शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

न्यायालयीन आदेशही मोडीत, प्रार्थनास्थळांकडे दुर्लक्ष, किरकोळ विक्रेत्यांवर बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 05:09 IST

मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही पदपथांवरच्या धार्मिक स्थळांवरील कारवाई तब्बल वर्षभर टाळणाºया महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने रस्त्यांवरच्या किरकोळ विक्रेत्यांना बडगा दाखवणे सुरू केले आहे.

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही पदपथांवरच्या धार्मिक स्थळांवरील कारवाई तब्बल वर्षभर टाळणाºया महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने रस्त्यांवरच्या किरकोळ विक्रेत्यांना बडगा दाखवणे सुरू केले आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांचा सविस्तर अहवाल उपलब्ध असताना तो बाजूला ठेवण्यात आला आहे व खाद्यपदार्थ विक्रेते, पथारीवाले यांच्यावर कारवाई केली जात आहे.मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महापालिका प्रशासनाला शहरातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती घेण्याचे व तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने पहिल्या टप्प्यात पदपथावरील तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाºया अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती जमा केली होती. ती करताना १९६० पूर्वीची धार्मिक स्थळे १९६० ते २००९ या कालावधीतील, तर २००९ याप्रमाणे अ, ब, क अशी वर्गवारी केली आहे. महापालिकेच्याच अहवालानुसार एकूण ५६८ स्थळे आहेत.आतापर्यंत महापालिकेने त्यातील फक्त १०३ धार्मिक स्थळांवर गेल्या वर्षभरात कारवाई केली आहे. उर्वरित ४६५ अनधिकृत धार्मिक स्थळे जैसे थे अवस्थेत आहेत. विविध कारणांनी पुढील कारवाई करणे टाळले जात आहे. त्यात कायदा सुव्यवस्था, पोलीस बंदोबस्त, राजकीय दबाव अशी अनेक कारणे आहेत. अनेकदा महापालिकेचे पथक कारवाई करण्यास गेले व राजकीय दबावामुळे परत आले असे झाले आहे.असे असताना रस्त्यांवरील किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेते, पथारीवाले यांच्यावर मात्र गेल्या काही दिवसांमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. या विक्रेत्यांचा वाहतुकीला अडथळा होत असतोच पण मोठ्या दुकानदारांनाही ते रस्त्यावर नकोसे असतात, कारण ग्राहक दुकानात येत नाहीत. त्यातूनच ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत एकूण ६६ अनधिकृत स्टॉल काढण्यात आले, ७८५ हातगाडी विक्रेते, ६४५ पथारीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. स्वयंपाकाच्या गॅसचा गैरवापर करताना १९८ टाक्या पकडण्यात आल्या. परवानगी न घेता बांधलेल्या ९२ शेड काढून टाकण्यात आल्या. वाहनतळ नसताना लावलेली ७ वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे