शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राष्ट्रवादी काँग्रेस फोडायला BJP ला १० जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 15:25 IST

पावसाने कहर केला आहे व सरकारचे अस्तित्व कुठेही दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली...

पुणे : देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस फोडायला त्यांना १० वेळा जन्म घ्यावे लागलीत. तरीही काही होणार नाही, असा विश्वास माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. पावसाने कहर केला आहे व सरकारचे अस्तित्व कुठेही दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

बालगंधर्व रंगमंदिरात गुरुवारी सकाळी एका कार्यक्रमापूर्वी पत्रकारांबरोबर संवाद साधताना मुंडे म्हणाले की, परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. शेतातून ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले होते त्याला जागेवरच कोंब फुटत आहेत. फक्त सोयाबीनच नाही तर पावसाने शेतकऱ्यांना हाताला कुठलेच पीक लागू दिलेले नाही. असे असताना कुठेही पंचनामे झालेले नाहीत. नुकसानभरपाईच्या फक्त गप्पा केल्या जात आहेत, प्रत्यक्षात काहीच व्हायला तयार नाही. या सरकारचे अस्तित्वच आता तीन महिने होऊन गेले तरीही दिसत नाही.

याचे कारण यांचे मंत्रीमंडळच वेळेवर तयार झाले नाही, ते झाले तर मग नंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यातच झाल्या नाहीत. या कालावधीत कोणाचेही कोणाच्याच कामांवर नियंत्रण नव्हते. त्याचा परिणाम म्हणून पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायला तयार नाहीत. नियम, अटी यांच्यात शेतकऱ्यांना अडकवले जात आहे. या काळात कृषीमंत्री आहेत तरी कुठे, असा प्रश्न मुंडे यांनी केला. हे सरकार जनतेच्या नाही तर स्वत:च्या हितासाठी तयार झालेले सरकार आहे. १०० रुपयांमध्ये शिधा हा तर केवळ फसवा प्रकार असून तो प्रत्यक्षात येणार नाही, असे मुंडे म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड