शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कळंब, वालचंदनगरवर भाजपचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:12 IST

वालचंदनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात कळंब आणि वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीमुळे राज्यमंत्री ...

वालचंदनगर: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात कळंब आणि वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीमुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जिल्हा परिषद गटात भाजपने दोन ग्रामपंचायतीवर बाजी मारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा तर लागली नाही ना, असा सवाल ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

कळंब ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग एकमधून भाजपच्या कुसूम सर्जेराव कोळी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश आप्पासाहेब डोंबाळे, शितल सागर कोळी यांनी विजय मिळविला. प्रभाग क्रमांक दोनमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कल्याण डोंबाळे तर भाजपचे अर्चना पोपट चव्हाण व भामा दादा भालेराव, हे निवडून आले आहेत. प्रभाग तीनमधून सारिका ज्ञानदेव मेटकरी व विद्या अतुल सावंत हे दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे रामचंद्र शिवराम कदम, तर भाजपचे, परविन इकबाल शेख व डॉ.अनिता नंदकुमार सोनवणे, निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपचे प्रमोद विश्वावसराव पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे, संदीप मधुकर पाटील, सोनाली प्रमोद खंडागळे,निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपचे अश्विनी अभिजीत नलवडे, लक्ष्मण जगन्नाथ पालवे, सुनील बाबू मोरे हे निवडून आले असल्याने, कळंब ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ तर भाजपच्या ९ जागा निवडून आल्या असल्याने, कळंब ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत बसपाचे हर्षवर्धन अर्जुन गायकवाड तर भाजपचे, संदीप गुणवंत पांढरे, राष्ट्रवादी

काँग्रेसच्या वैशाली पोपट मिसाळ, प्रभाग २ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण किसनराव वीर, भाजपचे मनिषा सत्यशिल पाटील, स्वाती सचिन अचलारे निवडून आले आहेत. प्रभाग ३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबादास भानुदास शेळके, प्राजक्ता विनोद कांबळे, निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपचे संजय सुरेश नकाते, रोहित जगन्नाथ झेंडे व अनिता संतोष गायकवाड निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपचे संतोष नामदेव गायकवाड, पद्मावती जनार्दन परीट, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वैशाली शरद शिवशरण निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपच्या आरती दयानंद झेंडे निवडून आल्या आहेत, तर भाजपच्या शरद श्रीहरी गायकवाड व महादेवी रायप्पाकोळी हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपने निवडणुकीत वर्चस्व मिळविले आहे.