शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दुबईतील मराठी उद्योजिकेची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:14 IST

पुण्याच्या शिवाजीनगर भागात राहणारी चंदला मनोहर कुलकर्णी ही तरुणी मॉडर्न कॉलेजमधून पदवीधर झाली. कॉस्ट अकाउंटंट असल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन हा ...

पुण्याच्या शिवाजीनगर भागात राहणारी चंदला मनोहर कुलकर्णी ही तरुणी मॉडर्न कॉलेजमधून पदवीधर झाली. कॉस्ट अकाउंटंट असल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन हा तिच्या विशेष अभ्यासाचा व आवडीचा विषय बनला. कॉटन ग्रीव्हज कंपनीत ऑडिट ऑफिसर म्हणून सुमारे चार वर्षांचा अनुभव घेत असतानाच लग्न होऊन ती बनली श्रुती जयंत गोखले! पुण्याची ही तरुणी आज 40 वर्षांनंतर दुबईतील प्रख्यात कंपनीची पार्टनर व मॅनेजिंग डायरेक्टर झाली असून, कंपनीची एक हजार कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल होत आहे.

1982 मध्ये पतीसमवेत त्या ओमानला गेल्या. तेथे उपेंद्र एम. किणी यांच्या सिव्हिलको या कंपनीत व नंतर 1987 मध्ये दुबईत लिंक मिडल ईस्ट लि. ही कंपनी स्थापन करून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. आर्थिक व्यवस्थापनातील कौशल्यामुळे त्या कंपनीच्या भागीदार बनल्या. तेव्हा सुमारे 30 कर्मचारी असणाऱ्या या कंपनीत आता दोन हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यामध्ये बहुतांशी भारतीय असून, 200 हून अधिक इंजिनिअर आहेत. ही कंपनी दुबईमधील रोजगार देणारी तिसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे.

देशांमधील सीमा तसेच विमानतळ, लष्करी आस्थापना आदी अनेक ठिकाणी आवश्यक असणारे स्टील तारांचे (वायर्स) कुंपण तयार करण्याचा या कंपनीचा व्यवसाय 75 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि वार्षिक उलाढालही एक हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून व भागीदार म्हणून श्रुती गोखले यांनी कंपनीला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून दिला. नुकताच यावर्षी 31 जानेवारी रोजी दुबईत ऑनलाइन झालेल्या विश्व मराठी संमेलनात ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले गेले.

दीर्घ काळ परदेशात राहूनही अतिशय शुद्ध मराठीतच त्या बोलतात. त्या म्हणाल्या, ‘जागतिक दर्जाची दुबईतील भारतीय कंपनी हा नावलौकिक आम्ही मिळवला, टिकवला व त्यात शेकडो भारतीय नोकरी करीत आहेत. कंपनीचे संस्थापक उपेंद्र एम. किणी हे माझे मार्गदर्शक, गुरू आणि दुबईमधील पालक बनले होते. त्यांच्या निधनानंतर या कंपनीची जबाबदारी मी सांभाळत आहे ते केवळ मला मिळालेला अनुभव व शिकवणीमुळेच !’

त्या म्हणाल्या, ‘मी जरी दुबईत राहत असेल तरी माझे भारताशी, महाराष्ट्राशी आणि पुण्याशी असणारे भावनिक नाते कायम राहिले आहे. पुण्यात येताना गुढीपाडवा, नवरात्र, दिवाळी या आपल्या सणांच्या काळात शक्यतो येण्याचा मी प्रयत्न करीत असते. उद्योगातील यशाबरोबरच सामाजिक कार्याची जोडही आम्ही दिली असून, म्हैसूर येथे आमच्या शैक्षणिक प्रतिष्ठानमार्फत गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण, केरळमधील वेश्यांच्या मुलांचे शिक्षण व तेथे निराधार मुलांचे केंद्र संस्थेतर्फे चालू आहे. पुण्यातही प्रतिष्ठानतर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी प्रकल्प राबविण्याची योजना मनात आहे.

-

(संदर्भ : प्रवीण. प्र. वाळिंबे)