शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

दुबईतील मराठी उद्योजिकेची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:14 IST

पुण्याच्या शिवाजीनगर भागात राहणारी चंदला मनोहर कुलकर्णी ही तरुणी मॉडर्न कॉलेजमधून पदवीधर झाली. कॉस्ट अकाउंटंट असल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन हा ...

पुण्याच्या शिवाजीनगर भागात राहणारी चंदला मनोहर कुलकर्णी ही तरुणी मॉडर्न कॉलेजमधून पदवीधर झाली. कॉस्ट अकाउंटंट असल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन हा तिच्या विशेष अभ्यासाचा व आवडीचा विषय बनला. कॉटन ग्रीव्हज कंपनीत ऑडिट ऑफिसर म्हणून सुमारे चार वर्षांचा अनुभव घेत असतानाच लग्न होऊन ती बनली श्रुती जयंत गोखले! पुण्याची ही तरुणी आज 40 वर्षांनंतर दुबईतील प्रख्यात कंपनीची पार्टनर व मॅनेजिंग डायरेक्टर झाली असून, कंपनीची एक हजार कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल होत आहे.

1982 मध्ये पतीसमवेत त्या ओमानला गेल्या. तेथे उपेंद्र एम. किणी यांच्या सिव्हिलको या कंपनीत व नंतर 1987 मध्ये दुबईत लिंक मिडल ईस्ट लि. ही कंपनी स्थापन करून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. आर्थिक व्यवस्थापनातील कौशल्यामुळे त्या कंपनीच्या भागीदार बनल्या. तेव्हा सुमारे 30 कर्मचारी असणाऱ्या या कंपनीत आता दोन हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यामध्ये बहुतांशी भारतीय असून, 200 हून अधिक इंजिनिअर आहेत. ही कंपनी दुबईमधील रोजगार देणारी तिसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे.

देशांमधील सीमा तसेच विमानतळ, लष्करी आस्थापना आदी अनेक ठिकाणी आवश्यक असणारे स्टील तारांचे (वायर्स) कुंपण तयार करण्याचा या कंपनीचा व्यवसाय 75 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि वार्षिक उलाढालही एक हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून व भागीदार म्हणून श्रुती गोखले यांनी कंपनीला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून दिला. नुकताच यावर्षी 31 जानेवारी रोजी दुबईत ऑनलाइन झालेल्या विश्व मराठी संमेलनात ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले गेले.

दीर्घ काळ परदेशात राहूनही अतिशय शुद्ध मराठीतच त्या बोलतात. त्या म्हणाल्या, ‘जागतिक दर्जाची दुबईतील भारतीय कंपनी हा नावलौकिक आम्ही मिळवला, टिकवला व त्यात शेकडो भारतीय नोकरी करीत आहेत. कंपनीचे संस्थापक उपेंद्र एम. किणी हे माझे मार्गदर्शक, गुरू आणि दुबईमधील पालक बनले होते. त्यांच्या निधनानंतर या कंपनीची जबाबदारी मी सांभाळत आहे ते केवळ मला मिळालेला अनुभव व शिकवणीमुळेच !’

त्या म्हणाल्या, ‘मी जरी दुबईत राहत असेल तरी माझे भारताशी, महाराष्ट्राशी आणि पुण्याशी असणारे भावनिक नाते कायम राहिले आहे. पुण्यात येताना गुढीपाडवा, नवरात्र, दिवाळी या आपल्या सणांच्या काळात शक्यतो येण्याचा मी प्रयत्न करीत असते. उद्योगातील यशाबरोबरच सामाजिक कार्याची जोडही आम्ही दिली असून, म्हैसूर येथे आमच्या शैक्षणिक प्रतिष्ठानमार्फत गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण, केरळमधील वेश्यांच्या मुलांचे शिक्षण व तेथे निराधार मुलांचे केंद्र संस्थेतर्फे चालू आहे. पुण्यातही प्रतिष्ठानतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी प्रकल्प राबविण्याची योजना मनात आहे.

-

(संदर्भ : प्रवीण. प्र. वाळिंबे)