एकर जमीन विकत घेतली होती. त्यानंतर ५ ते ६ वर्षांपूर्वी पैशाची गरज असल्याने हनुमंत चव्हाण यांनी आपला भाऊ रमेश याचा मेहुणे सुनील रामदास पवार याला तीन लाख रुपयांना विकली होती. त्या वेळी पवार याने ही जमीन त्याची बहीण व रमेश चव्हाण याची बायको हिचे नावे खरेदीखताने घेतली होती.हा व्यवहार होताना हनुमंत चव्हाण याच्याकडे पैसे आल्यानंतर तीन लाख रुपये घेऊन परत द्यायची ठरले होते. ४ ते ५ महिन्यांपूर्वी हनुमंत चव्हाण याच्याकडे उसाचे पैसे आल्याने ३ लाख रुपये जमवून जमीन परत घेण्याकरिता सुनील पवार याच्याकडे गेले. परंतु पवार याने जमीन परत देण्यास नकार दिला. भाऊ रमेश याचा सुनील मेहुणा असल्याने दोन्ही भावांत शेतजमिनीच्या कारणावरून वाद सुरू झाले. त्यांत वडिलोपार्जित शेतजमिनीच्या हिश्श्याच्या कारणावरून भांडणे होत होती. त्या वादात पवार हस्तक्षेप करून रमेशची बाजू घेऊन हनुमंतवर दबाव आणून धमकावत होता.६ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून दोन्ही भावांत वाद झाला. त्या वेळी हनुमंत रमेश यांस आपण जमिनीची मोजणी करू असे म्हणत. परंतु रमेश याने त्याचे काहीच ऐकून न घेता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व त्याने अचानक हातात पाणी धरण्याचे खोरे त्यांचा मुलगा किरण याने लाकडी दांडके व गणेश याने लोखंडी टिकाव घेऊन हनुमंत याच्या अंगावर धावून आले. त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली, म्हणून हनुमंत याचीराहुल व महेंद्र ही दोन मुले भांडण सोडविण्यासाठी गेले, त्या वेळी रमेश याने भाऊ हनुमंत याला पकडले होते.किरण लाकडी दांडक्याने मारहाण करीत होता. तेवढ्यात गणेश याने त्याच्या हातातील लोखंडी टिकाव त्याच्या डोक्यात मारला. यामुळे हनुमंत चव्हाण याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले व ते बेशुद्ध पडल्याने मारहाण करणारे तिघेही निघून गेले. हनुमंत चव्हाण याला उपचारासाठी तत्काळ दौंड येथील पिरॅमिड रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्या रुग्णालयात उपचार सुरू असताना हनुमंत चव्हाण शुद्धीवर आले नाहीत, म्हणून पुढील औषधोपचार करण्यासाठी त्यांच्या मुलांनी आज ससून रुग्णालयात नेण्याचे ठरवले. रुग्णवाहिकेतून पुणे येथे निघाले असता त्यांनी यवत टोलनाका ओलांडून पुढे आले असता हनुमंत चव्हाण यांचा श्वासोच्छ्वास व शरीराची हालचाल मंदावल्याचे जाणवले, म्हणून त्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दुपारी १-३० वाजण्याच्या सुमारास नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते मृत झाले असल्याचे घोषित केले. लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी अहमदनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा