शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भडकवण्याचे काम लेखकाचे नव्हे - बिजेंद्र पाल सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 01:17 IST

‘‘लेखकाचे काम हे समाजाला भडकवण्याचे नव्हे तर मनोरंजनाचे आहे. लेखकाला जात धर्म नसतो. समाजातील विविध संवेदनशील विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही लेखकाची आहे.

पुणे  - ‘‘लेखकाचे काम हे समाजाला भडकवण्याचे नव्हे तर मनोरंजनाचे आहे. लेखकाला जात धर्म नसतो. समाजातील विविध संवेदनशील विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही लेखकाची आहे. त्याच्या शब्दांनी जग बदलू शकते, अशा शब्दातं एफटीआयआयचे अध्यक्ष बिजेंद्र पाल सिंग यांनी लेखकांचे महत्व विशद केले.तब्बल २२ वर्षांनी फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेमध्ये पदवी प्रदान समारंभ पार पडला. अंगात केशरी गाऊन, डोक्यावर पुणेरी पगडी...मान्यवरांच्या हस्ते प्रथमच प्रमाणपत्र घेण्याचा अनुभव... विद्यार्थ्यांचे खुललेले चेहरे अशा भारावलेल्या वातावरणात हा पदवीप्रदान सोहळा रंगला. बिजेंद्र पाल सिंग यांच्या हस्ते टिव्ही विभागातील २०१४-२०१५, २०१५-२०१६ आणि २०१७-२०१८ या बँचमधले पदव्युत्तर विद्यार्थी तसेच चित्रपट विभागातील पटकथा लेखन अभ्यासक्रमाच्या २०१६-२०१७ आणि २०१७ -२०१८ बँचच्या अशा एकूण १४८ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.याप्रसंगी एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला, कुलसचिव वरूण भारद्वाज, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम आणि टिव्ही विभागाचे अधिष्ठाता आर एन पाठक उपस्थित होते.’सीआयडी’ मालिकेचे तब्बल १९ वर्षे लेखन करणारे बिजेंद्र पाल सिंग म्हणाले, लेखकांच्या लेखणीमध्येच समाज बदलाचे सामर्थ्य आहे. आज टिव्ही आणि चित्रपट माध्यम बदलले आहे. व्यावसायिक आणि अव्यावसायिक ही दरी कमी झाली आहे. वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट किंवा मालिका बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरत आहेत. हे लेखकांमुळेच शक्य झाले आहे. एखादी मालिका यशस्वी झाली की लेखकांची जबाबदारी वाढते. दुस-याची दु:ख समजण्याची ताकद नसेल तर लेखन क्षेत्रात पुढे जाता येणे शक्य नाही. मी अनेक वर्षे सीआयडी लिहीत होतो. तुम्हाला कंटाळा आला नाही का? असे सातत्याने विचारले जायचे. पण मी जबाबदारी समजून लेखन केले. विविध अभ्यासक्रमांची भूपेंद्र कँथोला यांनी माहिती दिली.मी मूळचा नगर जिल्ह्यातील आहे. त्या भागात एफटीआयआय संस्था आणि अशा प्रकारचे शिक्षण याबद्दल काहीच माहिती नाही. एफटीआयआयमध्ये जे तंत्रशुद्ध शिक्षण मिळते तसे कुठेच दिले जात नाही.- ओंकार परदेशी,विद्यार्थी, टिव्ही एडिटिंगपदवी प्रदान सोहळा हा आमच्यासाठी आनंददायी अनुभव होता. आज आमचे करियर ख-या अर्थाने सुरू झाले आहे.- शताब्दी रॉय,विद्यार्थी व्हिडिओ एडिटिंगमनोरंजन क्षेत्राला कायमच लेखकांची निकड...भारत हा प्रकर्षाने बदलत आहे. त्यामुळे लेखकांना आपण कुणासाठी लिहीत होतो, कुणासाठी लिहायचे आहे हे समजावे लागेल. भाषेत बदल करावा लागेल असा कानमंत्रही त्यांनी विद्याथर््यांना दिला.जगभरात तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. जे आज शिकलो ते भविष्यात उपयोगी पडेलच असे नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत जाणार आहे. पण लेखक आणि दिग्दर्शन क्षेत्राला याचा फटका बसणार नाही. मनोरंजन क्षेत्रात लेखकांची कायमच निकड भासणार आहे. लेखकांची मागणी खूप आहे.हवा तेवढा पुरवठा होत नाही, अशी सध्याची मनोरंजनाची स्थिती आहे. त्यामुळे दिग्दर्शक, निर्माता लेखकांवर अवलंबून आहेत. ते येतील आणि नवीन कल्पना सुचवतील. यासाठी लेखकांनी वाचन, निरीक्षण आणि ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे पाल म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड