शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

कंत्राटी कामगारांसाठी संसदेत विधेयक मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:32 IST

अजित अभ्यंकर : कोरेगाव भीमा येथील मेळाव्यास दहा हजार कामगार उपस्थित

कोरेगाव भीमा : कारखान्यात मालकांपेक्षा मनोविकृत व्यवस्थापनच कामगारांची पिळवणूक करत असल्याने अशा व्यवस्थापनाविरुद्धच लढण्याची वेळ आली असून, कामगार लढ्याबाबत योग्य नियोजन हवे. त्याचबरोबर शिकाऊ कामगार म्हणजेच निमकामगारांना इतर कामगारांप्रमाणेच पीएफ, ईएसआयसह सर्व कायदे लागू असल्याचे सांगत कंत्राटी कामगारांविषयी संसदेत खासगी विधेयक लवकरच मांडले जाणार असल्याचेही ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी सांगितले.

डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथिल ट्रॅन्टर कारखान्यातील १७ कायम कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने गेल्या अडीच महिन्यांपूर्वी कामावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आल्यानंतर गत ८० दिवसांपासून ट्रॅन्टर कारखान्याच्या गेटवर कामगारांचे कुटुंबीयांसह आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, रांजणगाव, सणसवाडी, पिंपरी-चिंचवड, बारामती, इंदापूर, भोसरी, चाकण, खेडसह शिरवळ औद्योगिक परिसरातील दहा हजार कामगार पायी रॅलीद्वारे येऊन गौरीनंदन मंगल कार्यालयात कामगारांचा मेळावा झाला.या मेळाव्याप्रसंगी अजित अभ्यंकर बोलत होते. यावेळी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघांचे अध्यक्ष किशोर ढोकले, शिवाजीराव खटकाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, मारुती भापकर, रमेश सातपुते, अविनाश वाडेकर, दत्तात्रय येळवंडे, राजेंद्र दरेकर, गणेश जाधव, दिगंबर पाटील, किरण देशमुख, नारायण हरगुडे, कैलास मुंगशे, रमेश बनकर आदीउपस्थित होते.यावेळी किशोर ढोकले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या कामगारांची गुलामीकडे वाटचाल चालू असून महागाईच्या प्रमाणात पगार कमी होत चालले आहेत. शासनाच्या कामगारविरोधी धोरणांमुळे व भांडवलदारांच्या दबावाखाली कंत्राटीप्रमाणेच कायम कामगार पद्धतशीरपणे संपवला जातोय.यावेळी अप्पर कामगार आयुक्त शैलेश पोळ व उपायुक्त पनवलकर यांना कामगारांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन यावेळी दिले. प्रास्ताविक राजेंद्र दरेकर यांनी केले. सूत्रसंचलन चंद्रकांत कदम तर आभार रूपेश वरपे यांनी मानले.लढा देण्यासाठी एकत्र या..४कारखान्यात महिलांना कोणत्याही सुविधा तर दिल्या जातच नाही शिवाय मुद्दाम रात्रपाळीला बोलावले जाते, अशा अमानवी कारखानदार व त्यांना सहकार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांविरोधात पद्धतशीरपणे लढा देण्याची वेळ आली असल्याचे सांगत ऐन दिवाळीत १७ कामगारांना बाहेर काढणाºया टॅन्टर कंपनीचा रोग इतर कारखान्यात पसरू नये, यासाठी आपण एकत्र लढायला हवे. या विरोधात फौजदारी कारवाईसह सर्वकष लढा देण्यासाठी एकत्र या, असेही आवाहन त्यांनी केले.४राष्ट्रवादी कामगार संघटनेचे शिवाजीराव खटकाळे म्हणाले, कामगारांचे भवितव्य अंधारात असून परस्पर मतभेद बाजुला ठेवून एकजुट ठेवली तरच कामगारांचे प्रश्न सुटतील.४निमकामगारांच्या हितासाठी कारखाना मालकावरही शासनाने निर्बंध ठेवत कामगार कमी करताना परवानगीही बंधनकारक केली पाहिजे. तर मारुती भापकर यांनी भांडवलदारांच्यादबावामुळे सरकारकडून शेतकरी, कामगारांचे केवळ शोषण होत असल्याने यापुढे सर्व घटकांना एकत्र करून लढा द्यावा लागेल, असे सांगितले.

टॅग्स :Puneपुणे