शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणसंवर्धनासाठी ‘ब्राऊनलिफ’ चळवळ, नव्या वर्षाचा नवा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 05:25 IST

झाडाचे पान गळून पडले की, त्याचा काही उपयोग नसतो, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. परंतु हे गळालेले पानदेखील खूप मोलाचे आहे. ते पर्यावरणासाठी उपयुक्त ठरू शकते. पानगळती झाली, की अनेक ठिकाणी कचरा समजून त्याला जाळण्यात येते.

- श्रीकिशन काळेपुणे : झाडाचे पान गळून पडले की, त्याचा काही उपयोग नसतो, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. परंतु हे गळालेले पानदेखील खूप मोलाचे आहे. ते पर्यावरणासाठी उपयुक्त ठरू शकते. पानगळती झाली, की अनेक ठिकाणी कचरा समजून त्याला जाळण्यात येते. परंतु, जाळल्यानंतर उलट त्याचा धूर आरोग्यास धोकादायक ठरतो. ही पाने कोणीही जाळू नये, तर त्याचे जतन करावे. हाच नवीन वर्षाचा संकल्प ‘ब्राऊनलिफ’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या चळवळीत नागरिकांनीही सहभागी होऊन पर्यावरण जपण्याचा ध्यास घेतला पाहिजे. ही चळवळ पर्यावरणासाठी नक्कीच लाभदायक ठरणारी आहे. दरवर्षी सुमारे नोव्हेंबर ते मार्च महिन्यात पानगळती होत असते. त्यामुळे परिसरात प्रचंड ‘ब्राऊनलिफ’ पडलेले असतात. हा कचरा समजून सफाई कर्मचारी एकत्र करून ते जाळून टाकतात. त्यामुळे पर्यावरणाचीच हानी होत असल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही. ही गळती झालेली पानेदेखील निसर्गासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे ती जाळू नयेत, यासाठी पर्यावरणप्रेमी अदिती देवधर यांनी ‘ब्राऊनलिफ’ ही चळवळ सुरू केली आहे.दोन वर्षांपूर्वी त्यांनी ही संस्था सुरू केली. त्याद्वारे ‘ब्राऊनलिफ’साठी कार्य सुरू केले. या ‘ब्राऊनलिफ’ संकेतस्थळावर त्यांनी या चळवळीबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. देशात एकही ‘ब्राऊन’ पान जाळले जाऊ नये, हा त्यांचा संकल्प आहे. त्यासाठी त्यांनी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी या चळवळीसाठी कार्य करणाºयांचा समावेश केला आहे. प्रत्येक जण आपापल्या भागात याबाबत जनजागृती करीत आहेत.झाडावरून गळून पडलेल्या पानांमध्ये ५० ते ७० टक्के पोषक द्रव्य असते. ते जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. या पानांमुळे मातीमधील ओलावा टिकून ठेवला जातो. या पानांमुळे बाष्पीकरण कमी होते. त्यामुळे ही पाने झाडांच्याभोवती टाकली पाहिजेत.पाने जाळणे धोकादायककोरडी पाने जाळण्यावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. कारण हा वायूप्रदूषणाचा एक भाग आहे. त्यामुळे पर्यावरण व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या धुरामध्ये अनेक विषारी कण आणि वायू तयार होत असतात. परिणामी अशी पाने जाऊ नये, यासाठी ही ‘ब्राऊनलिफ’ची चळवळ सुरू करण्यात आली आहे. कोरडे पाने जाळल्यानंतर खोकला, छातीत दुखणे, धाप लागणे, दीर्घकालीन श्वसनाची समस्या निर्माण होणे आदी त्रास नागरिकांना होऊ शकतो. दमा किंवा इतर श्वसनाच्या विकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी तर ही पाने जाळणे अत्यंत धोकादायक आहे.या पानांचे करायचे काय?सध्या दररोज पानगळती झाल्यानंतर जमिनीवर कोरडी पाने पडलेली असतात. या पानांचे करायचे काय ? असा प्रश्न अनेकांना पडतो, तर त्यावर ‘ब्राऊन लिफ’ने तीन उपाय सुचविले आहेत.पहिला :तुमच्या सोसायटीमध्ये किंवा एखाद्या मोकळ्या जागी ही पाने एकत्र करून ठेवा.दुसरा : पाने एकत्र करून त्यापासून कंपोस्ट तयार करता येते.तिसरा : ‘ब्राऊनलिफ’ ही संस्था एकत्र केलेली पाने ज्यांना गरज आहे, त्यांना देते. त्यामुळे सोसायटीधारकांनी ही पाने एकत्र करून संस्थेला दान करावीत. 

टॅग्स :Puneपुणे