शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

कळंब, वालचंदनगरवर भाजपचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:12 IST

वालचंदनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात कळंब आणि वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीमुळे राज्यमंत्री ...

वालचंदनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात कळंब आणि वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीमुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जिल्हा परिषद गटात भाजपने दोन ग्रामपंचायतीवर बाजी मारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा तर लागली नाही ना, असा सवाल ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

कळंब ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग एकमधून भाजपच्या कुसूम सर्जेराव कोळी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश आप्पासाहेब डोंबाळे, शितल सागर कोळी यांनी विजय मिळविला. प्रभाग क्रमांक दोनमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कल्याण डोंबाळे तर भाजपचे अर्चना पोपट चव्हाण व भामा दादा भालेराव, हे निवडून आले आहेत. प्रभाग तीनमधून सारिका ज्ञानदेव मेटकरी व विद्या अतुल सावंत हे दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे रामचंद्र शिवराम कदम, तर भाजपचे, परविन इकबाल शेख व डॉ.अनिता नंदकुमार सोनवणे, निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपचे प्रमोद विश्वावसराव पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे, संदीप मधुकर पाटील, सोनाली प्रमोद खंडागळे,निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपचे अश्विनी अभिजीत नलवडे, लक्ष्मण जगन्नाथ पालवे, सुनील बाबू मोरे हे निवडून आले असल्याने, कळंब ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ तर भाजपच्या ९ जागा निवडून आल्या असल्याने, कळंब ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत बसपाचे हर्षवर्धन अर्जुन गायकवाड तर भाजपचे, संदीप गुणवंत पांढरे, राष्ट्रवादी

काँग्रेसच्या वैशाली पोपट मिसाळ, प्रभाग २ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण किसनराव वीर, भाजपचे मनिषा सत्यशिल पाटील, स्वाती सचिन अचलारे निवडून आले आहेत. प्रभाग ३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबादास भानुदास शेळके, प्राजक्ता विनोद कांबळे, निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपचे संजय सुरेश नकाते, रोहित जगन्नाथ झेंडे व अनिता संतोष गायकवाड निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपचे संतोष नामदेव गायकवाड, पद्मावती जनार्दन परीट, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वैशाली शरद शिवशरण निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपच्या आरती दयानंद झेंडे निवडून आल्या आहेत, तर भाजपच्या शरद श्रीहरी गायकवाड व महादेवी रायप्पाकोळी हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपने निवडणुकीत वर्चस्व मिळविले आहे.