शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बिवरी गावानंच जोडला विकासाचा सेतू

By admin | Updated: October 19, 2015 01:55 IST

पूल नसल्याने पुण्याला जाताना १५ किलोमीटरचा वळसा मारून जावे लागत होेते. ‘सरकारी काम आणि नुसतंच थांब’ याची खात्री असल्याने शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता गावानंच

राजेवाडी : पूल नसल्याने पुण्याला जाताना १५ किलोमीटरचा वळसा मारून जावे लागत होेते. ‘सरकारी काम आणि नुसतंच थांब’ याची खात्री असल्याने शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता गावानंच पूल बांधण्यासाठी कंबर कसली. सर्वांच्या अथक परिश्रमांतून अर्धा किलोमीटरचा पूल बांधला. हवेली तालुक्यातील बिवरी या छोट्याशा गावाने बांधिलकीतून विकासाचा आदर्श उभा केला आहे. बिवरीहून पुण्याकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना कोरगाव मूळमार्गे उरुळी कांचनहून नायगावमार्गे पुण्याला जावे लागत असे. त्यासाठी १५ किलोमीटर अंतराचा वळसा मारून जावे लागत होते. अनेकांना ये-जा करताना वेळ, पैसा घालवावा लागत होता. त्यामुळे गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी नदीवर पूल बांधावा, अशी कल्पना ग्रामस्थांच्या मनात आली. दत्तात्रय गोते यांनी पुलाची कल्पना गावातील तरुण व नागरिकांसमोर मांडली. सर्वांनी प्रतिसाद दिला. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय सर्वांनी जवळपास अर्धा किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम करण्याचे ठरविले व सर्वांनी तन-मन-धनाने अहोरात्र मेहनत करून हा पूल साकारला. गोते पाटील मित्रपरिवाराने २५ लाख रुपये खर्च करून आर्थिक मदतीचा सढळ हात दिला. शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते उद्घाटन करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते दादापाटील सातव होते. या वेळी भारतीय जनपा पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश कुटे, दत्तात्रय गोते पाटील मित्र परिवारातील अमित गोते, माऊली गोते, शरद गोते, राहुल जवळकर, महेंद्र झेंडे, अजय गोते, प्रशांत गोते, दीपक गोते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी गोते, बाळासाहेब गोते, विशाल गुळमे, निखिल गोते, संजय रघुवंत, बाळासाहेब जगताप, अविनाश गायकवाड, वाल्मीक गोते, तुषार गोते, उद्योजक नितीन गोते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदाम गोते यांनी प्रास्ताविक केले. वसुंधराचे अध्यक्ष विलास गोते यांनी आभार मानले. (वार्ताहर)