शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत पुत्रप्राप्तीसाठी अघोरी जादुटोणा; उतारा पाहून सगळ्यांचीच उडाली भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 20:18 IST

यापूर्वी इंदापुर,दौंड परिसरात पुत्रप्राप्तीसाठी इतरांची मुले बळी दिल्याचे प्रकार घडले आहेत...

ठळक मुद्देबारामती तालुक्यातील झारगडवाडीत नदीकाठी घडला प्रकार

बारामती: लॉकडाऊनच्या काळात बारामती तालुक्यात सध्या पुणे मुंबईहुन आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.त्यामुळे बारामतीकर धास्तावले आहेत.त्यातच तालुक्यातील झारगडवाडी येथील अघोरी उताऱ्याची चर्चा रंगली आहे. अंगावर काटा आणणारा उतारा पाहुन अनेकांची भंबेरी उडाली. पुत्रप्राप्तीसाठी जादूटोणा केल्यानंतर हा उतारा झारगडवाडी येथील कऱ्हा नदीकाठी टाकण्यात आला.

लॉकडाऊनच्या काळात सुचलेले हे विचित्र उद्योग पाहुन येथील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या उताऱ्यामध्ये उलट्या पंखाच्या चार कोंबड्यांसह कोहळ्याची चार फळे,काळ्याबाहुल्या,टाचण्या लावलेली २२ लिंबे, स्त्रीचे अर्धवट कापलेले केस,चारमासे,घोड्याच्या पायाची झिजलेली नाळ, लहान मुलांचे कपडे,चार काळे पीस यावस्तुंचा समावेश होता.संपुर्ण उतारा बांधलेल्या पोत्यात टाकण्यात आला होता.त्यामुळे यातील दोन कोंबड्यांचा श्वास गुदमरुन मृत्यु झाल्याचे दिसुन आले.  या उताऱ्यात शास्त्रीय दृष्ट्या काहीही अर्थ नसताना मोठा खर्च केल्याचे दिसुन येते. 'अंनिस' चे कार्यकर्ते या उताऱ्याची पाहणी करत असताना' कशाला त्याला हात लावताय , उगा दुसऱ्याची बिलामत तुमच्या मागं' असे म्हणत तिथून जाणाऱ्या वृद्ध महिलेने भीती घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,अंनिसचे बारामती कार्याध्यक्ष विपुल पाटील यांनी या प्रकाराची रुतुराज काळकुटे,किरण खरात यांच्यासमवेत पाहणी केली. याबाबत कार्याध्यक्ष पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले ,  झारगडवाडी गावातील स्मशानभूमीजवळ मोठ्या स्वरूपाचा उतारा ठेवण्यात आला होता.यामध्ये असणारे लहान बाळाचे कपडे पाहुन हा प्रकार पुत्रप्रात्तीसाठी केला असण्याची शक्यता आहे.हा उतारा केवळ लहान मुलांच्या कपड्यांमुळे गंंभीर वाटला. इतर वेळी या उताऱ्याकडे फारसे कोणी पाहिले नसते. लहान मुलांच्या कपड्यावरुन हा पुत्रप्राप्तीसाठी अघोरी प्रकार केला असण्याची शक्यता आहे. यापूर्वी इंदापुर,दौंड परिसरात पुत्रप्राप्तीसाठी इतरांची मुल बळी दिल्याचे प्रकार घडले आहेत. आजचा प्रकार गंभीर असण्याची शक्यता आहे.त्याला वेळीच अटकाव करणे आवश्यक आहे.अन्यथा यातुन गंभीर अघोरी प्रकार वाढण्याची भीती आहे. उतारा पडल्यावर पसरात भीतीचे वातावरण होते,तेथील रस्ता कोणी ओलांडला नसल्याची माहिती समजत आहे.या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती