शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

डोळस समाजाचे अंधत्व हा अडथळा : राहुल देशमुख; ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:08 IST

अंधत्व ही आमची अडचण नसून, डोळस समाजाचे अंधत्व हा मुख्य अडथळा आहे. अंधत्वावर मात करीत अंध व अपंगांसाठी संगणक शिक्षण देऊन सक्षमीकरणाचे काम करणारे राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआपली परिस्थिती बदलण्यासाठी बाहेरून कोणी येईल याचा विश्वास नव्हता : राहुल देशमुखराष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ सोहळा

पुणे : अंधत्व ही आमची अडचण नसून, डोळस समाजाचे अंधत्व हा मुख्य अडथळा आहे. इच्छाशक्तीच्या बळावर आम्ही जग जिंकू शकतो, आम्हाला ध्येय गाठण्यासाठी सर्वांची साथ अपेक्षित असल्याचे मत स्वत: अंध असून, अंधत्वावर मात करीत अंध व अपंगांसाठी संगणक शिक्षण देऊन सक्षमीकरणाचे काम करणारे राहुल देशमुख यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ समितीचे प्रांत सह-कोषाध्यक्ष चंदन कटारिया, प्रांत उपाध्यक्षा पूनम मेहता, पुणे महानगर अध्यक्ष विश्वास जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, देवता देशमुख, प्रांत कार्यवाह शैलेंद्र बोरकर, पश्चिम महाराष्ट्रप्रमुख गणेश बागदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. एक्केचाळीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

चंदन कटारिया यांनी प्रास्ताविक केले. समितीच्या महानगर उपाध्यक्षा अलका पेटकर यांनी परिचय करून दिला. अश्विनीकुमार उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास जोशी यांनी आभार मानले.

अंधांबाबतच्या गैरसमजांमुळे रेल्वेच्या फलाटावर झोपून शिक्षण घेतले. समाजात बरे-वाईट अनुभव आले. ध्येयाप्रती आत्मविश्वासानाने जाताना खचलो नाही. आपली परिस्थिती बदलण्यासाठी बाहेरून कोणी येईल याचा विश्वास नव्हता. आपल्यावर आलेली वेळ इतर अंध व अपंगांवर येऊ नये, म्हणून कार्यरत झालो. त्यातून सुमारे ९०० अंध व अपंगांना संगणकाचे प्रशिक्षण देऊन सक्षम करता आले. - राहुल देशमुख

अनेक प्रकारच्या समस्या येतात, परंतु त्याचा धैर्याने सामना केला पाहिजे, ही स्वामी विवेकानंदांची शिकवण होती. याच प्रेरणेतून राहुल देशमुख यांच्यासारखे कार्यकर्ते घडतात. - काशिनाथ देवधर

टॅग्स :Puneपुणे