शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

दुबईतील मराठी उद्योजिकेची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:14 IST

पुण्याच्या शिवाजीनगर भागात राहणारी चंदला मनोहर कुलकर्णी ही तरुणी मॉडर्न कॉलेजमधून पदवीधर झाली. कॉस्ट अकाउंटंट असल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन हा ...

पुण्याच्या शिवाजीनगर भागात राहणारी चंदला मनोहर कुलकर्णी ही तरुणी मॉडर्न कॉलेजमधून पदवीधर झाली. कॉस्ट अकाउंटंट असल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन हा तिच्या विशेष अभ्यासाचा व आवडीचा विषय बनला. कॉटन ग्रीव्हज कंपनीत ऑडिट ऑफिसर म्हणून सुमारे चार वर्षांचा अनुभव घेत असतानाच लग्न होऊन ती बनली श्रुती जयंत गोखले! पुण्याची ही तरुणी आज 40 वर्षांनंतर दुबईतील प्रख्यात कंपनीची पार्टनर व मॅनेजिंग डायरेक्टर झाली असून, कंपनीची एक हजार कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल होत आहे.

1982 मध्ये पतीसमवेत त्या ओमानला गेल्या. तेथे उपेंद्र एम. किणी यांच्या सिव्हिलको या कंपनीत व नंतर 1987 मध्ये दुबईत लिंक मिडल ईस्ट लि. ही कंपनी स्थापन करून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. आर्थिक व्यवस्थापनातील कौशल्यामुळे त्या कंपनीच्या भागीदार बनल्या. तेव्हा सुमारे 30 कर्मचारी असणाऱ्या या कंपनीत आता दोन हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यामध्ये बहुतांशी भारतीय असून, 200 हून अधिक इंजिनिअर आहेत. ही कंपनी दुबईमधील रोजगार देणारी तिसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे.

देशांमधील सीमा तसेच विमानतळ, लष्करी आस्थापना आदी अनेक ठिकाणी आवश्यक असणारे स्टील तारांचे (वायर्स) कुंपण तयार करण्याचा या कंपनीचा व्यवसाय 75 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि वार्षिक उलाढालही एक हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून व भागीदार म्हणून श्रुती गोखले यांनी कंपनीला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून दिला. नुकताच यावर्षी 31 जानेवारी रोजी दुबईत ऑनलाइन झालेल्या विश्व मराठी संमेलनात ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले गेले.

दीर्घ काळ परदेशात राहूनही अतिशय शुद्ध मराठीतच त्या बोलतात. त्या म्हणाल्या, ‘जागतिक दर्जाची दुबईतील भारतीय कंपनी हा नावलौकिक आम्ही मिळवला, टिकवला व त्यात शेकडो भारतीय नोकरी करीत आहेत. कंपनीचे संस्थापक उपेंद्र एम. किणी हे माझे मार्गदर्शक, गुरू आणि दुबईमधील पालक बनले होते. त्यांच्या निधनानंतर या कंपनीची जबाबदारी मी सांभाळत आहे ते केवळ मला मिळालेला अनुभव व शिकवणीमुळेच !’

त्या म्हणाल्या, ‘मी जरी दुबईत राहत असेल तरी माझे भारताशी, महाराष्ट्राशी आणि पुण्याशी असणारे भावनिक नाते कायम राहिले आहे. पुण्यात येताना गुढीपाडवा, नवरात्र, दिवाळी या आपल्या सणांच्या काळात शक्यतो येण्याचा मी प्रयत्न करीत असते. उद्योगातील यशाबरोबरच सामाजिक कार्याची जोडही आम्ही दिली असून, म्हैसूर येथे आमच्या शैक्षणिक प्रतिष्ठानमार्फत गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण, केरळमधील वेश्यांच्या मुलांचे शिक्षण व तेथे निराधार मुलांचे केंद्र संस्थेतर्फे चालू आहे. पुण्यातही प्रतिष्ठानतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी प्रकल्प राबविण्याची योजना मनात आहे.

-

(संदर्भ : प्रवीण. प्र. वाळिंबे)