शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खून करून मृतदेह जंगलात पुरला, नगर जिल्ह्यातील घारगावमध्ये केला निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:33 IST

शरीर सुखासाठी वेश्या न पुरविल्याच्या या कारणावरुन मित्रांनी तरुणाच्या डोक्यात पाटा घालून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

चाकण : शरीर सुखासाठी वेश्या न पुरविल्याच्या या कारणावरुन मित्रांनी तरुणाच्या डोक्यात पाटा घालून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चाकणच्या या तरुणाला अहमदनगर जिल्ह्यातील घारगावमध्ये नेऊन मारल्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात पुरण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली.बाळू जनार्दन नवले (वय ४५, रा. खालुंब्रे, ता. खेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. नवले हे मुळचे जुन्नर तालुक्यातील कुरण येथील रहिवासी होते. याप्रकरणी भीमराव मारुती पवार ( वय ३२, रा. खालूंब्रे, ता.खेड, मुळगाव धुमाळवाडी, पो. डोळसने, घारगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले यांचे लग्न झालेले असून खालुंब्रे येथे ते पत्नीसह राहण्यास होते. आरोपी आणि नवले एकमेकांचे मित्र होते.नवले यांना २४ जानेवारी रोजी मोबाईलवर फोन आला. कुरण गावी जाऊन येतो असे पत्नीला सांगून नवले दुचाकी घेऊन घराबाहेर पडले. त्यानंतर तीन दिवस ते घरी परतलेच नाहीत. नातेवाईकांनी त्यांचा आसपासच्या गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा काहीच पत्ता लागू शकला नाही. त्यामुळे २७ जानेवारीला चाकण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तातडीने नवले यांच्या मोबाईल कॉल्सचे डिटेल्स काढण्यास सुरुवआत केली. मोबाईल कॉल्सच्या तपशीलावरुन पवार याला संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. घारगावचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट, चाकणचे उपनिरीक्षक श्रीधर जगताप, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, हवालदार अमोल जाधव यांनी आरोपीला घारगावच्या जंगलात नेले. जंगलामध्ये पुरलेला मृतदेह काढून पंचनामा केला. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अशोक थोरात हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.>पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबुलत्याच्याकडे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या पथकाने चौकशीला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.नवले, पवार आणि त्यांचा एक साथीदार असे तिघे मिळून २५ जानेवारी रोजी धुमाळवाडी येथे पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी नवले यांच्याकडे वेश्येची मागणी केली होती. ही मागणी न पुरविल्याने त्यांच्यामध्ये भांडणे झाली.या भांडणात पवार व त्याच्या साथीदाराने नवले यांना मारहाण करीत डोक्यात पाटा घालून खून केला. त्यानंतर दुसºया दिवशी नवले यांचा मृतदेह घारगावच्या जंगलात पुरला.

टॅग्स :Deathमृत्यू