शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुबईतील मराठी उद्योजिकेची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:14 IST

पुण्याच्या शिवाजीनगर भागात राहणारी चंदला मनोहर कुलकर्णी ही तरुणी मॉडर्न कॉलेजमधून पदवीधर झाली. कॉस्ट अकाउंटंट असल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन हा ...

पुण्याच्या शिवाजीनगर भागात राहणारी चंदला मनोहर कुलकर्णी ही तरुणी मॉडर्न कॉलेजमधून पदवीधर झाली. कॉस्ट अकाउंटंट असल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन हा तिच्या विशेष अभ्यासाचा व आवडीचा विषय बनला. कॉटन ग्रीव्हज कंपनीत ऑडिट ऑफिसर म्हणून सुमारे चार वर्षांचा अनुभव घेत असतानाच लग्न होऊन ती बनली श्रुती जयंत गोखले! पुण्याची ही तरुणी आज 40 वर्षांनंतर दुबईतील प्रख्यात कंपनीची पार्टनर व मॅनेजिंग डायरेक्टर झाली असून, कंपनीची एक हजार कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल होत आहे.

1982 मध्ये पतीसमवेत त्या ओमानला गेल्या. तेथे उपेंद्र एम. किणी यांच्या सिव्हिलको या कंपनीत व नंतर 1987 मध्ये दुबईत लिंक मिडल ईस्ट लि. ही कंपनी स्थापन करून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. आर्थिक व्यवस्थापनातील कौशल्यामुळे त्या कंपनीच्या भागीदार बनल्या. तेव्हा सुमारे 30 कर्मचारी असणाऱ्या या कंपनीत आता दोन हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यामध्ये बहुतांशी भारतीय असून, 200 हून अधिक इंजिनिअर आहेत. ही कंपनी दुबईमधील रोजगार देणारी तिसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे.

देशांमधील सीमा तसेच विमानतळ, लष्करी आस्थापना आदी अनेक ठिकाणी आवश्यक असणारे स्टील तारांचे (वायर्स) कुंपण तयार करण्याचा या कंपनीचा व्यवसाय 75 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि वार्षिक उलाढालही एक हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून व भागीदार म्हणून श्रुती गोखले यांनी कंपनीला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून दिला. नुकताच यावर्षी 31 जानेवारी रोजी दुबईत ऑनलाइन झालेल्या विश्व मराठी संमेलनात ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले गेले.

दीर्घ काळ परदेशात राहूनही अतिशय शुद्ध मराठीतच त्या बोलतात. त्या म्हणाल्या, ‘जागतिक दर्जाची दुबईतील भारतीय कंपनी हा नावलौकिक आम्ही मिळवला, टिकवला व त्यात शेकडो भारतीय नोकरी करीत आहेत. कंपनीचे संस्थापक उपेंद्र एम. किणी हे माझे मार्गदर्शक, गुरू आणि दुबईमधील पालक बनले होते. त्यांच्या निधनानंतर या कंपनीची जबाबदारी मी सांभाळत आहे ते केवळ मला मिळालेला अनुभव व शिकवणीमुळेच !’

त्या म्हणाल्या, ‘मी जरी दुबईत राहत असेल तरी माझे भारताशी, महाराष्ट्राशी आणि पुण्याशी असणारे भावनिक नाते कायम राहिले आहे. पुण्यात येताना गुढीपाडवा, नवरात्र, दिवाळी या आपल्या सणांच्या काळात शक्यतो येण्याचा मी प्रयत्न करीत असते. उद्योगातील यशाबरोबरच सामाजिक कार्याची जोडही आम्ही दिली असून, म्हैसूर येथे आमच्या शैक्षणिक प्रतिष्ठानमार्फत गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण, केरळमधील वेश्यांच्या मुलांचे शिक्षण व तेथे निराधार मुलांचे केंद्र संस्थेतर्फे चालू आहे. पुण्यातही प्रतिष्ठानतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी प्रकल्प राबविण्याची योजना मनात आहे.

-

(संदर्भ : प्रवीण. प्र. वाळिंबे)