शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

बारावी उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर बहिष्कार; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदाेलन सुरू

By प्रशांत बिडवे | Updated: February 21, 2024 17:12 IST

मागण्यांसंदर्भात तातडीने ताेडगा निघाला नाही तर बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे...

पुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मागण्यांसंदर्भात वारंवार आंदोलने करूनही त्या पूर्ण करण्याऐवजी केवळ आश्वासने देण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावी परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून आंदाेलनात्मक पवित्रा घेतला आहे. महासंघाने बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. मागण्यांसंदर्भात तातडीने ताेडगा निघाला नाही तर बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महासंघाने गतवर्षी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला हाेता. शिक्षणमंत्र्यांनी दि. २ मार्च २०२३ राेजी काही मागण्या लेखी स्वरूपात मान्य करीत अश्वासन दिल्यानंतर महासंघाने बहिष्कार मागे घेतला हाेता. मात्र, १२९८ वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी पदांवर कार्यरत केवळ २८३ शिक्षकांच्या समावेशनाचा आदेश दि ९ नाेव्हेंबर २३ रोजी काढण्यात आला. अनेक शिक्षकांबाबत त्रुटींची पूर्तता होऊनही त्यांचे समावेशनाचे आदेश निघालेले नाहीत तसेच वेतन अद्याप सुरू झालेले नाही. यासह इतर मागण्यांसदर्भात एक वर्ष हाेउनही सकारात्मक ताेडगा निघाला नाही. त्यामुळे पुन्हा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकत आंदाेलन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती महासंघाचे सरचिटणीस प्रा.संताेष फासगे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. राहुल गाेलांदे यांनी दिली.

काय आहेत शिक्षकांच्या मागण्या :

१. नाेव्हेंबर २००५ पूर्वी तसेच त्यानंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. २. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०,२०,३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी. ३. निवड श्रेणीसाठीची २० टक्क्यांची अट रद्द करावी. ४. सर्व वाढीव पदांना मंजुरी द्यावी व आय.टी. विषय शिक्षकांना वेतन श्रेणी द्यावी. शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरीत भरा. ५. कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडी मान्यतेसाठी शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात २१ तर वरिष्ठ महाविद्यालय संलग्नितमध्ये ३१ विद्यार्थी ग्राह्य धरावेत. ६. एम.फिल., एम.एड., पीएच.डी. धारक शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकांप्रमाणे वेतन वाढ लागू करावी व केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय ६० करावे. ७. अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील अ़ंशकालीन घड्याळी तासावरील शिक्षकांना शासकीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे मानधन द्यावे.

इंग्रजी विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक झाली नाही

राज्यातील शिक्षक बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडणार आहेत. शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे मुख्य नियामकांची बैठक हाेउ शकली नाही. मुख्य नियमकांची बैठक न झाल्याने इंग्रजी विषयाच्या गुणदानाबाबत चर्चा झाली नाही त्यामुळे राज्यातील नियामकांना व परीक्षकांना मार्गदर्शन हाेणार नाही. बहिष्कारामुळे इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी हाेणार नाही.

टॅग्स :examपरीक्षाPuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षा