शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Devendra Fadnavis Live: “PM मोदींनी करून दाखवलं, एक व्यक्ती देश कसा बदलू शकतो याचा प्रत्यय दिला”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 21:46 IST

Devendra Fadnavis Live: काँग्रेस काळात शक्य नव्हते. मोदी आणि शाहांनी काश्मीरमधून कलम ३७० हटवले म्हणूनच राहुल गांधी तिरंगा फडकवू शकले, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

Devendra Fadnavis Live: आपण सौभाग्यशाली आहोत की आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते लाभले. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व वैश्विक नेतृत्व आहे. केवळ भारताचे पंतप्रधान एवढ्यापुरते ते मर्यादित राहिलेले नाहीत, तर संपूर्ण विश्व ज्या नेतृत्वाकडे आदराने पाहते, अशा प्रकारचे नेतृत्व पंतप्रधान मोदी आहेत, असे कौतुकोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. 

पुण्यात modi@20 पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. गेल्या ९ वर्षांत आपण बघितले की, भारताला ज्या प्रकारे त्यांनी परिवर्तित केले, गरीब कल्याणाचा अजेंडा राबवून भारतातील सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन केले. एक आत्मनिर्भर भारत निर्माण केला. जगाच्या पाठीवर ताठ मानेने जो भारत उभा राहू शकतो, असा भारत तयार केला. आज जगातील ५ वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था पंतप्रधान मोदी यांनी भारताची तयार केली. देशाला जागतिक पातळीवर महत्त्वाचा देश म्हणून मान्यता मिळवून देताना, मूठभरांचे नाही, तर बहुजनांचे कल्याण करणाऱ्या योजना राबवून भारताला परिवर्तित करण्याचे काम हे पंतप्रधान मोदी यांनी करून दाखवले. तसेच मागील २० वर्षात त्यांनी देशभरात काय परिवर्तन आणले हे त्यांच्या या पुस्तकात दिसून येईल. एक व्यक्ती १३५ कोटींचा देश कसा बदलू शकतो, याचा प्रत्यय आपल्याला येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

अमित शाहांनी अतिशय यशस्वीरित्या जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवून दाखवले

अमित शाहांनी अतिशय यशस्वीरित्या जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवून दाखवले. राहुल गांधी काश्मीरात गेले आणि तिरंगा झेंडा फडकवून आले. काँग्रेसच्या काळात त्यांना हे शक्य नव्हते. कारण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कलम ३७० हटवले म्हणून ते तिरंगा झेंडा फडकवू शकले, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

दरम्यान, या कार्यक्रमात सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख शिवसेनेचे नेते, खऱ्या शिवसेनेचे नेते असा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा