शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
3
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
4
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
5
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
8
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
9
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
10
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
11
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
12
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
14
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
15
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
16
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
17
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
18
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
19
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
20
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल

'CAA अन् NRC दोन्ही कायद्यांमुळे सामाजिक, धार्मिक ऐक्य धोक्यात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 06:27 IST

शरद पवार यांचे प्रतिपादन

पुणे : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व नागरिकत्व नोंदणी कायद्याचे राज्यांना पालन करावेच लागेल, असे केंद्र सरकार म्हणणे अयोग्य आहे. विरोध करणाऱ्या राज्य सरकारांचीच यंत्रणा कायद्यातील तरतुदींचे पालन करणार आहे. त्यामुळे विरोधातील राज्यांचा विचार न करणे अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही या कायद्यांबाबत योग्य भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

सामाजिक व धार्मिक ऐक्य केंद्र सरकार धोक्यात आणत आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळविण्यासाठी व विरोधकांचे न ऐकता सरकारने हे कायदे केले, असे सांगून ते म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधून येणाऱ्यांच्या चिंतेमुळे ही दुरुस्ती केली, असे सरकार सांगते, पण श्रीलंका व नेपाळला वगळले याचाच अर्थ केंद्र विशिष्ट गटाच्या विरोधात भूमिका घेत आहे.आठ राज्यांनी या कायद्यास विरोध केला आहे. नितीशकुमार व रामविलास पासवान हे नेते भाजपसोबत असूनही त्यांनी विरोधी मत व्यक्त केले. निवृत्त नौदलप्रमुख रामदास, तसेच अनेक साहित्यिक, विचारवंत कायद्याविरोधात आहेत. तरीही केंद्र सरकार बोलायला तयार नाही. अशाने सामाजिक, धार्मिक ऐक्य धोक्यात येईल. आपले म्हणणे विरोधकांनी शांतपणे, लोकशाही मार्गाने सरकारपर्यंत पोहोचवावे, सरकारनेही विरोधकाशी संवाद साधावा, असेही पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक