शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाला पडल्या भेगा, अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 03:10 IST

पाथरगावाजवळून गेलेल्या मुंबई-पुणे जुन्या महामार्गाच्या इंद्रायणी नदीवरील पुलाने शंभरी ओलांडून २१ वर्षे झाली आहेत. या पुलाचे वय १२१ वर्र्षे झाले असून, या पुलाची अनेक ठिकाणी मोठी दुरवस्था झाली आहे. पुलाच्या भिंतींवर झाडे उगवली असून, त्यामुळे भिंतींना जागोजागी भेगा पडल्या आहेत.

कामशेत : पाथरगावाजवळून गेलेल्या मुंबई-पुणे जुन्या महामार्गाच्या इंद्रायणी नदीवरील पुलाने शंभरी ओलांडून २१ वर्षे झाली आहेत. या पुलाचे वय १२१ वर्र्षे झाले असून, या पुलाची अनेक ठिकाणी मोठी दुरवस्था झाली आहे. पुलाच्या भिंतींवर झाडे उगवली असून, त्यामुळे भिंतींना जागोजागी भेगा पडल्या आहेत.पाथरगावाच्या हद्दीत ताजे-पिंपळोली फाट्याजवळील लोहमार्ग व इंद्रायणी नदीवरील जुना मुंबई-पुणे महामार्गावरील दोन लेनसाठी चार पूल असून, यातील दोन पूल लोहमार्ग व दोन पूल इंद्रायणी नदीवर आहेत. मुंबई-पुणे या लेनवरील दोन पूल नवीन आहेत. तर पुणे-मुंबई लेनवरील दोन पूल खूपच जुने आहेत. या पुलांनी शंभरी पार केली असून, त्यांची दुरवस्था झाली आहे. यातील इंद्रायणी नदीवरील पुलाच्या भिंतीवर १८९६मध्ये पूल बांधल्याची नोंद आहे. राहिलेले दोन पूल हे महामार्गाच्या दोन लेन सुरू होताना काही वर्षांपूर्वी बांधले असल्याचे समजते. दोन्ही पूल हे एकमेकांना समांतर आहेत. या पुलांवरून पुण्याकडे जाणारी व जुन्या पुलावरून मुंबईकडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू असून, रात्रंदिवस या पुलांवरून हजारो वाहने ये-जा करीत असतात.पाथरगावच्या हद्दीतील खिंड, ताजे पिंपळोली गावाकडे जाणारा फाटा, तीव्र वळण, चढ व उतार यामुळे हे अपघातप्रवण क्षेत्र असून, येथे होणाºया अपघातांचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय जुन्या पुलांच्या सुरुवातीला ताजे-पिंपळोली फाटा येथे गावातून महामार्गावर येणाºया रस्त्यावर तीव्र चढण असल्याने समोरील महामार्गावरील वाहनाचा अंदाज येत नाही. रस्ता ओलांडताना अनेक ग्रामस्थांचे हकनाक बळी गेले आहेत. तर पाथरगाव खिंडीतून पुढे तीव्र उतार व तीव्र वळण असल्याने वेगात येणाºया अनेक वाहनचालकांना अंदाज न आल्याने वाहने पुलाच्या अलीकडील बाजूस खड्ड्यात पडून अपघात होत आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी वाहने अपघात होऊन रस्त्याच्या खाली पडतात. मात्र, अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून दिसत नसल्याने अनेक अपघातग्रस्तांचे उपचाराअभावी मृत्यू झाले आहेत. वारंवार होणाºया अपघातांमुळे पुलाच्या कठड्यांची पडझड होत असते. इंद्रायणी नदीवरील हा पूल बांधून अनेक वर्षे उलटल्याने पूल जीर्ण झाला आहे.संरक्षक कठड्यांची ग्रामस्थांची मागणीमावळ परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असून, पावसाचा जोर वाढल्यास कमी दिवसांतच इंद्रायणी नदीला पूर येण्याच्या घटना घडत असतात. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते. ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असून, जुन्या पुलाची उंची कमी असल्याने नदीचे पाणी पुलाच्या मोºयांवर येते. जीर्ण झालेला हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या पुलाच्या सुरुवातीला ताजे पिंपळोली फाट्यापर्यंत संरक्षक कठडे बांधावेत, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

टॅग्स :Puneपुणे